शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

कोकणच्या रेल्वे प्रवासाला राज्याचा खोडा?; रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 5:20 AM

राज्य सरकारकडून पत्र न देता तोंडी सूचना

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही अजून कोकणात जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू झालेली नाही. यावरून राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात ढकलाढकली सुरू आहे. ‘रेल्वे सोडू नका, आदेशाची वाट पाहा,’ असे राज्य सरकारने आम्हाला सांगितले असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. तर गाड्या सुरू करण्याची जबाबदारी रेल्वेची असून ही सेवा सुरू करण्यास आमचा विरोध नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, राज्य सरकारकडून ७ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेला विशेष गाड्या चालविण्यासाठी पत्र दिले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डानेही ९ आॅगस्ट रोजी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला. ११ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी या विशेष गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने केली होती. जवळपास १९० हून अधिक गाड्या सोडण्याचे नियोजन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र राज्य सरकारच्या अधिकाºयांनी अचानक हा निर्णय थांबवण्याच्या तोंडी सूचना दिल्या. लेखी अधिकृत पत्र देण्याची विनंती रेल्वे अधिकाºयांनी राज्य सरकारला केली. परंतु, तसे पत्र त्यांनी पाठविले नाही.आम्ही सज्ज!राज्य सरकारने गणेशोत्सवात कोकणात जाणाºया चाकरमान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यास सज्ज राहा, असे पत्र मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनाला पाठविले होते. परंतु रेल्वेने तयारी केल्यानंतरही राज्य सरकारकडून आम्हाला ‘रेल्वे सोडू नका, आदेशाची वाट पाहा,’ असे सांगण्यात आल्याने ही सेवा सुरू झालेली नाही, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेGanesh Mahotsavगणेशोत्सव