शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या प्रशासन कौशल्यावर धडा

By admin | Updated: February 20, 2016 03:09 IST

छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. त्यांच्या याच क्षमतेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. त्यांच्या याच क्षमतेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात आठ पानी धड्याचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात शिवछत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते, त्यांचा पराक्रम आणि युद्धकौशल्य चौथीच्या पुस्तकात शिकविले जात आहे. या पराक्रमाबरोबरच शिवरायांच्या काळात जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, शब्दकोष आणि शिवकालीन तलावांची विशेष व्यवस्था होती. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रमही त्यांच्या काळात राबविला गेला. त्याचबरोबर दुष्काळ निवारण्याची यंत्रणाही त्यांच्या काळात होती. शौर्याबरोबरच शिवाजी महाराज हे कुशल प्रशासकही (मॅनेजमेंट गुरू) होते, हा इतिहाससुद्धा शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या उद्दिष्टाने पुढील शैक्षणिक वर्षापासून पुस्तकात तो धडा समाविष्ट करण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.सरकारला शिवाजी महाराजांचा विसर : नवाब मलिकनिवडणुकीत ‘शिवछत्रपती का आशीर्वाद; चलो चले मोदी के साथ’ अशी घोषणा देत सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला शिवजयंतीच्या दिवशी मात्र छत्रपतींचा विसर पडला आहे. शुक्रवारी एकाही वृत्तपत्रातून शिवरायांच्या जयंतीची जाहिरात करण्यात आली नाही. ‘मेक इन इंडिया’साठी कोट्यवधींची उधळण करणाऱ्या सरकारकडे शिवजयंतीसाठी पैसा नसणे ही दुर्दैवाची बाब असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. जाहिरात न देणारे फडणवीस सरकार शिवस्मारकाबाबतही वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. मागील वर्षी शिवजयंतीला शिवस्मारकाचे भूमिपूजन करणार असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप शिवस्मारकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. निवडणूक काळात उठता-बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपा सरकारमधील नेत्यांना निवडणुका संपल्यानंतर शिवाजी महाराजांचा विसर पडला असल्याची टीका मलिक यांनी केली आहे.