शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

स्वप्नरंजन खूप झाले आता लातूरकरांना पाणी हवे : अमित देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 18:04 IST

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणाबाजी नको, प्रत्यक्षात पाणी हवे आहेत. अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे.

मुंबई - दुष्काळग्रस्त आणि पाण्याची तीव्र टंचाई असणारा जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख आता केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवरही झालेली आहे. लातूर मधील भीषण पाणी टंचाईचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी मांडला. त्यानंतर, सरकारी आश्वासने आणि स्वप्नरंजन खूप झाले आता लातूरकरांना पाणी हवे, असे अमित देशमुख म्हणाले.

चार वर्षापसून लातूर जिल्ह्यातील जनता दुष्काळाच्या संकटात सापडली आहे. त्यामुळे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणाबाजी नको, प्रत्यक्षात पाणी हवे आहेत. अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) प्रश्नोत्तरेचा तासात पाण्या संदर्भातील चर्चा सुरू असतांना, सभागृहात लातूरच्या पाणी प्रश्नाची तीव्रता अमित देशमुख यांनी मांडली. रेल्वेने पाणी आणण्याचा अनुभव झाल्यांनतर वॉटरग्रीडचे स्वप्न दाखवले जात आहे. मात्र, वॉटरग्रीड संकल्पनेची प्रत्यक्षात अमलबजावणी व्हावी. ही फक्त निवडणुकीची घोषणा ठरू नयेत ही अपेक्षा असल्याचे अमित देशमुख म्हणाले.

२०१६ मध्ये दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमित पाणी पुरवठा होईल असे आश्वासन दिले होते. मात्र, आजही लातूरकरांना महिन्यातून केवळ दोन वेळा पाणी मिळते. अमृत योजनेंतर्गत सूर असलेले काम १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असताना, तीन वर्षानंतरही हे काम संथ गतीने सुरु असल्याची कैफियत अमित यांनी सभागृहात मांडली. अमृतयोजनेचे काम महिन्याभरात पूर्ण होईल असे आश्वासन फडणीस यांनी दिले असलेतरीही, उजणीच्या पाण्याबाबत मात्र मौन बाळगले, असल्याची टीका अमित देशमुख यांनी केली.