शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

दरडी कोसळल्या, रस्त्यांना मधोमध तडे, पूलही खचले, सातपुड्यात मुसळधार पाऊस, नर्मदा खोऱ्यातील गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 07:09 IST

Nandurbar News: सातपुड्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा खोऱ्यातील गावांचा नंदुरबार जिल्हा आणि अक्कलकुवा तालुका मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे दरडी कोसळून रस्ता खंडित होण्यासह नदी-नाल्यांना पूर आल्याने ही स्थिती झाली आहे.

नंदुरबार -  सातपुड्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा खोऱ्यातील गावांचा नंदुरबार जिल्हा आणि अक्कलकुवा तालुका मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे दरडी कोसळून रस्ता खंडित होण्यासह नदी-नाल्यांना पूर आल्याने ही स्थिती झाली आहे. शनिवार रात्र ते रविवारी पहाटेपर्यंत पाऊस सुरू असल्याने दुर्गम भागात ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले आहे.

शनिवारी सायंकाळपासून अक्कलकुवा तालुक्यात पावसाला सुरुवात झाली होती. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मोलगी मंडळात रविवारी सकाळी ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. नर्मदा काठावरील मणिबेली, चिमलखेडी, वडफळी, मांडवा, पिंपळखुटा, मोलगी, भगदरी या परिसरातील गाव व पाड्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. 

वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले  नातेपुते (जि. सोलापूर) : नीरा नदीवरील वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून नदीपात्रात १५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू झाला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गंगापूर धरण ९७ टक्के भरलेनाशिक : गंगापूर धरण रविवारी ९७.१० टक्के इतके भरले. ५४६७ दलघफू इतका जलसाठा धरणात आहे.  

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरलाकणकवली : कणकवली शहरासह जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. अधूनमधून तुरळक सरी कोसळत आहेत. तर कडक ऊन पडत असल्याने वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५.२५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. यामध्ये देवगड तालुका १ मिलिमीटर, मालवण तालुका ११ मिलिमीटर, सावंतवाडी तालुका ३ मिलिमीटर, वेंगुर्ला तालुका २ मिलिमीटर, कणकवली तालुका ८ मिलिमीटर, कुडाळ तालुका ९ मिलिमीटर, वैभववाडी तालुका ३ मिलिमीटर, दोडामार्ग तालुका ५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

पंचगंगेची पातळी साडेतीन फुटांनी कमी कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. अधूनमधून जोरदार सरीही कोसळत होत्या, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी आहे. परिणामी नद्यांची पातळी झपाट्याने कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी साडेतीन फुटांने कमी झाली असून, अद्याप ३१ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चदंगड या तालुक्यात अधूनमधून जोरदार सरी काेसळत आहेत. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र