शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शिवरायांच्या प्रशासन कौशल्यावर धडा

By admin | Updated: February 20, 2016 03:09 IST

छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. त्यांच्या याच क्षमतेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. त्यांच्या याच क्षमतेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात आठ पानी धड्याचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात शिवछत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते, त्यांचा पराक्रम आणि युद्धकौशल्य चौथीच्या पुस्तकात शिकविले जात आहे. या पराक्रमाबरोबरच शिवरायांच्या काळात जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, शब्दकोष आणि शिवकालीन तलावांची विशेष व्यवस्था होती. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रमही त्यांच्या काळात राबविला गेला. त्याचबरोबर दुष्काळ निवारण्याची यंत्रणाही त्यांच्या काळात होती. शौर्याबरोबरच शिवाजी महाराज हे कुशल प्रशासकही (मॅनेजमेंट गुरू) होते, हा इतिहाससुद्धा शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या उद्दिष्टाने पुढील शैक्षणिक वर्षापासून पुस्तकात तो धडा समाविष्ट करण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.सरकारला शिवाजी महाराजांचा विसर : नवाब मलिकनिवडणुकीत ‘शिवछत्रपती का आशीर्वाद; चलो चले मोदी के साथ’ अशी घोषणा देत सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला शिवजयंतीच्या दिवशी मात्र छत्रपतींचा विसर पडला आहे. शुक्रवारी एकाही वृत्तपत्रातून शिवरायांच्या जयंतीची जाहिरात करण्यात आली नाही. ‘मेक इन इंडिया’साठी कोट्यवधींची उधळण करणाऱ्या सरकारकडे शिवजयंतीसाठी पैसा नसणे ही दुर्दैवाची बाब असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. जाहिरात न देणारे फडणवीस सरकार शिवस्मारकाबाबतही वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. मागील वर्षी शिवजयंतीला शिवस्मारकाचे भूमिपूजन करणार असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप शिवस्मारकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. निवडणूक काळात उठता-बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपा सरकारमधील नेत्यांना निवडणुका संपल्यानंतर शिवाजी महाराजांचा विसर पडला असल्याची टीका मलिक यांनी केली आहे.