शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

बँकांनी फुगविलेल्या आकड्याची रिझर्व्ह बँकेकडे माहिती देणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 05:05 IST

व्यावसायिक बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जदार शेतक-यांचे आकडे फुगवून सांगितले आहेत. त्यामुळे या बँकांनी आधी आणि नंतर दिलेली कर्जदारांची आकडेवारी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली जाईल...

मुंबई : व्यावसायिक बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जदार शेतक-यांचे आकडे फुगवून सांगितले आहेत. त्यामुळे या बँकांनी आधी आणि नंतर दिलेली कर्जदारांची आकडेवारी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. महिनाभरात सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफीचा फायदा दिला जाईल; त्यानंतर ज्या बँकांनी मोठ्या प्रमाणात आधी आकडे फुगवून सांगितले आणि नंतर कमी केले त्याची शहानिशा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे व रिझर्व्ह बँकेकडे केली जाईल. मात्र, बँकांनी दिलेल्या या आकडेवारीवर विश्वास ठेवून कर्जमाफी दिली असती तर राज्यातील करदात्यांचा पैसा बोगस खात्यांमध्ये गेला असता. त्याला सरकारच्या निर्णयामुळे चाप लागल्याचाही दावामुख्यमंत्र्यांनी केला.सहकारी व व्यावसायिक बँकांनी मिळून ८९ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असे आधी सरकारला सांगितले होते. मात्र सरकारने थेट लाभधारक शेतक-यांकडून अर्ज भरून घेणे सुरू केल्यामुळे या बँकांचे पितळ उघडे पडले व पहिल्या टप्प्यात साडेतेरा लाख कर्जदार शेतक-यांची संख्या या बँकांनी कमी केली. हे वृत्त ‘लोकमत’ने सर्वांत आधी प्रसिद्ध केले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, आज आमचे प्राधान्य कर्जमाफीला आहे. उद्या कर्जमाफीच्या पहिल्या दिवशी १० लाख शेतक-यांच्या खात्यांत कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल आणि येत्या नोव्हेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.पूर्वी बँका राईट आॅफ केलेली खाती दाखवत आणि कर्जमाफीचे पैसे घेत असत, मात्र ते आता शक्य होणार नाही. मुंबईतील बँकांतून कृषी कर्ज घेतलेले जे लोक खरेच बाहेर शेती करीत असतील तर त्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.पेपरतपासणी आॅनलाइनचमुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणी यापुढेही सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र निकालाबाबत जे काही घडले ते वाईटच होते, अशी प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिली.सोशल मीडियाचा गैरवापरसोशल मीडियातून पंतप्रधान वा अन्य कोणावर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट टाकणारे काही जण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दुष्प्रचार केला जात आहे. असे प्रकार करणा-यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.अहमदनगरचा कॉन्स्टेबल हा एका राजकीय पक्षाच्या पुढा-याचा भाऊ आहे. हा पोलीस दोन महिने प्रचार करत होता. त्याचे पुरावे आहेत. पोलीस जर प्रचारात उतरून सरकारच्या विरोधात लिहायला लागले, तर कायदा-सुव्यवस्था उरणार नाही, त्यामुळे त्या पोलिसाविरुद्ध कारवाई केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.यवतमाळ जिल्ह्यात शेतक-यांचा कीटकनाशकांमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील. कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.‘मी सुप्रिया सुळेंच्या भरवशावर फिरत नाही’कोपर्डी बलात्कार व हत्याप्रकरणी एक महिन्यात निकाल दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी त्यांच्या भरवशावर राज्यात फिरत नाही, तर जनतेच्या भरवशावर फिरतो. अशी वक्तव्ये केल्यामुळे आरोपीला फायदा होतो. खटल्याचा निर्णय लावणे आमच्या हातात नाही, न्यायालयाच्या आहे. राजकीय फायद्यासाठी असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी