शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नका, मराठ्यांनो, घरावर पोस्टर लावा; मनोज जरांगेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 14:31 IST

कोट्यवधी मराठे सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली असं जरांगे पाटलांनी सांगितले.

सोलापूर - एक पेपर घ्यायचा. मोठ्या अक्षरात लिहायचं, मी मतदार, पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचं नाही असं लिहून दाराला चिटकवून टाका. उद्यापासून राज्यात ही मोहिम सुरू करा. आपल्या दुचाकी, चारचाकीला तेच कागद चिटकवायचे.  आता मतदान मागायला अमेरिकेत जाणार का? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आवाहन केले तसेच सरकारवर निशाणा साधला.  

वैराग इथं मनोज जरांगे पाटलांची सभा झाली, त्याठिकाणी ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात आला आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी गोरगरिब मराठा एकत्र आलाय. ५७ लाख नोंदी आतापर्यंत मिळाल्या आहेत. त्याचा आकडा ६३ लाख झालाय अशी माहिती आहे. ५७ लाखांच्या नोंदीतून आतापर्यंत १ ते सव्वा कोटी जनतेला आरक्षण मिळालंय. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयरे माध्यामातून अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करायची आणि त्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आज देऊ, उद्या देऊ करत करत सरकारने मराठ्यांचे ३ महिने घालवले. त्यानंतर मराठ्यांनी चलो मुंबईची हाक दिली. ओबीसी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचनेची गरज होती. एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती करायची त्यामुळे अधिसूचना होणे गरजेचे होते. हरकती मागवण्याची तारीख १६ होती. अधिवेशन १५ ला होणार होते. १० तारखेला उपोषण का सुरू केले असा काहींचा प्रश्न होता. याचे उत्तर आज इथं देतो. १६ तारखेपर्यंत सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणीची वाट बघितली असती आणि १५ तारखेला अधिवेशन होऊन गेले असते तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला नसता. १० तारखेला आमरण उपोषण सुरू केल्यामुळे सरकारला १५ चे अधिवेशन २० तारखेला घ्यावे लागले हे उपोषणाचं यश होते. २० तारखेला विधानसभेच्या पटलावर सरकारला सगेसोयरेबाबत चर्चा करावी लागली त्यामुळे अधिसूचनेचाही पटलावर नोंद झाली. १५ ला अधिवेशन झाले नसते तर हे पटलावर आले नसते असा दावा जरांगेंनी केला. 

दरम्यान, अधिसूचना मुख्यमंत्र्यांच्या हातातून घेतली. आता सरकारने वेगवेगळे डाव टाकायला सुरुवात केली. मी मध्ये बोललो ते खूप लागले. मी काही वाईट बोललो नाही. कोट्यवधी मराठे सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली. मित्रत्व तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभे केले नाही तर जातीसाठी उभे केले आहे. माझ्या अंतरवालीतील आई बहिणींची डोकी फुटली तेव्हा तुम्हाला का वाईट वाटलं नाही. नेत्याला बोललो म्हणून तुटून पडले असा टोला जरांगेंनी टीका करणाऱ्या मराठा नेत्यांना लगावला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण