शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

By admin | Updated: December 11, 2015 02:05 IST

मुंबई-बडोदरा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी भूसंपादनाचे काम सरकारने सुरू केले असून, त्या संदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या महामार्गासाठी अंबरनाथ तालुक्यातील

पंकज पाटील , अंबरनाथमुंबई-बडोदरा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी भूसंपादनाचे काम सरकारने सुरू केले असून, त्या संदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या महामार्गासाठी अंबरनाथ तालुक्यातील ३९५ सातबाऱ्यांवरील १२६.९८ हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात येणार आहे. मुंबई जेएनपीटी ते बडोदरा राष्ट्रीय महामर्गाला मंजुरी मिळाल्यावर या रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वर्षभरापासून प्रलंबित होती. अखेर केंद्र सरकारने या कामाला सुरुवात केली असून, तो ज्या तालुक्यातून जातो, त्या तालुक्याच्या गावांमधील शेतजमीन ताब्यात घेण्याचे काम शासनाने सुरूकेले आहे. शहापूर, कल्याण तालुक्यापाठोपाठ अंबरनाथ तालुक्यातील जागा संपादनाचा प्रश्न प्रलंबित होता. अंबरनाथ तालुक्यातील जागा ताब्यात घेण्यासाठी बाधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. येथील १० गावांमधील शेतजमीन बाधित होत असून, त्यात सर्वाधिक जागा ही बदलापूर आणि एरंजाड गावातील आहे. या रस्त्यांचे भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यावरच, या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. हा रस्ता पूर्ण झाल्यास बदलापूर आणि अंबरनाथ शहर हे नाशिक महामर्गाला आणि मुंबई - पुणे महामार्गाला जोडले जाणार आहे, तसेच पुण्याला जाण्याठी सर्वात जवळचा रस्ता होणार आहे. >>> बडोदरा -घोडबंदरवरून हा महामार्ग नाशिक महामार्गावरील पडघ्यापर्यंत पूर्ण झाला असून, पडघा ते पनवेलपर्यंतच्या रस्त्याचे काम शिल्लक आहे. या मार्गावरील शेतजमीन अद्याप ताब्यात घेतली नाही. या मार्गावरील सर्वाधिक जमीन ही अंबरनाथ तालुक्यातील आहे. अंबरनाथ तालुक्यातील रस्त्याचे काम हे भोज गावापर्यंत जात असून, पुढे डोंगरातून बोगद्यामार्गे (टनेल) हा रस्ता पनवेलला जोडण्यात येणार आहे. येथून तो मुंबई आणि जेएनपीटीला जोडण्यात येणार आहे.>>> बदलापूर शहरातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार असल्याने, बदलापूर शहर हे सर्व महामर्गांचे केंद्रबिंदू ठरणार आहे. पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर आणि बडोदरा या महामार्गांकडे जाण्यासाठी बदलापूरकरांना आणि परिसरातील शहरांना सोईचे होणार आहे. - किसन कथोरे, आमदार, मुरबाड विधानसभा