शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

कोरेगाव-भीमाचा अहवाल एक महिन्यात राज्य सरकारला सादर करणार, सी.एल. थूल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 14:42 IST

कोरेगाव-भीमा प्रकरणात 3 जानेवारीला पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलना दरम्यान सवर्ण व दलितांवर पोलिसांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्याने सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाला प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

कल्याण : कोरेगाव-भीमा प्रकरणात 3 जानेवारीला पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलना दरम्यान सवर्ण व दलितांवर पोलिसांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्याने सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाला प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाचा समग्र अहवाल एका महिन्यात राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती अनूसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल यांनी दिली आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणात बंद पुकारण्यात आला. त्याचे पडसाद कल्याण, वढू, कोरेगाव-भीमा, औरंगाबाद, नाशिक आणि नगर येथे जास्त प्रमाणात उमटले. दलित आणि सवर्ण यांच्यात संघर्ष झाला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. ही चौकशी होणार आहे. दरम्यान दलितांच्या तक्रारीवरुन सवर्णांच्या विरोधात अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत तर सवर्णाच्या तक्रारीवरुन दलितांच्या विरोधात प्राणघातक हल्ला कलम 307 अन्वये गंभीर स्वरुपाचे गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहे.  पोलिसांची भूमिका यात संशयास्पद आहे. सवर्ण आणि दलित समाजाकडून सरकराकडे याविषयी अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. चार दिवसापूर्वीच सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या आयोगास प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करणो, पिडीतांशी बोलणो. त्याचबरोबर पोलिसांचे म्हणणो काय आहे हे जाणून घेणो. त्याचा अहवाल सरकारला सादर करणो असे आदेश दिले आहे. सरकारच्या आदेशानुसार आयोगाचे सदस्य सी. एल. थूल व एम. बी. गायकवाड या दोन सदस्यांनी पहिली भेट कल्याण पश्चिमेतील चिंचपाडा व सिद्धार्थ नगरात दिली. त्याठिकाणी लोकांच्या भेटी घेतली. त्यानंतर कल्याण शासकीय विश्रम गृहात सवर्ण व दलित समाजाच्या लोकप्रतिनिधी व पिडीतांचे म्हणणो जाणून घेतले. या आंदोलन प्रकरणी विद्यार्थी, एमसीएससीला परिक्षा देणारे परिक्षार्थी तरुण यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर सरकारी व निमसरकारी नोकरदारांच्या विरोधातही गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे त्यांचे करिअर संपुष्टात येऊ शकते. याची शहानिशा करुन जे या प्रकरणात दोषी नाही. त्यांच्यावर अन्याय होऊ नये. त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात यावे हे आयोगाकडून जाणून घेतले जाणार आहे. कल्याणमध्ये या घटनेचा उद्रेक जास्त प्रमाणात झाला. सवर्ण आणि दलित समाजावर अन्याय होऊ नये असा समग्र अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे असे थूल यांनी स्पष्ट केले. पहिली भेट कल्याणला...अनूसुचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल व एम.बी. गायकवाड यांनी आज कल्याणला प्रथम भेट दिली आहे. त्यानंतर हे दोन्ही सदस्य वढू, कोरेगाव-भीमा, औरंगाबाद, नाशिक आणि नगरला भेट देऊन त्याठिकाणची परिस्थिती जाणून घेणार आहेत. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे, घटनेचे फोटोग्राफ्स,व्हीडीओ, सीसी टीव्ही फूटेज हा सगळा दस्ताऐवज ही पाहिला जाणार आहे. पोलिसांकडून तो सादर केला जाणार आहे. लोकांच्या भेटी, प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट हे सगळे पाहून समग्र व वस्तूस्थिती दर्शक अहवाल सादर केला जाणार आहे. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव