शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

राज्याच्या त्रिभाजनाचा डाव; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:25 IST

सत्ता स्थापनेच्या नावाखाली सर्वत्र प्रादेशिक, राजकीय आणि भावनिक वाद आणि चर्चा चालविल्या जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला तिढा एक प्रकारचे राजकीय षड्यंत्र आहे. जम्मू-काश्मीरच्या धर्तीवर महाराष्ट्राचे त्रिभाजन करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठीच सत्ता स्थापनेच्या नावाखाली सर्वत्र प्रादेशिक, राजकीय आणि भावनिक वाद आणि चर्चा चालवल्या जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.वंचित आघाडीच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी भाजपसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही लक्ष्य केले. महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा भाजपचा डाव आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करून उर्वरित महाराष्ट्रातून विदर्भसुद्धा वेगळा करण्याची चिन्हे नजरेआड करता येणार नाहीत. त्रिभाजनात विधानसभेचा अडथळा येऊ नये यासाठीच जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीसोबतची युती तोडून विधानसभा डळमळीत केली आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, असे आंबेडकर म्हणाले.राज्यांच्या विभाजनाकरिता जनमताचा कौल आवश्यक असतो. संसदीय राजकारणात विधानसभेचा कौल हा जनमताचा कौल मानला जातो. त्यामुळे पक्षीय विधानसभा अस्तित्वात असण्यापेक्षा राष्ट्रपती राजवटीत राज्यपालांच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या हा कौल मिळवणे सोपे असते. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, त्यावरून उपरोक्त विभाजनाचा संशय येण्यास प्रबळ कारण उपलब्ध आहे. आजवरचा राजकीय तसेच महाराष्ट्राचा इतिहास बघता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे राजकारण सहज ध्यानात येईल. असेही आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर