शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

स्वप्नरंजन खूप झाले आता लातूरकरांना पाणी हवे : अमित देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 18:04 IST

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणाबाजी नको, प्रत्यक्षात पाणी हवे आहेत. अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे.

मुंबई - दुष्काळग्रस्त आणि पाण्याची तीव्र टंचाई असणारा जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख आता केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवरही झालेली आहे. लातूर मधील भीषण पाणी टंचाईचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी मांडला. त्यानंतर, सरकारी आश्वासने आणि स्वप्नरंजन खूप झाले आता लातूरकरांना पाणी हवे, असे अमित देशमुख म्हणाले.

चार वर्षापसून लातूर जिल्ह्यातील जनता दुष्काळाच्या संकटात सापडली आहे. त्यामुळे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणाबाजी नको, प्रत्यक्षात पाणी हवे आहेत. अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) प्रश्नोत्तरेचा तासात पाण्या संदर्भातील चर्चा सुरू असतांना, सभागृहात लातूरच्या पाणी प्रश्नाची तीव्रता अमित देशमुख यांनी मांडली. रेल्वेने पाणी आणण्याचा अनुभव झाल्यांनतर वॉटरग्रीडचे स्वप्न दाखवले जात आहे. मात्र, वॉटरग्रीड संकल्पनेची प्रत्यक्षात अमलबजावणी व्हावी. ही फक्त निवडणुकीची घोषणा ठरू नयेत ही अपेक्षा असल्याचे अमित देशमुख म्हणाले.

२०१६ मध्ये दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमित पाणी पुरवठा होईल असे आश्वासन दिले होते. मात्र, आजही लातूरकरांना महिन्यातून केवळ दोन वेळा पाणी मिळते. अमृत योजनेंतर्गत सूर असलेले काम १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असताना, तीन वर्षानंतरही हे काम संथ गतीने सुरु असल्याची कैफियत अमित यांनी सभागृहात मांडली. अमृतयोजनेचे काम महिन्याभरात पूर्ण होईल असे आश्वासन फडणीस यांनी दिले असलेतरीही, उजणीच्या पाण्याबाबत मात्र मौन बाळगले, असल्याची टीका अमित देशमुख यांनी केली.