शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

लाड यांना विधान परिषदेचा प्रसाद, माधव भंडारींना धक्का, काँग्रेसतर्फे दिलीप माने यांनी भरला अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 06:23 IST

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना डावलून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले आणि अल्पावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती बनलेले प्रसाद लाड यांना

 विशेष प्रतिनिधी  मुंबई : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना डावलून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले आणि अल्पावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती बनलेले प्रसाद लाड यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.७ डिसेंबरला होणा-या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार शेवटचा दिवस होता. भाजपाकडून मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र उमेदवारी कोणाला द्यायची यावर रविवारी रात्रभर भाजपामध्ये खल झाला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पहाटेपर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते. प्रसाद लाड यांनी रात्रीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळवून बाजी मारल्याने अखेर लाड यांच्या गळ्यात उमेदवारी पडली. यापूर्वी मनसेतून आलेले प्रवीण दरेकर, काँग्रेसी नेत्यांशी जवळीक असलेले आर.एन. सिंह या नेत्यांना भाजपाने विधान परिषदेची संधी दिली आहे. लाड हेही राष्टÑवादीतून आलेले आहेत.लाड यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. असे असले तरी ‘प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी अदृश्य ‘बाण’ (शिवसेना) चमत्कार करेल,’ असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लाड यांच्या विजयाबाबत शंका घेणारे पिल्लू सोडले आहे.अशी ठरली उमेदवारीभाजपाचा उमेदवार ठरविण्यासाठी चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत माधव भंडारी, प्रसाद लाड यांच्यासह चार नावांवर चर्चा झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. दानवे आणि इतर काही नेत्यांनी काल रात्री झालेल्या बैठकीत लाड यांचे नाव निश्चित केले. लाड यांनी रात्रीच मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले.विजय निश्चितविधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या या एका जागेसाठी संख्याबळाचा विचार करता लाड यांचा विजय निश्चित आहे. भाजपाचे १२२ व शिवसेनेचे ६३ असे १८५ संख्याबळ लाड यांच्या पाठीशी आहे. अपक्ष व लहान पक्षांचे मिळून किमान १५ आमदार भाजपासोबत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१ असे एकूण ८३ संख्याबळ होते. लहान पक्षांपैकी काहींनी त्यांना पाठिंबा दिला तरी मतांची शंभरी गाठणेही अशक्य आहे...तर शिवसेनेची मते फुटली असती : राणेभाजपाने मला उमेदवारी दिली असती तर शिवसेनेची मते फुटली असती आणि मी जिंकलो असतो, असा दावा महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला. ते म्हणाले, माझ्याविरोधात काँग्रेस, राष्टÑवादी व शिवसेना एकत्र आले, यातच माझा विजय आहे.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र