शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोरेगाव भीमा प्रकरण; आणखी एका न्यायाधीशांनी करून घेतली स्वत:ची सुटका, सुनावणी घेण्यास नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 11:02 IST

आता या आठवड्यापासून न्या. शुक्रे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बदली करण्यात आली. त्यामुळे न्या. साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढील पटलावर हे प्रकरण आले.

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी घेण्यापासून उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या न्यायाधीशांनी सुटका करून घेतली. न्या. साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंगळवारी सुनावणी घेण्यास नकार दिला. याआधी न्या. पी. बी. वराळे, न्या. एस. एस. शिंदे या दोन्ही न्यायाधीशांनी कोरेगाव भीमा प्रकरणावरील सुनावणी घेण्यास नकार दिला. मंगळवारी हे प्रकरण सुनावणीला येताच न्या. साधना जाधव यांनी ‘हे प्रकरण माझ्यापुढे नाही’ असे म्हटले.न्या. जाधव यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण सुनावणीला येण्यापूर्वी अनेक खंडपीठांपुढे सुनावणीला आले होते.

२०२० ते २०२१ पर्यंत या प्रकरणावर न्या. एस. एस. शिंदे हेच सुनावणी घेत होते. २०२१ च्या अखेरीस असाइनमेंट बदलल्याने हे प्रकरण न्या. एन. एम. जामदार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे हे प्रकरण सुनावणीस आले. त्यानंतर न्या. वराळे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे कोरेगाव भीमा प्रकरणाची सुनावणी आली. मात्र, न्या. वराळे यांनी सुनावणी घेण्यास नकार देत पर्यायी खंडपीठापुढे जाण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले. त्यावेळी न्या. एस. एस. शिंदे यांनीही आपण या याचिकांवर सुनावणी घेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. या प्रकरणावरील सुनावणी घेण्याबाबत प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी मुख्य न्यायाधीशांशी संपर्क करण्याची सूचना याचिकाकर्त्यांच्या वकिलांना केली. त्यानंतर न्या. एस. बी. शुक्रे व न्या. जी. ए. सानप यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली. या खंडपीठाने वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन अर्ज फेटाळत त्यांच्या वैद्यकीय जामिनात तीन महिन्यांची मुदतवाढ केली.

पुन्हा साधावा लागणार मुख्य न्यायाधीशांकडे संपर्क -आता या आठवड्यापासून न्या. शुक्रे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बदली करण्यात आली. त्यामुळे न्या. साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढील पटलावर हे प्रकरण आले. मात्र, न्या. जाधव यांनीही सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता रोना विल्सन, शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग व अन्य आरोपींच्या वकिलांना पुन्हा एकदा मुख्य न्यायाधीशांकडे संपर्क साधावा लागेल. 

टॅग्स :Courtन्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार