शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

आता राहुल गांधींना एकदा संधी देऊन बघू या - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 05:44 IST

नरेंद्र मोदी नशीबवान आहेत की त्यांना पंतप्रधानपद मिळाले. अनेक इच्छुक राजकारणातून निघून गेले, पण त्यांना हे पद मिळाले नाही.

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यापासून आपल्यासमोर कधीच पर्याय नव्हता. महात्मा गांधींनी ठरविले म्हणून नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर जितके देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा लोकांना पर्याय होता का? मग आत्ताच ही पर्यायाची चर्चा का? नरेंद्र मोदींना संधी दिली, त्यांनी देश खड्ड्यात घातला. आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या. खड्ड्यात घालतील किंवा देशाचे चांगलेदेखील करून दाखवतील. त्यांना संधी तर देऊन बघू या, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रथमच आपला पाठिंबा व्यक्त केला.

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथील सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपवर सडकून टीका केली.

नरेंद्र मोदी नशीबवान आहेत की त्यांना पंतप्रधानपद मिळाले. अनेक इच्छुक राजकारणातून निघून गेले, पण त्यांना हे पद मिळाले नाही. अफाट बहुमत घेऊन आलेला हा पंतप्रधान; पण देशाची पार वाट लावून टाकली. देशाला संकटातून बाहेर काढायचे असेल तर त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. मोदी आणि शहामुक्त भारत व्हावा म्हणून निवडणूक न लढविता मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. येत्या काही दिवसांत राज्यभर आठ ते दहा सभा घेणार. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला. भाजपवाल्यांची कुजबुज सुरू आहे की राज ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे वापरून घेत आहे. मी इतका वेडा नाही. शिवाय, आत्ता जो निर्णय घेतलाय तो विधानसभेलापण लागू आहे असे अजिबात नाही, असेही राज म्हणाले.

नोटाबंदीच्या आधी भाजपने देशभरात जमिनी घेऊन ठेवल्या. दिल्लीत तर एक लाख ७० हजार स्क्वेअर फुटांचे आॅफिस बांधले. सेवन स्टार आॅफिस बांधायला पैसे कुठून आले, असा सवाल करतानाच नोटाबंदीमुळे नोटाबंदीनंतर देशात ४ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ९९.३% पैसे बँकेत परत आले, म्हणजे नोटाबंदी फसली. त्या वेळी मोदी म्हणाले होते की, जर ५० दिवसांत सगळे सुरळीत नाही झाले तर मला कोणत्याही चौकात हवी ती शिक्षा द्या. मोदी तुम्ही चौक ठरवा, आता शिक्षा द्यायला आम्ही येतो, असे राज म्हणाले.

फसव्या योजना, आधीच्या सरकारच्या योजनांची नावे बदलून रेटायचे उद्योग सुरू आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील, हे मी काही वर्षांपूर्वीच सांगितले होते. आज मोदी आणि शहा तेच करत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर युद्धसदृश्य परिस्थती निर्माण केली. सैनिकांच्या हौतात्म्याचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न मोदींनी चालविला आहे. हे सगळं करणाऱ्या मोदींना प्रश्नही विचारलेले चालत नाही. कोणी प्रश्न विचारला की देशद्रोही ठरविले जाते. ही देशद्रोही ठरविण्याची कल्पना हुकूमशहा एडॉल्फ हिटलरची आहे. त्यानेदेखील त्याला विरोध करणाºया प्रत्येकाला देशद्रोही ठरवले होते. तेच आता मोदी करत आहेत. ही हिटलरची पुनरावृत्ती आहे, असे राज म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी