शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नाग व पिवळी नदी प्रकल्प अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 1:23 AM

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नद्या संवर्धन योजनेंतर्गत(एनआरसीपी) उपराजधानीचा ऐतिहासिक वारसा असलेल्या नागनदी सोबतच पिवळी नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.

ठळक मुद्देदिल्लीत लवकरच बैठक : १२५२.३२ कोटींचा प्रकल्प

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नद्या संवर्धन योजनेंतर्गत(एनआरसीपी) उपराजधानीचा ऐतिहासिक वारसा असलेल्या नागनदी सोबतच पिवळी नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. १२५२.३२ कोटींच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारने यापूर्वीच तत्त्वत: मान्यता दिली आहे. प्रकल्पासंदर्भात या आठवड्यात दिल्ली येथे बैठक बोलावण्यात आली आहे. यात या प्रकल्पाला हिरवी झेंडी मिळण्याची आशा आहे.प्रकल्पात केंद्र सरकारचा ६० टक्के, राज्य सरकारचा २५ तर महापालिकेचा १५ टक्के वाटा राहणार आहे. विशेष म्हणजे नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प अहवाल २०११ मध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरडीसी) यांच्याकडे पाठविला होता. तीन वर्षानंतर आॅगस्ट २०१४ मध्ये आयआयटी रुरकीच्या तज्ज्ञांनी नागनदीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रकल्प आराखड्यात काही बदल करून सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. यात नागनदी व बोर नाल्याचा समावेश होता. परंतु पिवळी नदी ही नागनदीची उपनदी असल्याने या नदीचाही या प्रकल्पात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे उत्तर व मध्य नागपुरातील दूषित पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. दोन्ही नद्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. दिल्लीत बैठक होत असल्याला प्रकल्प अभियंता मो. इसराईल यांनी दुजोरा दिला आहे. नद्यांचा प्रवाह शुद्ध करण्यासाठी नदीच्या दोन्ही काठावर सिवरेज लाईन टाकून त्यावर ठिकठिकाणी छोटे-छोटे मलनिस्सारण प्रकल्प उभारणे, नदीला संरक्षक भिंत, आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ते, हिरवळ व वृक्षारोपण आदी विकास कामांचा यात समावेश आहे.नद्यात येणारे सांडपाणी रोखणारनाग व पिवळी नदीत प्रक्रिया न करताच सोडण्यात येणारे सांडपाणी व कारखान्यातील दूषित पाणी रोखण्यात येणार आहे. यासाठी टाकण्यात येणाºया सिवरेज लाईन सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जोडण्यात येणार आहे. प्रकल्पात याचा समावेश करण्यात आला आहे.प्रक्रिया केंद्रावर ११०० कोटींचा खर्चनाग व पिवळी नदीचे पाणी प्रदूषणमुक्त मध्य व उत्तर नागपुरातील सिवरेज नद्यात सोडले जाऊ नये यासाठी उपयायोजना करण्यात येणार आहे. यात मलनिस्सारण केंद्रांची उभारणी व प्रक्रिया केंद्राला सिवरेज लाईन जोडण्यात येणार आहे. यावर ११०० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.