शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कोरेगाव भीमा प्रकरण : ‘एल्गार’मधील भाषणांमुळे दंगल भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:44 IST

पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेतील भाषणे जनसमुदायात प्रक्षोभ वाढविणारी होती. त्याची परिणती कोरेगाव भीमा हिंसाचारात झाल्याचे प्रतिज्ञापत्र पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी चौकशी आयोगाकडे शुक्रवारी सादर केले.

मुंबई  - पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेतील भाषणे जनसमुदायात प्रक्षोभ वाढविणारी होती. त्याची परिणती कोरेगाव भीमा हिंसाचारात झाल्याचे प्रतिज्ञापत्र पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी चौकशी आयोगाकडे शुक्रवारी सादर केले.कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने चौकशीसाठी अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रवींद्र सानेगांवकर (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) यांनी चौकशी आयोगात प्रतिज्ञापत्र सादर केले. सुरुवातीला या हिंसाचाराला समता हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना जबाबदार ठरवून, त्यांच्यावर गुन्हा नोंदविणाºया पुणे पोलिसांनी भूमिकेत बदल करत, आता घटनेला एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांना जबाबदार ठरविले आहे.देशात घटनेद्वारे प्रस्थापित लोकशाही शासन व्यवस्था हिंसेच्या जोरावर उलथवून टाकण्यासाठी देशव्यापी मोठे कट कारस्थान माओवादी संघटनेने आखले आहे. त्यांनी आखलेल्या पूर्वनियोजित कटाच्या अनुषंगाने या गुन्ह्यातील आरोपींचे कामकाज सुरू आहे. या संघटनेने व संघटनेच्या काही सदस्यांनी सदर गुन्ह्याचा कट केल्याचे दिसून येते आणि एल्गार परिषदेचे आयोजन म्हणजे, या कटाचाच एक भाग आहे, असे सानेगांवकर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.बंदोबस्तासाठी पुरेसे पोलीसबळ होतेएल्गार परिषदेमधील वक्त्यांची भाषणे, वक्तव्य व इतर कार्यक्रम आक्षेपार्ह, भडक व प्रक्षोभक होते. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. कोरेगाव भीमामध्ये बंदोबस्तासाठी पुरेसे पोलीसबळ उपस्थित नव्हते, असे साक्षीदारांनी आयोगापुढे सांगितले. त्यांचा हा आरोप पोलिसांनी फेटाळला.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिस