शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

किडनी ७५०००, लिव्हर ९० हजार...! शेतकऱ्यांनी सरकारला पाठविले अवयवांचे रेटकार्ड; वडेट्टीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 11:54 IST

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 

दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी राज्य सरकारला अवयवांचे रेटकार्ड पाठविले आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 

किडनी ७५,००० रुपये/ १० नग, लिव्हर ९०,०००/ १० नग, डोळे - २५,०००/ १० नग यासह शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही. हेच शेतकरी जर आमदार, खासदार असते तर त्यांच्याकरीता खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही, असी गंभीर टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे . 

दहा शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढले...

हिंगोली जिल्ह्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे उलटूनही तरी जिल्ह्याचा व्हावा तसा विकास झाला नाही. कारण येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही पाऊसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पिकांत शेंगा भरण्याच्या वेळेस पावसाचा मोठा खंड पडला होता. यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता होती. त्यांच्यापाठोपाठ सोयाबीन पिकावर येलो मोझॅक हा रोग पडला यामुळे यावर्षी खर्च जास्त उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या दुष्काळअसून नदी, ओढे कोरडे पडले आहेत. खरीप पिकात घट झाली आशा होती रब्बीपीकावर त्यावर देखील निसर्गाची अवकृपा यावर्षी परतीचा पाऊस पडला नसल्याने शेतातील तुर हरबरा वाळत आहेत, सततची नापिकी आणि बँकेकडुन घेतलेल पिक कर्ज फेडायचे कसे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी चक्क आपले अवयव विक्रीला काढले असल्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

यामध्ये शेतकऱ्यांनी आपले अवयवांची दर निश्चित केले आहेत. यामध्ये किडनी 75 हजार रुपये, लिव्हर 90 हजार रुपये, डोळे 25 हजार रुपये असा दर शेतकऱ्यांनी ठरवून दिला आहे. शेतकऱ्यांच्या अशा मागणीमुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरीdroughtदुष्काळEknath Shindeएकनाथ शिंदे