शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोकण जलमय, प. महाराष्ट्रासह विदर्भातील नद्यांना आला पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 06:19 IST

कोकणात पावसाचे थैमान सुरू आहे. नदी, नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. राजापूरमध्ये पूर आला आहे

मुंबई : संततधार पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक नद्यांना पूर आला असून धरणांमध्ये समाधानकारक साठा होऊ लागला आहे. कोयना धरणात गत चोवीस तासांत पाच टीएमसी साठा वाढून ७२.८९ टीएमसी झाला आहे. पुण्यातील धरणांमधून विसर्ग सुरू झाल्याने उजनीत पाणी येत आहे. मराठवाड्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरी नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे भावली, दारणासह गंगापूर धरणातूनही विसर्ग सुरू असून गोदावरीचे पाणी जायकवाडीकडे झेपावू लागले आहे.

कोकणात पावसाचे थैमान सुरू आहे. नदी, नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. राजापूरमध्ये पूर आला आहे. चिपळूण, खेड जलमय झाले आहे. रत्नागिरी बाजारपेठेतही पाणीच पाणी होते. कोल्हापूरात पंचगंगेला पूर आला असून ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्यातील मांडुकली किरवे दरम्यान पाणी भरल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.सांगली जिल्ह्यात संततधार कायम आहे. दुष्काळी तासगाव, कवठेमहांकाळ, जत, विटा, कडेगाव या तालुक्यातही पाऊस पडला आहे. कापूसखेड (ता. वाळवा) येथे पावसामुळे घराची भिंत कोसळून एक महिला ठार झाली आहे. सातारा जिल्ह्यात कृष्णा, कोयना, वेण्णा नद्या दुधडी वाहू लागल्या आहेत.

विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी सर्वदूर संततधार पाऊस आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावांना पुराचा फटका बसला आहे. अमरावतीमध्ये धारणी तालुक्यात अतिवृष्टी झाली. वर्धा यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरात आजरा येथे ट्रक पलटी होऊन १०० सिलेंडर वाहून गेले. मुंबईत कळवा येथे दरड कोसळून दोघांचा तर लोणावळ््यात धबधब्यात पडून युवकाचा मृत्यू झाला.उस्मानाबादमध्ये संततधारमराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. नांदेडमधील किनवट तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टी झाली.परभणी जिल्ह्यात भीज पाऊस झाल्याने खरीप पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. नद्यांचे प्रवाह मात्र अनेक ठिकाणी कोरडेच आहेत.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ