शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दरडी कोसळल्या, रस्त्यांना मधोमध तडे, पूलही खचले, सातपुड्यात मुसळधार पाऊस, नर्मदा खोऱ्यातील गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 07:09 IST

Nandurbar News: सातपुड्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा खोऱ्यातील गावांचा नंदुरबार जिल्हा आणि अक्कलकुवा तालुका मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे दरडी कोसळून रस्ता खंडित होण्यासह नदी-नाल्यांना पूर आल्याने ही स्थिती झाली आहे.

नंदुरबार -  सातपुड्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा खोऱ्यातील गावांचा नंदुरबार जिल्हा आणि अक्कलकुवा तालुका मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे दरडी कोसळून रस्ता खंडित होण्यासह नदी-नाल्यांना पूर आल्याने ही स्थिती झाली आहे. शनिवार रात्र ते रविवारी पहाटेपर्यंत पाऊस सुरू असल्याने दुर्गम भागात ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले आहे.

शनिवारी सायंकाळपासून अक्कलकुवा तालुक्यात पावसाला सुरुवात झाली होती. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मोलगी मंडळात रविवारी सकाळी ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. नर्मदा काठावरील मणिबेली, चिमलखेडी, वडफळी, मांडवा, पिंपळखुटा, मोलगी, भगदरी या परिसरातील गाव व पाड्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. 

वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले  नातेपुते (जि. सोलापूर) : नीरा नदीवरील वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून नदीपात्रात १५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू झाला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गंगापूर धरण ९७ टक्के भरलेनाशिक : गंगापूर धरण रविवारी ९७.१० टक्के इतके भरले. ५४६७ दलघफू इतका जलसाठा धरणात आहे.  

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरलाकणकवली : कणकवली शहरासह जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. अधूनमधून तुरळक सरी कोसळत आहेत. तर कडक ऊन पडत असल्याने वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५.२५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. यामध्ये देवगड तालुका १ मिलिमीटर, मालवण तालुका ११ मिलिमीटर, सावंतवाडी तालुका ३ मिलिमीटर, वेंगुर्ला तालुका २ मिलिमीटर, कणकवली तालुका ८ मिलिमीटर, कुडाळ तालुका ९ मिलिमीटर, वैभववाडी तालुका ३ मिलिमीटर, दोडामार्ग तालुका ५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

पंचगंगेची पातळी साडेतीन फुटांनी कमी कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. अधूनमधून जोरदार सरीही कोसळत होत्या, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी आहे. परिणामी नद्यांची पातळी झपाट्याने कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी साडेतीन फुटांने कमी झाली असून, अद्याप ३१ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चदंगड या तालुक्यात अधूनमधून जोरदार सरी काेसळत आहेत. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र