शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

कोल्हापूर : आता पंधरा दिवस ‘आंदोलना’चे नाटक : ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता सदाभाऊ खोत यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:44 IST

या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.

ठळक मुद्देबॅँकांकडून साखर तारणावर ९० टक्के कर्ज : सदाभाऊ खोत आता पंधरा दिवस ‘आंदोलना’चे नाटक

कोल्हापूर : या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.खोत म्हणाले, ‘ऊसदराच्या ‘एफआरपी’संदर्भात रयत क्रांतीच्या परिषदेमध्ये केलेली मागणीच जयसिंगपूरच्या परिषदेमध्ये करण्यात आली. यावरून आपण यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे हे आपल्याला माहीतच होते व यावरून आपणच या शाळेचा मुख्याध्यापक असल्याचे म्हणणे खरे ठरले आहे. रिकव्हरीचा साडेनऊचा बेस संपविला हे म्हणणे चुकीचे आहे; कारण ‘एफआरपी’चे पैसे देताना १० टक्के रिकव्हरीचे पैसे द्यावेत, असेच सूत्र करण्यात आले आहे.

हे जर चुकीचे वाटत असेल तर खासदार शेट्टी यांनी केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाकडे मागणी करायला हवी होती. खासदार म्हणून ते त्यांनी ते मांडायला हवे होते; परंतु तसे न करता ते उलट रस्त्यावर येत आहेत. जयसिंगपूरची परिषद ही ‘सदाभाऊ बेस्ड’च होती. माझ्या पोस्टरला मारलेले चाबकाचे फटकारे म्हणजे मी अजून ही त्यांच्या मनामनांमध्ये आहे हे स्पष्ट होत आहे.दिवाळीच्या तोंडावर ऊस आंदोलनाचे नाटक पंधरा दिवस चालणार आहे. लोकांना भावनिक आवाहन केले जाणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. दिवाळीनंतर ऊसतोड कामगार येतील व कारखानेही सुरू होतील. अडचणी असल्यास कारखाने सरकारकडे मदतही मागतील व त्यातून मार्ग निघाल्यास हे आपणच केले म्हणून ढोल बडवतील असाही टोला खोत यांनी लगावला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे, बी. एस. पाटील उपस्थित होते.

तूपकर म्हणजे तर नारळावर कुस्ती करणारा पैलवानजयसिंगपूरच्या परिषदेमध्ये रविकांत तूपकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याला आता दाढी आली आहे; माझी पहिल्यापासून आहे. त्यामुळे त्याने पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवावे; तूपकर म्हणजे नारळावर कुस्ती करणारा पैलवान आहे. त्याला फार महत्व द्यायचे कारण नाही.

मी हातकणंगलेतूनचसदाभाऊ खोत यांनी कोडोलीच्या ऊस परिषदेतहीत हातकणंगलेतून निवडणूक लढवणार असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले होते. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत:हून हातकणंगलेमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पुन्हा जाहीर केले.

नियमनमुक्ती शेतकऱ्यांच्या फायद्याचीशेतकऱ्यांचा संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावा, अशी मागणी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून आम्ही करीत होतो. मध्यंतरीच्या काळात काही शेतीमाल नियमनमुक्त केला. आता सर्वच शेतीमाल नियमनमुक्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे, अशी माहिती खोत यांनी दिली. 

 

सुधारित : बॅँकांकडून साखर तारणावर ९० टक्के कर्जसदाभाऊ खोत यांची माहिती : आता पंधरा दिवस ‘आंदोलना’चे नाटक(खोत यांचा फोटो वापरावा)लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.खोत म्हणाले, ‘ऊसदराच्या ‘एफआरपी’संदर्भात रयत क्रांतीच्या परिषदेमध्ये केलेली मागणीच जयसिंगपूरच्या परिषदेमध्ये करण्यात आली. यावरून आपण यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे हे आपल्याला माहीतच होते व यावरून आपणच या शाळेचा मुख्याध्यापक असल्याचे म्हणणे खरे ठरले आहे. रिकव्हरीचा साडेनऊचा बेस संपविला हे म्हणणे चुकीचे आहे; कारण ‘एफआरपी’चे पैसे देताना १० टक्के रिकव्हरीचे पैसे द्यावेत, असेच सूत्र करण्यात आले आहे. हे जर चुकीचे वाटत असेल तर खासदार शेट्टी यांनी केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाकडे मागणी करायला हवी होती. खासदार म्हणून ते त्यांनी ते मांडायला हवे होते; परंतु तसे न करता ते उलट रस्त्यावर येत आहेत. जयसिंगपूरची परिषद ही ‘सदाभाऊ बेस्ड’च होती. माझ्या पोस्टरला मारलेले चाबकाचे फटकारे म्हणजे मी अजून ही त्यांच्या मनामनांमध्ये आहे हे स्पष्ट होत आहे.दिवाळीच्या तोंडावर ऊस आंदोलनाचे नाटक पंधरा दिवस चालणार आहे. लोकांना भावनिक आवाहन केले जाणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. दिवाळीनंतर ऊसतोड कामगार येतील व कारखानेही सुरू होतील. अडचणी असल्यास कारखाने सरकारकडे मदतही मागतील व त्यातून मार्ग निघाल्यास हे आपणच केले म्हणून ढोल बडवतील असाही टोला खोत यांनी लगावला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे, बी. एस. पाटील उपस्थित होते.-------------------------------------------------------------------------तूपकर म्हणजे तर नारळावर कुस्ती करणारा पैलवानजयसिंगपूरच्या परिषदेमध्ये रविकांत तूपकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याला आता दाढी आली आहे; माझी पहिल्यापासून आहे. त्यामुळे त्याने पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवावे; तूपकर म्हणजे नारळावर कुस्ती करणारा पैलवान आहे. त्याला फार महत्व द्यायचे कारण नाही.----------------मी हातकणंगलेतूनचसदाभाऊ खोत यांनी कोडोलीच्या ऊस परिषदेतहीत हातकणंगलेतून निवडणूक लढवणार असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले होते. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत:हून हातकणंगलेमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पुन्हा जाहीर केले.------------------------------------------------------------------------------नियमनमुक्ती शेतकºयांच्या फायद्याचीशेतकºयांचा संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावा, अशी मागणी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून आम्ही करीत होतो. मध्यंतरीच्या काळात काही शेतीमाल नियमनमुक्त केला. आता सर्वच शेतीमाल नियमनमुक्त शेतकºयांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे, अशी माहिती खोत यांनी दिली.-----------------------------------------------------

 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर