शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

मध्य रेल्वे मार्गावर २१ ठिकाणी रुळांखाली भूस्खलन; रेल्वेसेवा सुरळीत करण्याचं प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 19:45 IST

17 ठिकाणी कल्याण-पुणे मार्गावर, 4 ठिकाणी नाशिक मार्गावर भूस्खलन

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या टिटवाळा-इगतपुरी आणि अंबरनाथ-लोणावळा मार्गावरील भोर आणि थळ घाटात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे कडे कोसळले, रेल्वे रूळ वाहून जाणे, रुळावर माती साचणे, जलभराव,  झाडे पडणे,  ओएचई व सिग्नल पोस्टचे नुकसान इत्यादीमुळे दोन्ही विभागांवरील रेल्वे सेवा प्रभावित झाली. दक्षिणपूर्व घाटावर सुमारे २१ ठिकाणी भूस्खलन / पावसाच्या अडथळ्यांची ज्यात ३ ठिकाणी जास्त प्रमाणात क्षति झाल्याची नोंद झाली. २०० मजुरांसह ४ जेसीबी आणि २ पोकलेन क्षतिग्रस्त ठिकाणी पोहोचले आहेत आणि युद्धपातळीवर काम करत आहेत.

पाणी भरणे, रुळाखालील माती वाहून जाणे, भूस्खलन, घाटा मध्ये कडे कोसळणे, नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहणे इत्यादीमुळे सुमारे २१ ठिकाणी अडथळे निर्माण झाले होते. सुमारे ४३०० घन मीटर रुळाखालील माती वाहून गेली. सुमारे १९००  घन मीटर एवढे भूस्खलन व दरडी कोसळल्या. विविध ठिकाणी काम करणाऱ्या  कामगारांचा मागोवा: एकूण ९५० कामगार, सुपरवायझर ७५ आणि अधिकारी ३८ अविरतपणे रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी कार्यरत आहेत.

कसारा येथे अवघ्या चार तासांत झालेला १३६ मिमी पाऊस आणि कर्जतमध्ये एका तासामध्ये (मध्यरात्री १.०० ते २.०० वाजेपर्यंत) झालेला ८६.६ मिमी पाऊस यावरून मध्यरात्रीपासून झालेल्या पावसाच्या तीव्रतेचा अंदाज घेतला जाऊ शकतो. हे प्रसिद्धी पत्रक जारी होईपर्यंत कर्जत येथे १५७.७ मिमी आणि लोणावळ्यात १७८ मिमी पावसाची नोंद झाली.त्यानुसार महाव्यवस्थापक अलोक कंसल यांनी रेल्वे सेवा त्वरित पूर्ववत करण्यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त महाव्यवस्थापक, प्रधान विभागीय मुख्याधिकारी, इतर  मुख्याधिकारी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक व अन्य वरिष्ठ अधिकारी अविरतपणे कार्यरत आहेत. बोल्डर विशेष गाड्या, विविध मशीन्स, मजूर इत्यादी प्रभावित ठिकाणी कार्यरत आहेत.मध्य रेल्वे प्रशासनाने दोन स्थानकांच्या मध्ये गाड्या अडकून पडू नये यासाठी विशेष काळजी घेत,  कसारा, इगतपुरी, बदलापूर, खडावली इत्यादी स्थानकांवर गाड्यांचे नियमन केले. अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले, तर काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येऊन तेथूनच परत पाठविण्यात आल्या.

मुसळधार पाऊस, रस्त्यावरील अडथळे असूनही, मुंबईच्या पथकाने मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली पडलेले कडे बाजूला करणे, पडलेली झाडे बाजुला सारून, ट्रॅक वॉशआउट वगैरे अडथळे दूर करीत, थळ घाट विभागात अडकलेल्या तीन गाड्या आणि भोर घाट विभागातील एक गाडीसाठी मार्ग तयार करून  सुरक्षित स्थानकापर्यंत नेण्यात आल्या. एनडीआरएफच्या टीमलाही बोलविण्यात आले आणि कसारा येथे कोणत्याही घटनेसाठी तयार ठेवले.

मदत केंद्रे  अडकलेल्या प्रवाशांच्या माहितीसाठी कल्याण, कसारा, इगतपुरी आणि लोणावळा येथे मदत केंद्र  उघडण्यात आले. प्रवाशांच्या वाहतुकीसाठी कसारा व इगतपुरी येथे बसेसची व्यवस्था करण्यात आली.  नियमन केलेल्या गाड्यांमधील प्रवाश्यांसाठी स्थानकांवर चहा, कॉफी, स्नॅक्स सारख्या नाश्त्याची व्यवस्था केली गेली. प्रवाशांच्या सोयीसाठी केटरिंग स्टॉल्सही सुरू करण्यात आले. यासंदर्भात सतत उदघोषणा देखील करण्यात आल्या. इगतपुरीहून 75 बसेस (इगतपुरी ते कल्याणकडे जाणाऱ्या ४८३५ प्रवाशांसाठी); कसारा येथे 29 बसेस (कसारा ते कल्याणकडे जाणार्‍या १२४९ प्रवाशांसाठी) व्यवस्था करण्यात आली.महामार्ग खंडित असूनही 2 बोल्डर स्पेशल, 4 बालास्ट रॅक, 2 पोकलेन्स आणि 4 जेसीबी कामगार व यंत्रसामग्रीसह त्वरित पाठविण्यात आले आहेत. प्रभावित ठिकाणी अधिक मशीन्स तैनात करण्यात येत  आहेत.अंबरनाथ-बदलापूर विभाग १२ तासांच्या विक्रमी वेळेत दुरुस्त करण्यात आला आणि उपनगरी सेवा अंबरनाथ ते बदलापूरपर्यंत १०.३५ वाजता वाढविण्यात आल्या.उंबरमाली - ०५.३० वाजता डाऊन लाईन व ०७.१५ वाजता अप लाईन मार्ग सुरक्षित असल्याचे सांगण्यात आलेचौक येथे ११.११ वाजता ट्रॅक सेफ देण्यात आला

पनवेल-कर्जत विभागातील गिट्टी भरुन घेण्यात आले आणि १०.१५ वाजता ट्रॅक फिट देण्यात आले.वासिंद - खडावली विभागात १०० हून अधिक मजूर काम करीत आहेत दुरुस्तीचे काम १३.२१ वाजता पूर्ण झाले, कसारा-इगतपुरी दरम्यान १३.१२ वाजता अप आणि डाऊन लाईन फीट देण्यात आले.

बदलापूर ते कर्जत दरम्यान भिवपुरी रोड येथे सुमारे 25 मजूर सेवा पूर्ववत करण्याच्या कामावर आहेत. बदलापूर - वांगणी विभागातील पुराचे पाणी कमी झाल्यावर रुळांच्या स्थितीचे मूल्यांकन केले जाणार आहे.गुरुवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत इंटरसिटी गाड्यांसह लांब पल्ल्याच्या ३४ गाड्या रद्द केल्या; लांब पल्ल्याच्या २६ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले;  इंटरसिटी गाड्यांसह लांब पल्ल्याच्या ३६ गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या, लांब पल्ल्याच्या ६ गाड्या टर्मिनेट केलेल्या स्थानकातूनच सोडण्यात आल्या.

उपनगरी गाड्या सुरुवातीला केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - अंबरनाथ / टिटवाला विभागात धावत होत्या. सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बदलापूर पर्यंत सेवा सुरू करण्यात आल्या. उत्तर- पूर्व घाट विभागातील अप व डाऊन लाईन्स १३.१५ वाजता सुरक्षित करण्यात आल्या आणि १५.०० वाजता कल्याण-कसारा विभागावर वाहतुकीस सुरुवात झाली. यादरम्यानच्या   काळात हार्बर लाइन,  ट्रान्स हार्बर लाइन आणि चौथा कॉरिडोर (नेरुळ / बेलापूर-खारकोपर विभाग) सेवा सुरु होत्या. त्याविषयीची माहिती उदघोषणांच्या माध्यमातून सतत उपलब्ध करुन दिली जात होती. याशिवाय सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून नियमित अपडेट देण्यात आली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेlandslidesभूस्खलन