शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बँकांनी फुगविलेल्या आकड्याची रिझर्व्ह बँकेकडे माहिती देणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 05:05 IST

व्यावसायिक बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जदार शेतक-यांचे आकडे फुगवून सांगितले आहेत. त्यामुळे या बँकांनी आधी आणि नंतर दिलेली कर्जदारांची आकडेवारी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली जाईल...

मुंबई : व्यावसायिक बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जदार शेतक-यांचे आकडे फुगवून सांगितले आहेत. त्यामुळे या बँकांनी आधी आणि नंतर दिलेली कर्जदारांची आकडेवारी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. महिनाभरात सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफीचा फायदा दिला जाईल; त्यानंतर ज्या बँकांनी मोठ्या प्रमाणात आधी आकडे फुगवून सांगितले आणि नंतर कमी केले त्याची शहानिशा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे व रिझर्व्ह बँकेकडे केली जाईल. मात्र, बँकांनी दिलेल्या या आकडेवारीवर विश्वास ठेवून कर्जमाफी दिली असती तर राज्यातील करदात्यांचा पैसा बोगस खात्यांमध्ये गेला असता. त्याला सरकारच्या निर्णयामुळे चाप लागल्याचाही दावामुख्यमंत्र्यांनी केला.सहकारी व व्यावसायिक बँकांनी मिळून ८९ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असे आधी सरकारला सांगितले होते. मात्र सरकारने थेट लाभधारक शेतक-यांकडून अर्ज भरून घेणे सुरू केल्यामुळे या बँकांचे पितळ उघडे पडले व पहिल्या टप्प्यात साडेतेरा लाख कर्जदार शेतक-यांची संख्या या बँकांनी कमी केली. हे वृत्त ‘लोकमत’ने सर्वांत आधी प्रसिद्ध केले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, आज आमचे प्राधान्य कर्जमाफीला आहे. उद्या कर्जमाफीच्या पहिल्या दिवशी १० लाख शेतक-यांच्या खात्यांत कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल आणि येत्या नोव्हेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.पूर्वी बँका राईट आॅफ केलेली खाती दाखवत आणि कर्जमाफीचे पैसे घेत असत, मात्र ते आता शक्य होणार नाही. मुंबईतील बँकांतून कृषी कर्ज घेतलेले जे लोक खरेच बाहेर शेती करीत असतील तर त्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.पेपरतपासणी आॅनलाइनचमुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणी यापुढेही सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र निकालाबाबत जे काही घडले ते वाईटच होते, अशी प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिली.सोशल मीडियाचा गैरवापरसोशल मीडियातून पंतप्रधान वा अन्य कोणावर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट टाकणारे काही जण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दुष्प्रचार केला जात आहे. असे प्रकार करणा-यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.अहमदनगरचा कॉन्स्टेबल हा एका राजकीय पक्षाच्या पुढा-याचा भाऊ आहे. हा पोलीस दोन महिने प्रचार करत होता. त्याचे पुरावे आहेत. पोलीस जर प्रचारात उतरून सरकारच्या विरोधात लिहायला लागले, तर कायदा-सुव्यवस्था उरणार नाही, त्यामुळे त्या पोलिसाविरुद्ध कारवाई केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.यवतमाळ जिल्ह्यात शेतक-यांचा कीटकनाशकांमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील. कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.‘मी सुप्रिया सुळेंच्या भरवशावर फिरत नाही’कोपर्डी बलात्कार व हत्याप्रकरणी एक महिन्यात निकाल दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी त्यांच्या भरवशावर राज्यात फिरत नाही, तर जनतेच्या भरवशावर फिरतो. अशी वक्तव्ये केल्यामुळे आरोपीला फायदा होतो. खटल्याचा निर्णय लावणे आमच्या हातात नाही, न्यायालयाच्या आहे. राजकीय फायद्यासाठी असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी