शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नका, मराठ्यांनो, घरावर पोस्टर लावा; मनोज जरांगेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 14:31 IST

कोट्यवधी मराठे सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली असं जरांगे पाटलांनी सांगितले.

सोलापूर - एक पेपर घ्यायचा. मोठ्या अक्षरात लिहायचं, मी मतदार, पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचं नाही असं लिहून दाराला चिटकवून टाका. उद्यापासून राज्यात ही मोहिम सुरू करा. आपल्या दुचाकी, चारचाकीला तेच कागद चिटकवायचे.  आता मतदान मागायला अमेरिकेत जाणार का? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आवाहन केले तसेच सरकारवर निशाणा साधला.  

वैराग इथं मनोज जरांगे पाटलांची सभा झाली, त्याठिकाणी ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात आला आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी गोरगरिब मराठा एकत्र आलाय. ५७ लाख नोंदी आतापर्यंत मिळाल्या आहेत. त्याचा आकडा ६३ लाख झालाय अशी माहिती आहे. ५७ लाखांच्या नोंदीतून आतापर्यंत १ ते सव्वा कोटी जनतेला आरक्षण मिळालंय. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयरे माध्यामातून अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करायची आणि त्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आज देऊ, उद्या देऊ करत करत सरकारने मराठ्यांचे ३ महिने घालवले. त्यानंतर मराठ्यांनी चलो मुंबईची हाक दिली. ओबीसी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचनेची गरज होती. एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती करायची त्यामुळे अधिसूचना होणे गरजेचे होते. हरकती मागवण्याची तारीख १६ होती. अधिवेशन १५ ला होणार होते. १० तारखेला उपोषण का सुरू केले असा काहींचा प्रश्न होता. याचे उत्तर आज इथं देतो. १६ तारखेपर्यंत सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणीची वाट बघितली असती आणि १५ तारखेला अधिवेशन होऊन गेले असते तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला नसता. १० तारखेला आमरण उपोषण सुरू केल्यामुळे सरकारला १५ चे अधिवेशन २० तारखेला घ्यावे लागले हे उपोषणाचं यश होते. २० तारखेला विधानसभेच्या पटलावर सरकारला सगेसोयरेबाबत चर्चा करावी लागली त्यामुळे अधिसूचनेचाही पटलावर नोंद झाली. १५ ला अधिवेशन झाले नसते तर हे पटलावर आले नसते असा दावा जरांगेंनी केला. 

दरम्यान, अधिसूचना मुख्यमंत्र्यांच्या हातातून घेतली. आता सरकारने वेगवेगळे डाव टाकायला सुरुवात केली. मी मध्ये बोललो ते खूप लागले. मी काही वाईट बोललो नाही. कोट्यवधी मराठे सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली. मित्रत्व तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभे केले नाही तर जातीसाठी उभे केले आहे. माझ्या अंतरवालीतील आई बहिणींची डोकी फुटली तेव्हा तुम्हाला का वाईट वाटलं नाही. नेत्याला बोललो म्हणून तुटून पडले असा टोला जरांगेंनी टीका करणाऱ्या मराठा नेत्यांना लगावला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण