शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

"जायचे त्यांनी खुशाल जा, निष्ठावंतांसोबत पक्ष वाढवू", विनायक राऊतांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 08:22 IST

आज काही पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी : ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल ते खुशाल जाऊ देत. जे शिल्लक राहतील, त्यांना घेऊन पक्ष वाढवण्याची शिकवण आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्यानुसार आम्ही पक्ष वाढवू, असे मत उद्धवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील काल (दि.२३) पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

उद्धवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याखेरीज आज (दि.२४) काही पदाधिकारीही उद्धवसेना सोडून शिंदेसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. यावर बोलताना विनायक राऊत यांनी आपली भूमिका मांडली. बंड्या साळवी यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला, तर आपल्याला अजिबात दुःख होणार नाही. जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. जे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षात राहतील, त्यांना घेऊन पक्ष वाढवला जाईल, असे ते म्हणाले. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धवसेना स्वबळावर लढणार की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेससमवेत महाविकास आघाडी करून लढणार, याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. राज्यातील बहुतांश भागातील पदाधिकाऱ्यांशी ठाकरे यांनी चर्चा केली आहे. त्या सर्वांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह केला आहे, असे विनायक राऊत म्हणाले. तसेच, त्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे लवकरच घेतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर अनेक विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर आता कोकणात शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटात गळती सुरु झाली आहे. शिंदे सेनेकडून ठाकरे सेनेला धक्का देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून आता रत्नागिरीच्या ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वासह तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय, आज काही पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण