शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
5
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
6
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
7
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
8
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
9
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
10
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
11
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
12
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
13
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
14
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
15
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
16
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
17
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
18
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
19
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
20
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका

दरडी कोसळल्या, रस्त्यांना मधोमध तडे, पूलही खचले, सातपुड्यात मुसळधार पाऊस, नर्मदा खोऱ्यातील गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 07:09 IST

Nandurbar News: सातपुड्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा खोऱ्यातील गावांचा नंदुरबार जिल्हा आणि अक्कलकुवा तालुका मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे दरडी कोसळून रस्ता खंडित होण्यासह नदी-नाल्यांना पूर आल्याने ही स्थिती झाली आहे.

नंदुरबार -  सातपुड्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा खोऱ्यातील गावांचा नंदुरबार जिल्हा आणि अक्कलकुवा तालुका मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे दरडी कोसळून रस्ता खंडित होण्यासह नदी-नाल्यांना पूर आल्याने ही स्थिती झाली आहे. शनिवार रात्र ते रविवारी पहाटेपर्यंत पाऊस सुरू असल्याने दुर्गम भागात ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले आहे.

शनिवारी सायंकाळपासून अक्कलकुवा तालुक्यात पावसाला सुरुवात झाली होती. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मोलगी मंडळात रविवारी सकाळी ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. नर्मदा काठावरील मणिबेली, चिमलखेडी, वडफळी, मांडवा, पिंपळखुटा, मोलगी, भगदरी या परिसरातील गाव व पाड्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. 

वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले  नातेपुते (जि. सोलापूर) : नीरा नदीवरील वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून नदीपात्रात १५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू झाला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गंगापूर धरण ९७ टक्के भरलेनाशिक : गंगापूर धरण रविवारी ९७.१० टक्के इतके भरले. ५४६७ दलघफू इतका जलसाठा धरणात आहे.  

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरलाकणकवली : कणकवली शहरासह जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. अधूनमधून तुरळक सरी कोसळत आहेत. तर कडक ऊन पडत असल्याने वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५.२५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. यामध्ये देवगड तालुका १ मिलिमीटर, मालवण तालुका ११ मिलिमीटर, सावंतवाडी तालुका ३ मिलिमीटर, वेंगुर्ला तालुका २ मिलिमीटर, कणकवली तालुका ८ मिलिमीटर, कुडाळ तालुका ९ मिलिमीटर, वैभववाडी तालुका ३ मिलिमीटर, दोडामार्ग तालुका ५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

पंचगंगेची पातळी साडेतीन फुटांनी कमी कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. अधूनमधून जोरदार सरीही कोसळत होत्या, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी आहे. परिणामी नद्यांची पातळी झपाट्याने कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी साडेतीन फुटांने कमी झाली असून, अद्याप ३१ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चदंगड या तालुक्यात अधूनमधून जोरदार सरी काेसळत आहेत. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र