शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 06:23 IST

मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले.

मुंबई : मतदार यादीत नावे नाहीत, बायकोचे नाव एकीकडे, नवऱ्याचे नाव दोन किलोमीटर लांबच्या मतदार केंद्रात, मोबाइल केंद्रावर फोन न्यायचा की नाही, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याचे प्रश्न, अशा प्रचंड गदारोळ आणि गोंधळात मुंबई, ठाण्याच्या दहा लोकसभा मतदारसंघांत शेवटचा टप्पा पार पडला. यामुळे मतदानाचा टक्का तर वाढला नाहीच, उलट गोंधळाचा टक्का मात्र सर्वाधिक ठरला.

मुंबईच्या सहा, ठाणे जिल्ह्यातल्या तीन आणि पालघरची एक, अशा दहा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले. मुंबईतील अनेक मतदारसंघांत ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले. ते बदलण्यात बराच वेळ गेला. मुंबई, कल्याण, पालघर या भागांत ईव्हीएम मशीन अतिशय धिम्यागतीने चालत असल्याच्या तक्रारी होत्या. 

रांगेतील उभ्या असणाऱ्यांना साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध नव्हते. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची नावे मतदार यादीत नव्हती. तारे-तारकांना मतदान केंद्रावर व्हीआयपी वागणूक मिळत होती, त्याच्या उलट वागणूक ज्येष्ठ नागरिकांना मिळत होती. काही ठिकाणी मोबाइल मतदान केंद्रात नेता येणार नाहीत, अशी सक्ती केली गेली, तर काही ठिकाणी मोबाइल बंद ठेवून मतदानाला जाऊ दिले गेले.

निवडणूक कर्मचाऱ्यांचे उपाशीपाेटी कर्तव्यnमतदानासाठी रविवारी सकाळपासून मतदान केंद्रांवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना, तसेच पोलिसांना दिवसभर जेवायला मिळाले नाही. पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जातो, असे उत्तर देण्यात आले, पण कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र सोडायचे नाही, अशी त्यांच्यावर सक्ती होती. 

n१०० मीटरच्या अंतरातील खाण्यापिण्याची ठिकाणेदेखील बंद करण्यात आली होती. अशा वेळी कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी घरून डबे आणणे अपेक्षित असल्याचे उत्तर दिले गेले, पण निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरून कर्मचारी, अधिकारी, पोलिस बोलावण्यात आले होते. त्यांचे इथे घर नाही. अशांनी डबे आणायचे कुठून? यावर कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडे नव्हते. 

शेकडाे लाेक कंटाळून फिरले माघारीज्या मतदारांकडे मतदानाची स्लिप होती, त्यांचे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र तपासणे आणि ते त्यांचेच आहे की नाही, हे बघणे यात प्रचंड वेळ गेल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्राबाहेर दोन ते तीन तास लोकांच्या रांगा लागल्या.  

लोक कंटाळून रांगा सोडून घरी निघून गेल्याचेही चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. काही ठिकाणी मतदाराची उलट तपासणी केल्यासारखी चौकशी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या. ज्या ठिकाणी विरोधक आरडाओरड करत होते, तिथे मतदानाचा वेग वाढताना दिसत होता.

धुळ्यात दगडफेक, नाशिकमध्ये बाचाबाचीnनाशिक येथील एका मतदानकेंद्रावर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि उद्धवसेनेचे पदाधिकारी माजी आमदार वसंत गीते हे समोरासमोर भिडले. यावेळी गीते व फरांदे यांच्यात शाब्दिक चकमक होऊन अरेरावी सुरू होताच भाजप व शिंदेसेनेचे कार्यकर्ते व उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. 

nधुळ्यात बोगस मतदानाच्या संशयावरून नवभारत चौकात दगडफेक झाली. घटनेमागील नेमके कारण अस्पष्ट असले, तरी बोगस मतदानाच्या संशयावरून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात आली.

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानEVM Machineएव्हीएम मशीन