शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 13:37 IST

ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली. 

जालना - पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी कुठे आणि कुणासोबत बैठका घेतल्या? मनोज जरांगे पाटलांनी अभ्यास न करता बोलू नये. सगळ्या जातींना घेऊन मुख्यमंत्री चालतो पण हे मुख्यमंत्री जरांगेंच्या तालावर नाचतात. जरांगे मनोरुग्ण माणूस आहे. सहा आंदोलनात सहा मागण्या करणारा हा माणूस आहे. मुख्यमंत्री मराठ्यांचं ऐकतो आणि दुसऱ्याचं ऐकत नाही. धनगर आणि ओबीसी वेगळे आहेत असं म्हणतो, त्याला माहिती नाही मग मुख्यमंत्र्यांना पण माहिती नाही का? असा सवाल करत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, मुख्यमंत्र्यांना धनगरांच्या एसटीबाबत जीआर काढण्याचा अधिकार नाही. हा संसदेचा अधिकार आहे. राष्ट्रपतीच्या सहीने पत्र जाते, त्यानंतर संसदेत मंजुरी मिळते, त्यानंतर हे आरक्षण मिळेल. या सरकारने जितके जीआर काढले ते बेकायदेशीर, अवैध आहेत. याआधीचे कोर्टाने दिलेले निकालपत्र वाचत नाहीत. कुणी आंदोलन केले तर समिती नेमली जाते. महाराष्ट्राच्या अटॉर्नी जनरलचं मुख्यमंत्री ऐकत नसतील. घटनेशी द्रोह मुख्यमंत्री करतायेत. २ नंबरचे धंदे करणाऱ्यांना आमदार, खासदारकीचे तिकीट देतात ते अठरापगड जातीचे प्रश्न कसे संसदेतील मांडतील. एकनाथ शिंदे हे २ नंबर टोळीचे नेतृत्व करतात, एका जातीसाठी ते काम करतात असा आमचा थेट आरोप आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिक्षण, नोकरीसाठी महाराष्ट्रात धनगरांसाठी वर्गीकरण केलंय, ते VJNT मध्ये. मात्र धनगर हे ओबीसीत आहेत. जरांगेंनी अभ्यास करावा. मराठा समाज मागासलेला आहे हे कुठल्याही आयोगात सिद्ध होत नाही. हैदराबाद गॅझेट लागू करणार असाल खरा कुणबी हा गोव्यात एससीमध्ये आहे. मराठा सामाजिक मागासलेला नाही. ते वतनदार, जहागिर आहेत. जरांगे तू हिटलर आहे का, तू आंदोलन करतो, गाव वेठीस धरतो तेव्हा इतरांना त्रास होत नाही का? भाजपाचा पराभव कर, निवडणुकीत उतर, उमेदवार उभे कर. जी लोक जबाबदार असतील त्यांना जरांगे बोलणार असतील तरच प्रश्न सुटेल अशी टीका लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर केली. 

दरम्यान, आमच्या आंदोलनाकडे, समस्यांकडे जे जे आमदार, खासदार, राजकीय पक्ष बोलले नाहीत या सगळ्यांवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. आम्ही फक्त ओबीसींना मतदान करणार आहोत. शरद पवारांनी मंडल आयोग लागू करताना ते मुख्यमंत्री होते. मग आमचे मागासवर्गीय आंदोलनावर का बोलत नाही, ओबीसी आंदोलनाकडे एकदाही पवार कुटुंब जात नाही. महाजातीयवादी शरद पवार आहेत. आमदारकी, खासदारकी आणि कारखानदारी कुणाकडे दिलीय ती यादी काढा. एक प्रतिनिधित्व दिले नाही असा आरोपही हाकेंनी केला. 

राहुल गांधींना मागितली भेटीची वेळ

पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्रात ओबीसी राहतात की नाही हे माहिती नाही. ते जरांगेंना जाऊन भेटतात. काँग्रेस ओबीसींबद्दल बोलत नाही. राहुल गांधी बोलतात, ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यांचे इथले नेते ओबीसींवर बोलत नाहीत. आम्ही राहुल गांधींची वेळ मागितली आहे. जोपर्यंत संस्थानिकांच्या हातात काँग्रेस तोपर्यंत किती आपटले तरी या संस्थानिकांपुरती काँग्रेस राहणार आहे असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं. 

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण