शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित, पोलिसांचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:04 IST

कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असून त्यासाठी सवर्ण समाजातील काही गट अनेक दिवसांपासून तयारी करत होते. घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेरून हजारोंच्या संख्येने येणा-यांना कसलीही मदत करावयाची नाही, इथपर्यंतच्या बाबींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अतिवरिष्ठ अधिका-यांनी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे.

- जमीर काझीमुंबई  - कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असून त्यासाठी सवर्ण समाजातील काही गट अनेक दिवसांपासून तयारी करत होते. घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेरून हजारोंच्या संख्येने येणा-यांना कसलीही मदत करावयाची नाही, इथपर्यंतच्या बाबींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अतिवरिष्ठ अधिकाºयांनी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे. त्याचप्रमाणे ३१ डिसेंबरला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळेही दोन्ही समाजांमध्ये अधिक कटुता निर्माण झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. गुरुवारी त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला.कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला अभिवादनासाठी देशभरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांवर दगडफेक करून वाहनांची मोडतोड करण्यात आली. या दंगलीचे गांभीर्य लक्षात घेऊन महासंचालक दर्जाच्या अधिका-यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यात राज्य गुप्तवार्ता विभागाच्याही वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश होता. या अधिका-यांनी घेतलेल्या माहितीत गेल्या काही वर्षांपासून १ जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादनासाठी येणाºयांच्या संख्येत वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये काहीशी नाराजी होती. कट्टरवादाचा पुरस्कार करणाºया एका गटाकडून त्याबाबत आणखी गैरसमज पसरविण्यात आले. अस्वच्छता पसरविणे, हुल्लडबाजीमुळे स्थानिक भागात सवर्ण समाजातील मुले, महिलांची सुरक्षितता धोक्यात येणे, अशी कारणमीमांसा या गटाकडून करण्यात येत होती.यंदा विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्याने लाखोंच्या संख्येत येणाºयांना धडा शिकविलाच पाहिजे, असा प्रचार या गटाकडून भूमिगतरीत्या करण्यात येत होता. त्यासाठी १ जानेवारीला गावातील कोणतेही दुकान, स्टॉल उघडायचे नाही, येणाºयांना मदत होता कामा नये, यासाठी कट्टरवाद्यांनी व्यापारी व दुकानदारांना तशा सूचना दिल्या होत्या, असे पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. बाहेरून मोठ्या प्रमाणात वाहने आणल्याने ती फोडण्याचे आधीच ठरविण्यात आले होते. २९ व ३० डिसेंबरला संंभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळाला अभिवादनासाठी आलेला जमाव गावातून बाहेर गेलाच नाही. १ जानेवारीसाठी ते गावातच विविध ठिकाणी गटागटाने थांबून होते.आंबेडकर अनुयायांना विजयस्तंभावर जाण्यापासून रोखल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला, त्याचवेळी या समाजकंटकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांना थोपविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तथापि, त्यांच्या तुलनेत पोलिसांची संख्या मर्यादित असल्याने तो आटोक्यात आणण्यात अपयश आल्याचे अहवालात नमूद केले आहे.जिग्नेशच्या भाषणाचा परिणामगुजरातचा तरुण दलित नेता जिग्नेश मेवानी याने ३१ डिसेंबरला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत नव्या पेशवाईविरुद्ध लढा पुकारण्याची घोषणा केली होती. त्यामुळे दलित समाज उत्साहित झाला तर कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यामुळे ही ठिणगी दंगलीला कारणीभूत ठरल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचे मत आहे.सुुवेझ हक यांची बदली?१ जानेवारीला विजयस्तंभाच्या ठिकाणी जाण्यास दलितांना अटकाव करणाºया हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना तेथे जाण्यास निर्बंध घालण्याची आवश्यकता होती. मात्र पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी तो निर्णय घेतला नाही. त्यामुळे पुढील अनर्थ घडल्याचे अधिकाºयांचे मत आहे.या दंगलीचे पडसाद महाराष्टÑाच्या कानाकोपºयाबरोबरच परराज्यातही उमटत असल्याने त्यांची या ठिकाणाहून बदली केली जाण्याची शक्यता आहे.जिग्नेश, उमरला भाषणबंदीसध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. त्यामुळे चिथावणीखोर, दुही पसरविणाºया प्रत्येक व्यक्ती, संघटनेवर कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी, विद्यार्थी नेता उमर खलिद यांना भाषणाला परवानगी देण्यात येणार नाही.- सतीश माथूर,पोलीस महासंचालक

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे