शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

लालपरीचे प्रवासी 29 लाखांवर; एसटीचे चाक येतेय रुळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 09:52 IST

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. कोरोनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटीसाठी एप्रिल  ते जून हा जास्त उत्पनाचा कालावधी असतो.  कोरोना पूर्व काळात दररोज ६५ लाख जण एसटीने प्रवास करीत होते. संपातून  कर्मचारी पुन्हा कामावर आल्यानंतर गाड्यांची संख्याही वाढत आहे, तसेच प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटी प्रवासी संख्या २९ लाख पार गेली असून, उत्पन्न १७  कोटींपर्यंत गेले आहे. 

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. कोरोनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर एसटीचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच  ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपामुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.   कोरोनापूर्व  काळात एसटीच्या १८ हजार गाड्या धावत होत्या. या गाड्यांच्या एक लाख फेऱ्या  होत होत्या. त्यातून  ६५ लाख  जण प्रवास करीत होते, तर २४  कोटींचे उत्पन्न मिळत होते. सध्या १३१४७ गाड्या सुरू असून,  त्यातून २८.६४ लाख जण प्रवास करीत आहेत, तर १६. ८३ कोटींचे  उत्पन्न  मिळत आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

९०६४६ कर्मचारी उपस्थित     एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संप सुरू होता.     मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.     बुधवारपर्यंत ९०६४६ कर्मचारी उपस्थित झाले आहेत. 

टॅग्स :state transportएसटी