शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 06:23 IST

मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले.

मुंबई : मतदार यादीत नावे नाहीत, बायकोचे नाव एकीकडे, नवऱ्याचे नाव दोन किलोमीटर लांबच्या मतदार केंद्रात, मोबाइल केंद्रावर फोन न्यायचा की नाही, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याचे प्रश्न, अशा प्रचंड गदारोळ आणि गोंधळात मुंबई, ठाण्याच्या दहा लोकसभा मतदारसंघांत शेवटचा टप्पा पार पडला. यामुळे मतदानाचा टक्का तर वाढला नाहीच, उलट गोंधळाचा टक्का मात्र सर्वाधिक ठरला.

मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले. मुंबईतील अनेक मतदारसंघांत ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले. ते बदलण्यात बराच वेळ गेला. मुंबई, कल्याण, पालघर या भागांत ईव्हीएम मशीन अतिशय धिम्यागतीने चालत असल्याच्या तक्रारी होत्या. 

रांगेतील उभ्या असणाऱ्यांना साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध नव्हते. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची नावे मतदार यादीत नव्हती. तारे-तारकांना मतदान केंद्रावर व्हीआयपी वागणूक मिळत होती, त्याच्या उलट वागणूक ज्येष्ठ नागरिकांना मिळत होती. काही ठिकाणी मोबाइल मतदान केंद्रात नेता येणार नाहीत, अशी सक्ती केली गेली, तर काही ठिकाणी मोबाइल बंद ठेवून मतदानाला जाऊ दिले गेले.

निवडणूक कर्मचाऱ्यांचे उपाशीपाेटी कर्तव्यnमतदानासाठी रविवारी सकाळपासून मतदान केंद्रांवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना, तसेच पोलिसांना दिवसभर जेवायला मिळाले नाही. पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जातो, असे उत्तर देण्यात आले, पण कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र सोडायचे नाही, अशी त्यांच्यावर सक्ती होती. 

n१०० मीटरच्या अंतरातील खाण्यापिण्याची ठिकाणेदेखील बंद करण्यात आली होती. अशा वेळी कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी घरून डबे आणणे अपेक्षित असल्याचे उत्तर दिले गेले, पण निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरून कर्मचारी, अधिकारी, पोलिस बोलावण्यात आले होते. त्यांचे इथे घर नाही. अशांनी डबे आणायचे कुठून? यावर कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडे नव्हते. 

शेकडाे लाेक कंटाळून फिरले माघारीज्या मतदारांकडे मतदानाची स्लिप होती, त्यांचे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र तपासणे आणि ते त्यांचेच आहे की नाही, हे बघणे यात प्रचंड वेळ गेल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्राबाहेर दोन ते तीन तास लोकांच्या रांगा लागल्या.  

लोक कंटाळून रांगा सोडून घरी निघून गेल्याचेही चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. काही ठिकाणी मतदाराची उलट तपासणी केल्यासारखी चौकशी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या. ज्या ठिकाणी विरोधक आरडाओरड करत होते, तिथे मतदानाचा वेग वाढताना दिसत होता.

धुळ्यात दगडफेक, नाशिकमध्ये बाचाबाचीnनाशिक येथील एका मतदानकेंद्रावर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि उद्धवसेनेचे पदाधिकारी माजी आमदार वसंत गीते हे समोरासमोर भिडले. यावेळी गीते व फरांदे यांच्यात शाब्दिक चकमक होऊन अरेरावी सुरू होताच भाजप व शिंदेसेनेचे कार्यकर्ते व उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. 

nधुळ्यात बोगस मतदानाच्या संशयावरून नवभारत चौकात दगडफेक झाली. घटनेमागील नेमके कारण अस्पष्ट असले, तरी बोगस मतदानाच्या संशयावरून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात आली.

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानEVM Machineएव्हीएम मशीन