शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नका, मराठ्यांनो, घरावर पोस्टर लावा; मनोज जरांगेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 14:31 IST

कोट्यवधी मराठे सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली असं जरांगे पाटलांनी सांगितले.

सोलापूर - एक पेपर घ्यायचा. मोठ्या अक्षरात लिहायचं, मी मतदार, पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचं नाही असं लिहून दाराला चिटकवून टाका. उद्यापासून राज्यात ही मोहिम सुरू करा. आपल्या दुचाकी, चारचाकीला तेच कागद चिटकवायचे.  आता मतदान मागायला अमेरिकेत जाणार का? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आवाहन केले तसेच सरकारवर निशाणा साधला.  

वैराग इथं मनोज जरांगे पाटलांची सभा झाली, त्याठिकाणी ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात आला आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी गोरगरिब मराठा एकत्र आलाय. ५७ लाख नोंदी आतापर्यंत मिळाल्या आहेत. त्याचा आकडा ६३ लाख झालाय अशी माहिती आहे. ५७ लाखांच्या नोंदीतून आतापर्यंत १ ते सव्वा कोटी जनतेला आरक्षण मिळालंय. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयरे माध्यामातून अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करायची आणि त्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आज देऊ, उद्या देऊ करत करत सरकारने मराठ्यांचे ३ महिने घालवले. त्यानंतर मराठ्यांनी चलो मुंबईची हाक दिली. ओबीसी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचनेची गरज होती. एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती करायची त्यामुळे अधिसूचना होणे गरजेचे होते. हरकती मागवण्याची तारीख १६ होती. अधिवेशन १५ ला होणार होते. १० तारखेला उपोषण का सुरू केले असा काहींचा प्रश्न होता. याचे उत्तर आज इथं देतो. १६ तारखेपर्यंत सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणीची वाट बघितली असती आणि १५ तारखेला अधिवेशन होऊन गेले असते तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला नसता. १० तारखेला आमरण उपोषण सुरू केल्यामुळे सरकारला १५ चे अधिवेशन २० तारखेला घ्यावे लागले हे उपोषणाचं यश होते. २० तारखेला विधानसभेच्या पटलावर सरकारला सगेसोयरेबाबत चर्चा करावी लागली त्यामुळे अधिसूचनेचाही पटलावर नोंद झाली. १५ ला अधिवेशन झाले नसते तर हे पटलावर आले नसते असा दावा जरांगेंनी केला. 

दरम्यान, अधिसूचना मुख्यमंत्र्यांच्या हातातून घेतली. आता सरकारने वेगवेगळे डाव टाकायला सुरुवात केली. मी मध्ये बोललो ते खूप लागले. मी काही वाईट बोललो नाही. कोट्यवधी मराठे सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली. मित्रत्व तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभे केले नाही तर जातीसाठी उभे केले आहे. माझ्या अंतरवालीतील आई बहिणींची डोकी फुटली तेव्हा तुम्हाला का वाईट वाटलं नाही. नेत्याला बोललो म्हणून तुटून पडले असा टोला जरांगेंनी टीका करणाऱ्या मराठा नेत्यांना लगावला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण