शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गणेश विसर्जनासाठी कोळी बांधवांना मिळणार आता विम्याचे संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 15:27 IST

कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा निर्णय, कोळी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण

कल्याण, दि. 22 - कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने गेल्या कित्येक वर्षापासून कोणत्याही अपेक्षेविना गणेश विसर्जन काळात आपली सेवा देणा-या कोळी बांधवाना यंदा विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोळी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गणेश विर्सजन काळात कोळी बांधवांची नेहमीच महत्त्वाची भूमिका असते. गेल्या काही वर्षात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ लक्षात घेता या कोळी बांधवांवरील जबाबदारी ही तेवढीच वाढली आहे.

मात्र आपल्या जीवावर उदार होऊन सर्व अडचणींना बाजूला सारत ही मंडळी बाप्पांचे निविघ्नपणे विसर्जन करीत आहेत. याकडे डोळेझाक करून चालणार नाही. या गोष्टींची दखल कल्याण शहर सावर्जनिक गणेशोत्सव महामंडळाने घेत त्यांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळांचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय मोरे आणि कार्याध्यक्ष डॉ. पंकज उपाध्याय यांनी पुढाकार घेत प्रत्येक कोळी बांधवांचा ३ लाख रूपयांचा अपघाती विमा काढण्याचे काम सुरू केले आहे.गणेश विसर्जन काळातील कोळी बांधवांचे योगदान अजिबात दुर्लक्षून चालणार नाही. त्यांनी कोणतेही अपेक्षा ठेवलेली नसली तरी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजत असल्याची प्रतिक्रिया मंडळांचे अध्यक्ष संजय मोरे यांनी दिली.

आतापर्यंत हे मंडळ केवळ बॅनर आणि होर्डिंग्जपुरताच मर्यादित असल्याची चर्चा केली जायची. मात्र यंदाच्या नवनिर्वाचित कार्यकारीणीने या प्रतिमेला छेद देत एक चांगला उपक्रम राबविला असून या भूमिकेचे निश्चितपणे स्वागत व्हायला हवे असे बोलले जात आहे. 

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव