शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लाड यांना विधान परिषदेचा प्रसाद, माधव भंडारींना धक्का, काँग्रेसतर्फे दिलीप माने यांनी भरला अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 06:23 IST

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना डावलून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले आणि अल्पावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती बनलेले प्रसाद लाड यांना

 विशेष प्रतिनिधी  मुंबई : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना डावलून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले आणि अल्पावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती बनलेले प्रसाद लाड यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.७ डिसेंबरला होणा-या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार शेवटचा दिवस होता. भाजपाकडून मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र उमेदवारी कोणाला द्यायची यावर रविवारी रात्रभर भाजपामध्ये खल झाला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पहाटेपर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते. प्रसाद लाड यांनी रात्रीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळवून बाजी मारल्याने अखेर लाड यांच्या गळ्यात उमेदवारी पडली. यापूर्वी मनसेतून आलेले प्रवीण दरेकर, काँग्रेसी नेत्यांशी जवळीक असलेले आर.एन. सिंह या नेत्यांना भाजपाने विधान परिषदेची संधी दिली आहे. लाड हेही राष्टÑवादीतून आलेले आहेत.लाड यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. असे असले तरी ‘प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी अदृश्य ‘बाण’ (शिवसेना) चमत्कार करेल,’ असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लाड यांच्या विजयाबाबत शंका घेणारे पिल्लू सोडले आहे.अशी ठरली उमेदवारीभाजपाचा उमेदवार ठरविण्यासाठी चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत माधव भंडारी, प्रसाद लाड यांच्यासह चार नावांवर चर्चा झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. दानवे आणि इतर काही नेत्यांनी काल रात्री झालेल्या बैठकीत लाड यांचे नाव निश्चित केले. लाड यांनी रात्रीच मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले.विजय निश्चितविधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या या एका जागेसाठी संख्याबळाचा विचार करता लाड यांचा विजय निश्चित आहे. भाजपाचे १२२ व शिवसेनेचे ६३ असे १८५ संख्याबळ लाड यांच्या पाठीशी आहे. अपक्ष व लहान पक्षांचे मिळून किमान १५ आमदार भाजपासोबत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१ असे एकूण ८३ संख्याबळ होते. लहान पक्षांपैकी काहींनी त्यांना पाठिंबा दिला तरी मतांची शंभरी गाठणेही अशक्य आहे...तर शिवसेनेची मते फुटली असती : राणेभाजपाने मला उमेदवारी दिली असती तर शिवसेनेची मते फुटली असती आणि मी जिंकलो असतो, असा दावा महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला. ते म्हणाले, माझ्याविरोधात काँग्रेस, राष्टÑवादी व शिवसेना एकत्र आले, यातच माझा विजय आहे.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र