शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

राज्याच्या त्रिभाजनाचा डाव; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:25 IST

सत्ता स्थापनेच्या नावाखाली सर्वत्र प्रादेशिक, राजकीय आणि भावनिक वाद आणि चर्चा चालविल्या जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला तिढा एक प्रकारचे राजकीय षड्यंत्र आहे. जम्मू-काश्मीरच्या धर्तीवर महाराष्ट्राचे त्रिभाजन करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठीच सत्ता स्थापनेच्या नावाखाली सर्वत्र प्रादेशिक, राजकीय आणि भावनिक वाद आणि चर्चा चालवल्या जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.वंचित आघाडीच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी भाजपसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही लक्ष्य केले. महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा भाजपचा डाव आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करून उर्वरित महाराष्ट्रातून विदर्भसुद्धा वेगळा करण्याची चिन्हे नजरेआड करता येणार नाहीत. त्रिभाजनात विधानसभेचा अडथळा येऊ नये यासाठीच जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीसोबतची युती तोडून विधानसभा डळमळीत केली आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, असे आंबेडकर म्हणाले.राज्यांच्या विभाजनाकरिता जनमताचा कौल आवश्यक असतो. संसदीय राजकारणात विधानसभेचा कौल हा जनमताचा कौल मानला जातो. त्यामुळे पक्षीय विधानसभा अस्तित्वात असण्यापेक्षा राष्ट्रपती राजवटीत राज्यपालांच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या हा कौल मिळवणे सोपे असते. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, त्यावरून उपरोक्त विभाजनाचा संशय येण्यास प्रबळ कारण उपलब्ध आहे. आजवरचा राजकीय तसेच महाराष्ट्राचा इतिहास बघता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे राजकारण सहज ध्यानात येईल. असेही आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर