शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

राज्याच्या त्रिभाजनाचा डाव; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:25 IST

सत्ता स्थापनेच्या नावाखाली सर्वत्र प्रादेशिक, राजकीय आणि भावनिक वाद आणि चर्चा चालविल्या जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला तिढा एक प्रकारचे राजकीय षड्यंत्र आहे. जम्मू-काश्मीरच्या धर्तीवर महाराष्ट्राचे त्रिभाजन करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठीच सत्ता स्थापनेच्या नावाखाली सर्वत्र प्रादेशिक, राजकीय आणि भावनिक वाद आणि चर्चा चालवल्या जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.वंचित आघाडीच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी भाजपसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही लक्ष्य केले. महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा भाजपचा डाव आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करून उर्वरित महाराष्ट्रातून विदर्भसुद्धा वेगळा करण्याची चिन्हे नजरेआड करता येणार नाहीत. त्रिभाजनात विधानसभेचा अडथळा येऊ नये यासाठीच जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीसोबतची युती तोडून विधानसभा डळमळीत केली आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, असे आंबेडकर म्हणाले.राज्यांच्या विभाजनाकरिता जनमताचा कौल आवश्यक असतो. संसदीय राजकारणात विधानसभेचा कौल हा जनमताचा कौल मानला जातो. त्यामुळे पक्षीय विधानसभा अस्तित्वात असण्यापेक्षा राष्ट्रपती राजवटीत राज्यपालांच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या हा कौल मिळवणे सोपे असते. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, त्यावरून उपरोक्त विभाजनाचा संशय येण्यास प्रबळ कारण उपलब्ध आहे. आजवरचा राजकीय तसेच महाराष्ट्राचा इतिहास बघता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे राजकारण सहज ध्यानात येईल. असेही आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर