शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लोकसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांना सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 06:25 IST

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य घटकपक्षांसाठी एकूण सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य घटकपक्षांसाठी एकूण सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी ४२ जागा लढवणार असून उर्वरित सहा जागा घटकपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. यात स्वाभिमानी, भारिपसह माकप, रिपाइं कवाडे गट आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा समावेश असणार आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगले, माढा, वर्धा आणि बुलडाणा अशा चार जागांची मागणी केली होती. मात्र, हातकणंगलेच्या जोडीने आणखी एखादी जागा सोडण्याची आघाडीची तयारी असल्याचे समजते. तर, प्रकाश आंबेडकर यांच्याशी येत्या आठवडाभरात चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर आघाडीतील जागावाटपाबाबत अद्याप कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाटाघाटी जवळपास पूर्ण झाल्या आहेत. जागांच्या अदलाबदलीसह सर्व मुद्द्यांवर तोडगा निघाला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे. मात्र, आंबेडकरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी बैठकीनंतर सांगितले. जागावाटप नक्की झाले असले तरी घटकपक्षांशी चर्चा केल्यानंतरच याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.राज ठाकरे यांच्या भेटीबाबत पक्षातील अन्य नेत्यांना अवगत केले आहे. मनसे आणि राष्ट्रवादीतील चर्चा पूर्ण झाल्यानंतर याबाबत काँग्रेसशी बोलणी करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.‘पवार लढल्यास अन्यत्रही मिळेल फायदा’शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वच नेत्यांनी केला आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे आजूबाजूच्या मतदारसंघांवर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस