शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

उद्धव ठाकरेंनी टक्केवारी बंद केली, म्हणून...; अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 16:44 IST

सत्तेचा दुरुपयोग आणि सूडाची भावना यातून ईडीची धाड टाकली जातेय. ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक धाडी टाकल्या जातायेत हे जनतेला कळतेय, सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती या धाडीतून दिसते असं दानवे म्हणाले.

मुंबई - उद्धव ठाकरेंनी टक्केवारी बंद केली म्हणूनच हे सगळे बंड घडले, जे गेलेत ते बदल्यांमध्ये कसे घेतात? काम कशारितीने विकतात? नुसता धिंगाणा सुरू आहे. मंत्रालयात जाऊन बघा काम कुणाला मिळते, काम कसे होते. हे सगळे बाहेर येईल. आम्ही सोडणार नाही. टक्केवारी तुमची बंद केली, धंदे बंद केले हे सहन न झाल्याने तुम्ही निघून गेला हे लोकांना दिसते अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला. 

अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी ठरवले असते तर हे बंड सहजपणे मोडून काढले असते. त्यांच्यासाठी फार काही अवघड नव्हते. परंतु ज्याच्या मनात गद्दारी रुजली आहे त्याला माझ्यासोबत का ठेवायचे असं ते म्हणत होते. ज्यावेळी बंड झाले तेव्हा तिथे गेलेले अनेक लोक उद्धव ठाकरेंसोबत होते, ते मुख्यमंत्री होते त्यामुळे ठरवले असते तर काहीही केले असते. यांना जाऊन द्यायचे नसते तर महाराष्ट्राची सीमा ओलांडून दिली नसती. पण सत्ता वाचवण्यासाठी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी यांच्यासारखे काम केले नाही. त्यांनी गद्दारी केली, भाजपाने फोडाफोडी केली, हे सत्तेसाठीच गेले होते असं त्यांनी सांगितले. 

तसेच सत्तेचा दुरुपयोग आणि सूडाची भावना यातून ईडीची धाड टाकली जातेय. ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक धाडी टाकल्या जातायेत हे जनतेला कळतेय, सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती या धाडीतून दिसते. काहीजण शिंदे गटात गेलेत त्यांच्याशी चौकशी व्हायला हवी. सगळ्यांना न्याय सारखा असावा. कोविड काळात देशपातळीवर जे काही घडले त्याचीही चौकशी व्हावी, तो काळ असा होता ज्या काळात २ पैसे जास्त की २ पैसे कमी पाहण्याचा वेळ नव्हता. मुंबईची चौकशी का, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर सगळीकडे चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही अंबादास दानवेंनी केली. 

दरम्यान,  ठाण्यात किती खरेदी केली अद्यापही काही सामानाचा वापर केला नाही. ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही. मुंबई महापालिका ही देशातील महत्त्वाची महापालिका आहे. ही पुढे नेण्याचे काम शिवसेनेने केले आहे. शहराच्या विकासासाठी केवळ काम करत नाही तर कोट्यवधीचे फिक्स डिपॉझिटही केले. परंतु गेल्या काळात महापालिकेत लुटालूट सुरू आहे. जी-२० च्या नावाखाली उधळपट्टी झाली आहे. त्याविरोधातच १ जुलैला मोर्चा होणार आहे असं दानवेंनी म्हटलं. 

शिंदेंचे मानसिक संतुलन बिघडलंय बंड फसले असते तर एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला गोळ्या घातल्या असत्या असं दीपक केसरकर म्हणतात. हे खरे असेल तर मानसिक संतुलन कुणाचे बिघडले हे दिसते. मानसिक संतुलन एकनाथ शिंदेंचे बिघडले आहे. ही गद्दारी भाजपाच्या तालावर, ईडीच्या भीतीने भ्रष्टाचार लपवण्यासाठी केली, शिवसेनेचे बोट धरून भाजपा महाराष्ट्रात फोफावली, तीच शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने केले असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.  

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा