शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

कोरेगाव भीमा प्रकरण; आणखी एका न्यायाधीशांनी करून घेतली स्वत:ची सुटका, सुनावणी घेण्यास नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 11:02 IST

आता या आठवड्यापासून न्या. शुक्रे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बदली करण्यात आली. त्यामुळे न्या. साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढील पटलावर हे प्रकरण आले.

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी घेण्यापासून उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या न्यायाधीशांनी सुटका करून घेतली. न्या. साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंगळवारी सुनावणी घेण्यास नकार दिला. याआधी न्या. पी. बी. वराळे, न्या. एस. एस. शिंदे या दोन्ही न्यायाधीशांनी कोरेगाव भीमा प्रकरणावरील सुनावणी घेण्यास नकार दिला. मंगळवारी हे प्रकरण सुनावणीला येताच न्या. साधना जाधव यांनी ‘हे प्रकरण माझ्यापुढे नाही’ असे म्हटले.न्या. जाधव यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण सुनावणीला येण्यापूर्वी अनेक खंडपीठांपुढे सुनावणीला आले होते.

२०२० ते २०२१ पर्यंत या प्रकरणावर न्या. एस. एस. शिंदे हेच सुनावणी घेत होते. २०२१ च्या अखेरीस असाइनमेंट बदलल्याने हे प्रकरण न्या. एन. एम. जामदार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे हे प्रकरण सुनावणीस आले. त्यानंतर न्या. वराळे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे कोरेगाव भीमा प्रकरणाची सुनावणी आली. मात्र, न्या. वराळे यांनी सुनावणी घेण्यास नकार देत पर्यायी खंडपीठापुढे जाण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले. त्यावेळी न्या. एस. एस. शिंदे यांनीही आपण या याचिकांवर सुनावणी घेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. या प्रकरणावरील सुनावणी घेण्याबाबत प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी मुख्य न्यायाधीशांशी संपर्क करण्याची सूचना याचिकाकर्त्यांच्या वकिलांना केली. त्यानंतर न्या. एस. बी. शुक्रे व न्या. जी. ए. सानप यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली. या खंडपीठाने वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन अर्ज फेटाळत त्यांच्या वैद्यकीय जामिनात तीन महिन्यांची मुदतवाढ केली.

पुन्हा साधावा लागणार मुख्य न्यायाधीशांकडे संपर्क -आता या आठवड्यापासून न्या. शुक्रे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बदली करण्यात आली. त्यामुळे न्या. साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढील पटलावर हे प्रकरण आले. मात्र, न्या. जाधव यांनीही सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता रोना विल्सन, शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग व अन्य आरोपींच्या वकिलांना पुन्हा एकदा मुख्य न्यायाधीशांकडे संपर्क साधावा लागेल. 

टॅग्स :Courtन्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार