शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

आमदारांच्या पत्रांना उत्तरे दिली जावीत! नाना पटोलेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 05:51 IST

कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले आहे. टीका सहन करून कठोर निर्णय घेतले; पटोलेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

मुंबई : कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले आहे. टीका सहन करून कठोर निर्णय घेतले, याचे कौतुक आहे; परंतु आमदारांच्या पत्रांना उत्तरे दिली जात नाहीत. ती द्यायला हवीत, अशी टिपणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहमंत्रिपदही सांभाळले होते. ते खाते वापरण्यात आणि प्रशासन चालविण्यात ते ‘एक्सपर्ट’ आहेत, अशी पाठ थोपटतानाच, काही घरं सोडायची असतात, असा सल्लाही त्यांनी फडणवीसांना दिला.‘लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी नाना पटोलेंशी संवाद साधला. त्यावेळी नानांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीची आठवण सांगितली. “माझ्या घरात कुणी राजकारणी नाही. जानेवारी १९९२ मध्ये मी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसकडे तिकीट मागितले होते, पण त्यांनी दिले नाही. घरातूनही कुठली मदत झाली नाही. तरीही मी रिंगणात उतरलो आणि जनतेच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकलो. त्यावेळी भ्रष्टाचाराविरोधात काम करायचे. संस्था, कारखाने काढायचे नाहीत, असे वडिलांनी बजावले होते. हा मंत्र आज माझ्या कामाला आला, असे नाना प्रांजळपणे म्हणाले.निधीसाठी भांडावं! बाळासाहेब थोरात सरळ व्यक्तिमत्त्व आहे. कुणाचं मन आपल्यामुळे दुखावलं जाऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो; पण महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला जातो, असा आरोप आहे. काँग्रेस आमदारांना निधीचे वाटप कमी होते. काँग्रेसच्या हिश्श्याचे जे काही आहे ते मिळाले पाहिजे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या आमदाराला जास्त निधी मिळेल यासाठी भांडावे, अशी सूचना पटोलेंनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरे