शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर : चामटोलीच्या जंगलात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 17:54 IST

चंदेरीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या चामटोली गावाच्या परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्यानं चामटोलीतील शेतक-याच्या बक-यादेखील फस्त केल्या आहेत.

बदलापूर - चंदेरीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या चामटोली गावाच्या परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्यानं चामटोलीतील शेतक-याच्या बक-यादेखील फस्त केल्या आहेत. या जंगलात बिबट्या नामशेष झाले होते. मात्र आता पुन्हा बिबट्या या भागात आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच वन विभागाच्या अधिका-यांनी परिसराची पाहणी केली असता बिबट्यासोबत त्याचे दोन बछडेदेखील असल्याची स्पष्ट केले आहे. 

चंदेरीच्या पर्वत रांगेत पूर्वी वन्य जिवांचा मोठ्या प्रमाणात वावर होता. बिबटेदेखील या भागात होते. मात्र गेल्या 20 ते 25 वर्षात या भागात ग्रामस्थांना कधी बिबट्याचा वावर जाणवला नाही. मात्र गेल्या महिन्याभरापासून या भागात एक बिबट्या बक-यांची शिकार करत असल्याचे शेतक-यांच्या लक्षात आले. रानात चरण्यासाठी गेलेल्या बक-यांपैकी काही बक-यांची शिकार या बिबटय़ाने केली होती. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. चामटोली भागातील जंगलात हा बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांना जंगलात जाताना सतर्क राहण्याचे आदेश वन विभागाने दिले आहे. तर बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ मात्र चिंतेत आहेत. या भागात बिबट्या फिरत असला तरी त्याने अद्याप मानवी वस्तीत हल्ला चढवलेला नाही. या भागातील जंगलात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात असल्याने या बिबटय़ाला मुबलक शिकार मिळत आहे. मात्र रानडुक्करची शिकार करतांना या बिबट्याला बक-या दिसल्याने त्याने ही शिकार केल्याचे वन विभागाचे अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी स्पष्ट केले. या बिबट्याचा ग्रामस्थांना सध्या तरी कोणताच धोका असल्याचे दिसत नाही. मात्र ग्रामस्थांनी जंगलात जाताना दक्षता घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

चामटोली भागात बिबट्या आल्याची चर्चा असताना गुरुवारी वन विभागाच्या अधिका-यांनी चामटोली येथील ताण गावाच्या परिसरात पाहणी केली. यावेळी बिबट्याच्या पायांचे ठसेदेखील त्यांना सापडले आहेत. तर काही आदिवासीयांनी दोन बछड्यांसह या बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. तर एका शेतक-याने बिबट्या पाणी पितानादेखील पाहिले आहे. या शेतक-यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केलेला असतानाच आता वन विभागाने देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. बिबट्या हा या जंगलात पुन्हा आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्या शेतक-यांच्या शेळळ्या ह्या बिबट्याने खाल्ले आहेत त्यांना भरपाई देण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. 

‘‘भीमाशंकरच्या जंगलातून हे बिबटे या भागात आल्याची शक्यता आहे. बछड्यांसह हा बिबटा फिरत असल्याने हे जंगल त्यांच्यासाठी सुरक्षित वाटत असेल. गावाच्या जवळच बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचा वावर हा नैसर्गिक असल्याने ग्रामस्थांनीच काळजी घेणो गरजेचे आहे''. - चंद्रकांत शेळके, वनअधिकार.