शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

लाड यांना विधान परिषदेचा प्रसाद, माधव भंडारींना धक्का, काँग्रेसतर्फे दिलीप माने यांनी भरला अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 06:23 IST

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना डावलून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले आणि अल्पावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती बनलेले प्रसाद लाड यांना

 विशेष प्रतिनिधी  मुंबई : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना डावलून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले आणि अल्पावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती बनलेले प्रसाद लाड यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.७ डिसेंबरला होणा-या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार शेवटचा दिवस होता. भाजपाकडून मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र उमेदवारी कोणाला द्यायची यावर रविवारी रात्रभर भाजपामध्ये खल झाला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पहाटेपर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते. प्रसाद लाड यांनी रात्रीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळवून बाजी मारल्याने अखेर लाड यांच्या गळ्यात उमेदवारी पडली. यापूर्वी मनसेतून आलेले प्रवीण दरेकर, काँग्रेसी नेत्यांशी जवळीक असलेले आर.एन. सिंह या नेत्यांना भाजपाने विधान परिषदेची संधी दिली आहे. लाड हेही राष्टÑवादीतून आलेले आहेत.लाड यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. असे असले तरी ‘प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी अदृश्य ‘बाण’ (शिवसेना) चमत्कार करेल,’ असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लाड यांच्या विजयाबाबत शंका घेणारे पिल्लू सोडले आहे.अशी ठरली उमेदवारीभाजपाचा उमेदवार ठरविण्यासाठी चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत माधव भंडारी, प्रसाद लाड यांच्यासह चार नावांवर चर्चा झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. दानवे आणि इतर काही नेत्यांनी काल रात्री झालेल्या बैठकीत लाड यांचे नाव निश्चित केले. लाड यांनी रात्रीच मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले.विजय निश्चितविधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या या एका जागेसाठी संख्याबळाचा विचार करता लाड यांचा विजय निश्चित आहे. भाजपाचे १२२ व शिवसेनेचे ६३ असे १८५ संख्याबळ लाड यांच्या पाठीशी आहे. अपक्ष व लहान पक्षांचे मिळून किमान १५ आमदार भाजपासोबत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१ असे एकूण ८३ संख्याबळ होते. लहान पक्षांपैकी काहींनी त्यांना पाठिंबा दिला तरी मतांची शंभरी गाठणेही अशक्य आहे...तर शिवसेनेची मते फुटली असती : राणेभाजपाने मला उमेदवारी दिली असती तर शिवसेनेची मते फुटली असती आणि मी जिंकलो असतो, असा दावा महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला. ते म्हणाले, माझ्याविरोधात काँग्रेस, राष्टÑवादी व शिवसेना एकत्र आले, यातच माझा विजय आहे.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र