शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

कोल्हापूर-सांगलीत महापुरामुळे ७९५ जनावरे दगावली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 5:04 AM

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात प्रलयकारी महापुराने जनजीवन उद्ध्वस्त झाले

कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात प्रलयकारी महापुराने जनजीवन उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. या तीन जिल्ह्यांत ७९५ जनावरे पुराच्या पाण्यात दगावल्याने गोठेच्या गोठे ओस पडले आहेत.सांगली व कोल्हापुरात पोल्ट्री उद्योगाचेही मोठे नुकसान झाले असून तब्बल ४० हजार ६७६ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. पूर ओसरू लागल्याने मृत जनावरे सापडत आहेत. हा आकडा वाढण्याची भिती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व कुक्कुटपालन व्यवसायास ग्रामीण भागात सुरूवात झाली. पण लहरी हवामान व शेतीमालाच्या दरातील अनिश्चितेमुळे शेती अडचणीत आली. त्यावेळी दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना सावरले. किंबहुना दुधामुळेच शेतक-यांचे संसार उभे राहिले. दुभती जनावरे घरात नाही, असे एक घर येथे बघायला मिळत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात पशुधनात दीडपटीने वाढ झाली आहे.पोल्ट्रीचेही मोठे नुकसान झाले. आठ दिवसांत जिल्ह्यात १९,५३० कोंबड्या दगावल्या असून सर्वाधिक ८६७० कोंबड्या गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. पोल्ट्री उद्योगावर अस्मानी संकट कोसळल्याने पोल्ट्री चालक हवालदिल झाले आहेत.पोल्ट्री उद्योगाबरोबरच जनावरांनाही पुराचा झटका बसला आहे. पुराच्या पाण्यात जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक जनावरे मृत्यूमुखी पडली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात २५४ जनावरांची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला यश आले आहे.सांगली नगर वाचनालयाचे कार्यवाह अतुल गिजरे म्हणाले की, वाचनालयातील अनमोल ग्रंथसंपदा नष्ट झाली आहे. व्यवहार मूळ पदावर यायला किमान तीन-चार महिने लागतील. भिजलेली पुस्तके बाहेर आणून टाकली आहेत.सर्व व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवातकोल्हापूर शहरासह पूरग्रस्त भागातील व्यवहार काही प्रमाणात सुरळीत होण्यास सुरूवात झाली आहे. पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणची एटीएम मशीन पूर परिस्थितीमुळे बाधीत झाली आहेत. त्यामुळे बँकांमध्ये शुक्रवारी दिवसभर रोकड काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तर शहरातील व्यापारी, दुकाने, कार्यालये आदींमध्ये स्वच्छता मोहीम तीव्र करण्यात आली आहे.विश्वजीत कदम यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटकडेगाव (जि.सांगली) : नुकसान भरपाईच्या दुप्पट रक्कम पूरग्रस्तांना द्यावी, १०० टक्के कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आदी १५ मागण्या प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.पंंचनाम्यांसाठी अन्य जिल्ह्यांतून तलाठीपूरग्रस्तांची संख्या पाहता पंचनाम्यासाठी इतर जिल्ह्यांतून तलाठी, अव्वल कारकून आणि अभियंते मागविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला आहे. रेल्वे वाहतूक शुक्रवारी सुरू झाली. जिल्हा परिषदेत असलेले जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा मूळ ठिकाणी कार्यरत झाले आहे.

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangliसांगली