शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्टेशनला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 01:43 IST

वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो मार्गावरील वर्सोवा ते अंधेरी मार्केट मार्गावरील जयप्रकाश रोड आणि अंधेरी (पूर्व) कडील अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांनाही बसला होता

मनोहर कुंभेजकर,

मुंबई- शुक्रवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो मार्गावरील वर्सोवा ते अंधेरी मार्केट मार्गावरील जयप्रकाश रोड आणि अंधेरी (पूर्व) कडील अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांनाही बसला होता. मेट्रो स्थानक झकास तर अंधेरी वर्सोवा मेट्रोखालील परिसर भकास अशीच अवस्था जणू मेट्रो रेल्वे स्थानकांखालील रस्त्यांची झाली होती. मेट्रोच्या छतातून अनेक ठिकाणी जमिनीवर अभिषेक होत होता. त्यामुळे आधीच खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या येथील रस्त्यांची खूपच दैनावस्था झाली होती.या मार्गावर इंडियन आॅईल स्थानकाजवळील अंधेरीकडे जाणाऱ्या जयप्रकाश रोडच्या रस्त्यावर तर अंधेरी-कुर्ला मार्गावरील एअरपोर्ट रोड या मेट्रो स्थानकानजीक मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातच मेट्रो स्थानकांच्या छतांमधून अनेक ठिकाणी वेगाने पाण्याची गळती होऊन त्याचा फटका वाहनांना आणि दुचाकीस्वारांना जास्त बसत होता. त्यामुळे मेट्रो स्टेशनच्या खालचा परिसर जलमय झाला होता.२००६ साली वर्सोवा घाटकोपर मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात होऊन ८ जून २०१४ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या मेट्रोचा शुभारंभ झाला. मात्र मेट्रोचे काम सुरू असतानाच मुंबई मेट्रो वन इन कंपनी आणि मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जयप्रकाश रोड आणि अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांवरील ड्रेनेज सिस्टीमकडे आणि छतामधून खाली पाणीगळती होणार नाही, याकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे मेट्रो सुरू झाल्यापासून गेली दोन वर्षे पावसाळ्यात या दोन्ही रस्त्यांवर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणत पाणी तुंबत असल्याचा आरोप वॉच डॉग फाउंडेशनचे ग्रॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी केला. या दोन्ही मार्गांवरील रस्त्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात चाळण झालेली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे अंधेरी-कुर्ला मार्गावर वाहतूककोंडी होत असून त्याचा फटका वाहनचालकांना बसत असल्याची माहिती त्यांनी दिली. >अधिकाऱ्यांचे दुर्लक्षमेट्रोचे काम सुरू असतानाच मुंबई मेट्रो वन इन कंपनी आणि मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जयप्रकाश रोड आणि अंधेरी-कुर्ला रोड या मुख्य रस्त्यांवरील ड्रेनेज सिस्टीमकडे तसेच छतामधून खाली पाणीगळती होणार नाही, याकडे गांभिर्याने लक्षच दिले नाही.