शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

किडनी ७५०००, लिव्हर ९० हजार...! शेतकऱ्यांनी सरकारला पाठविले अवयवांचे रेटकार्ड; वडेट्टीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 11:54 IST

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 

दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी राज्य सरकारला अवयवांचे रेटकार्ड पाठविले आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 

किडनी ७५,००० रुपये/ १० नग, लिव्हर ९०,०००/ १० नग, डोळे - २५,०००/ १० नग यासह शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही. हेच शेतकरी जर आमदार, खासदार असते तर त्यांच्याकरीता खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही, असी गंभीर टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे . 

दहा शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढले...

हिंगोली जिल्ह्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे उलटूनही तरी जिल्ह्याचा व्हावा तसा विकास झाला नाही. कारण येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही पाऊसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पिकांत शेंगा भरण्याच्या वेळेस पावसाचा मोठा खंड पडला होता. यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता होती. त्यांच्यापाठोपाठ सोयाबीन पिकावर येलो मोझॅक हा रोग पडला यामुळे यावर्षी खर्च जास्त उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या दुष्काळअसून नदी, ओढे कोरडे पडले आहेत. खरीप पिकात घट झाली आशा होती रब्बीपीकावर त्यावर देखील निसर्गाची अवकृपा यावर्षी परतीचा पाऊस पडला नसल्याने शेतातील तुर हरबरा वाळत आहेत, सततची नापिकी आणि बँकेकडुन घेतलेल पिक कर्ज फेडायचे कसे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी चक्क आपले अवयव विक्रीला काढले असल्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

यामध्ये शेतकऱ्यांनी आपले अवयवांची दर निश्चित केले आहेत. यामध्ये किडनी 75 हजार रुपये, लिव्हर 90 हजार रुपये, डोळे 25 हजार रुपये असा दर शेतकऱ्यांनी ठरवून दिला आहे. शेतकऱ्यांच्या अशा मागणीमुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरीdroughtदुष्काळEknath Shindeएकनाथ शिंदे