शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

किडनी ७५०००, लिव्हर ९० हजार...! शेतकऱ्यांनी सरकारला पाठविले अवयवांचे रेटकार्ड; वडेट्टीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 11:54 IST

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 

दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी राज्य सरकारला अवयवांचे रेटकार्ड पाठविले आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 

किडनी ७५,००० रुपये/ १० नग, लिव्हर ९०,०००/ १० नग, डोळे - २५,०००/ १० नग यासह शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही. हेच शेतकरी जर आमदार, खासदार असते तर त्यांच्याकरीता खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही, असी गंभीर टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे . 

दहा शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढले...

हिंगोली जिल्ह्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे उलटूनही तरी जिल्ह्याचा व्हावा तसा विकास झाला नाही. कारण येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही पाऊसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पिकांत शेंगा भरण्याच्या वेळेस पावसाचा मोठा खंड पडला होता. यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता होती. त्यांच्यापाठोपाठ सोयाबीन पिकावर येलो मोझॅक हा रोग पडला यामुळे यावर्षी खर्च जास्त उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या दुष्काळअसून नदी, ओढे कोरडे पडले आहेत. खरीप पिकात घट झाली आशा होती रब्बीपीकावर त्यावर देखील निसर्गाची अवकृपा यावर्षी परतीचा पाऊस पडला नसल्याने शेतातील तुर हरबरा वाळत आहेत, सततची नापिकी आणि बँकेकडुन घेतलेल पिक कर्ज फेडायचे कसे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी चक्क आपले अवयव विक्रीला काढले असल्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

यामध्ये शेतकऱ्यांनी आपले अवयवांची दर निश्चित केले आहेत. यामध्ये किडनी 75 हजार रुपये, लिव्हर 90 हजार रुपये, डोळे 25 हजार रुपये असा दर शेतकऱ्यांनी ठरवून दिला आहे. शेतकऱ्यांच्या अशा मागणीमुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरीdroughtदुष्काळEknath Shindeएकनाथ शिंदे