शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 06:23 IST

मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले.

मुंबई : मतदार यादीत नावे नाहीत, बायकोचे नाव एकीकडे, नवऱ्याचे नाव दोन किलोमीटर लांबच्या मतदार केंद्रात, मोबाइल केंद्रावर फोन न्यायचा की नाही, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याचे प्रश्न, अशा प्रचंड गदारोळ आणि गोंधळात मुंबई, ठाण्याच्या दहा लोकसभा मतदारसंघांत शेवटचा टप्पा पार पडला. यामुळे मतदानाचा टक्का तर वाढला नाहीच, उलट गोंधळाचा टक्का मात्र सर्वाधिक ठरला.

मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले. मुंबईतील अनेक मतदारसंघांत ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले. ते बदलण्यात बराच वेळ गेला. मुंबई, कल्याण, पालघर या भागांत ईव्हीएम मशीन अतिशय धिम्यागतीने चालत असल्याच्या तक्रारी होत्या. 

रांगेतील उभ्या असणाऱ्यांना साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध नव्हते. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची नावे मतदार यादीत नव्हती. तारे-तारकांना मतदान केंद्रावर व्हीआयपी वागणूक मिळत होती, त्याच्या उलट वागणूक ज्येष्ठ नागरिकांना मिळत होती. काही ठिकाणी मोबाइल मतदान केंद्रात नेता येणार नाहीत, अशी सक्ती केली गेली, तर काही ठिकाणी मोबाइल बंद ठेवून मतदानाला जाऊ दिले गेले.

निवडणूक कर्मचाऱ्यांचे उपाशीपाेटी कर्तव्यnमतदानासाठी रविवारी सकाळपासून मतदान केंद्रांवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना, तसेच पोलिसांना दिवसभर जेवायला मिळाले नाही. पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जातो, असे उत्तर देण्यात आले, पण कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र सोडायचे नाही, अशी त्यांच्यावर सक्ती होती. 

n१०० मीटरच्या अंतरातील खाण्यापिण्याची ठिकाणेदेखील बंद करण्यात आली होती. अशा वेळी कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी घरून डबे आणणे अपेक्षित असल्याचे उत्तर दिले गेले, पण निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरून कर्मचारी, अधिकारी, पोलिस बोलावण्यात आले होते. त्यांचे इथे घर नाही. अशांनी डबे आणायचे कुठून? यावर कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडे नव्हते. 

शेकडाे लाेक कंटाळून फिरले माघारीज्या मतदारांकडे मतदानाची स्लिप होती, त्यांचे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र तपासणे आणि ते त्यांचेच आहे की नाही, हे बघणे यात प्रचंड वेळ गेल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्राबाहेर दोन ते तीन तास लोकांच्या रांगा लागल्या.  

लोक कंटाळून रांगा सोडून घरी निघून गेल्याचेही चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. काही ठिकाणी मतदाराची उलट तपासणी केल्यासारखी चौकशी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या. ज्या ठिकाणी विरोधक आरडाओरड करत होते, तिथे मतदानाचा वेग वाढताना दिसत होता.

धुळ्यात दगडफेक, नाशिकमध्ये बाचाबाचीnनाशिक येथील एका मतदानकेंद्रावर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि उद्धवसेनेचे पदाधिकारी माजी आमदार वसंत गीते हे समोरासमोर भिडले. यावेळी गीते व फरांदे यांच्यात शाब्दिक चकमक होऊन अरेरावी सुरू होताच भाजप व शिंदेसेनेचे कार्यकर्ते व उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. 

nधुळ्यात बोगस मतदानाच्या संशयावरून नवभारत चौकात दगडफेक झाली. घटनेमागील नेमके कारण अस्पष्ट असले, तरी बोगस मतदानाच्या संशयावरून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात आली.

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानEVM Machineएव्हीएम मशीन