शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

कोल्हापूर : आता पंधरा दिवस ‘आंदोलना’चे नाटक : ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता सदाभाऊ खोत यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:44 IST

या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.

ठळक मुद्देबॅँकांकडून साखर तारणावर ९० टक्के कर्ज : सदाभाऊ खोत आता पंधरा दिवस ‘आंदोलना’चे नाटक

कोल्हापूर : या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.खोत म्हणाले, ‘ऊसदराच्या ‘एफआरपी’संदर्भात रयत क्रांतीच्या परिषदेमध्ये केलेली मागणीच जयसिंगपूरच्या परिषदेमध्ये करण्यात आली. यावरून आपण यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे हे आपल्याला माहीतच होते व यावरून आपणच या शाळेचा मुख्याध्यापक असल्याचे म्हणणे खरे ठरले आहे. रिकव्हरीचा साडेनऊचा बेस संपविला हे म्हणणे चुकीचे आहे; कारण ‘एफआरपी’चे पैसे देताना १० टक्के रिकव्हरीचे पैसे द्यावेत, असेच सूत्र करण्यात आले आहे.

हे जर चुकीचे वाटत असेल तर खासदार शेट्टी यांनी केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाकडे मागणी करायला हवी होती. खासदार म्हणून ते त्यांनी ते मांडायला हवे होते; परंतु तसे न करता ते उलट रस्त्यावर येत आहेत. जयसिंगपूरची परिषद ही ‘सदाभाऊ बेस्ड’च होती. माझ्या पोस्टरला मारलेले चाबकाचे फटकारे म्हणजे मी अजून ही त्यांच्या मनामनांमध्ये आहे हे स्पष्ट होत आहे.दिवाळीच्या तोंडावर ऊस आंदोलनाचे नाटक पंधरा दिवस चालणार आहे. लोकांना भावनिक आवाहन केले जाणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. दिवाळीनंतर ऊसतोड कामगार येतील व कारखानेही सुरू होतील. अडचणी असल्यास कारखाने सरकारकडे मदतही मागतील व त्यातून मार्ग निघाल्यास हे आपणच केले म्हणून ढोल बडवतील असाही टोला खोत यांनी लगावला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे, बी. एस. पाटील उपस्थित होते.

तूपकर म्हणजे तर नारळावर कुस्ती करणारा पैलवानजयसिंगपूरच्या परिषदेमध्ये रविकांत तूपकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याला आता दाढी आली आहे; माझी पहिल्यापासून आहे. त्यामुळे त्याने पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवावे; तूपकर म्हणजे नारळावर कुस्ती करणारा पैलवान आहे. त्याला फार महत्व द्यायचे कारण नाही.

मी हातकणंगलेतूनचसदाभाऊ खोत यांनी कोडोलीच्या ऊस परिषदेतहीत हातकणंगलेतून निवडणूक लढवणार असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले होते. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत:हून हातकणंगलेमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पुन्हा जाहीर केले.

नियमनमुक्ती शेतकऱ्यांच्या फायद्याचीशेतकऱ्यांचा संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावा, अशी मागणी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून आम्ही करीत होतो. मध्यंतरीच्या काळात काही शेतीमाल नियमनमुक्त केला. आता सर्वच शेतीमाल नियमनमुक्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे, अशी माहिती खोत यांनी दिली. 

 

सुधारित : बॅँकांकडून साखर तारणावर ९० टक्के कर्जसदाभाऊ खोत यांची माहिती : आता पंधरा दिवस ‘आंदोलना’चे नाटक(खोत यांचा फोटो वापरावा)लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.खोत म्हणाले, ‘ऊसदराच्या ‘एफआरपी’संदर्भात रयत क्रांतीच्या परिषदेमध्ये केलेली मागणीच जयसिंगपूरच्या परिषदेमध्ये करण्यात आली. यावरून आपण यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे हे आपल्याला माहीतच होते व यावरून आपणच या शाळेचा मुख्याध्यापक असल्याचे म्हणणे खरे ठरले आहे. रिकव्हरीचा साडेनऊचा बेस संपविला हे म्हणणे चुकीचे आहे; कारण ‘एफआरपी’चे पैसे देताना १० टक्के रिकव्हरीचे पैसे द्यावेत, असेच सूत्र करण्यात आले आहे. हे जर चुकीचे वाटत असेल तर खासदार शेट्टी यांनी केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाकडे मागणी करायला हवी होती. खासदार म्हणून ते त्यांनी ते मांडायला हवे होते; परंतु तसे न करता ते उलट रस्त्यावर येत आहेत. जयसिंगपूरची परिषद ही ‘सदाभाऊ बेस्ड’च होती. माझ्या पोस्टरला मारलेले चाबकाचे फटकारे म्हणजे मी अजून ही त्यांच्या मनामनांमध्ये आहे हे स्पष्ट होत आहे.दिवाळीच्या तोंडावर ऊस आंदोलनाचे नाटक पंधरा दिवस चालणार आहे. लोकांना भावनिक आवाहन केले जाणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. दिवाळीनंतर ऊसतोड कामगार येतील व कारखानेही सुरू होतील. अडचणी असल्यास कारखाने सरकारकडे मदतही मागतील व त्यातून मार्ग निघाल्यास हे आपणच केले म्हणून ढोल बडवतील असाही टोला खोत यांनी लगावला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे, बी. एस. पाटील उपस्थित होते.-------------------------------------------------------------------------तूपकर म्हणजे तर नारळावर कुस्ती करणारा पैलवानजयसिंगपूरच्या परिषदेमध्ये रविकांत तूपकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याला आता दाढी आली आहे; माझी पहिल्यापासून आहे. त्यामुळे त्याने पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवावे; तूपकर म्हणजे नारळावर कुस्ती करणारा पैलवान आहे. त्याला फार महत्व द्यायचे कारण नाही.----------------मी हातकणंगलेतूनचसदाभाऊ खोत यांनी कोडोलीच्या ऊस परिषदेतहीत हातकणंगलेतून निवडणूक लढवणार असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले होते. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत:हून हातकणंगलेमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पुन्हा जाहीर केले.------------------------------------------------------------------------------नियमनमुक्ती शेतकºयांच्या फायद्याचीशेतकºयांचा संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावा, अशी मागणी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून आम्ही करीत होतो. मध्यंतरीच्या काळात काही शेतीमाल नियमनमुक्त केला. आता सर्वच शेतीमाल नियमनमुक्त शेतकºयांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे, अशी माहिती खोत यांनी दिली.-----------------------------------------------------

 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर