शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

किडनी ७५०००, लिव्हर ९० हजार...! शेतकऱ्यांनी सरकारला पाठविले अवयवांचे रेटकार्ड; वडेट्टीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 11:54 IST

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 

दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी राज्य सरकारला अवयवांचे रेटकार्ड पाठविले आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 

किडनी ७५,००० रुपये/ १० नग, लिव्हर ९०,०००/ १० नग, डोळे - २५,०००/ १० नग यासह शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही. हेच शेतकरी जर आमदार, खासदार असते तर त्यांच्याकरीता खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही, असी गंभीर टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे . 

दहा शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढले...

हिंगोली जिल्ह्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे उलटूनही तरी जिल्ह्याचा व्हावा तसा विकास झाला नाही. कारण येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही पाऊसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पिकांत शेंगा भरण्याच्या वेळेस पावसाचा मोठा खंड पडला होता. यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता होती. त्यांच्यापाठोपाठ सोयाबीन पिकावर येलो मोझॅक हा रोग पडला यामुळे यावर्षी खर्च जास्त उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या दुष्काळअसून नदी, ओढे कोरडे पडले आहेत. खरीप पिकात घट झाली आशा होती रब्बीपीकावर त्यावर देखील निसर्गाची अवकृपा यावर्षी परतीचा पाऊस पडला नसल्याने शेतातील तुर हरबरा वाळत आहेत, सततची नापिकी आणि बँकेकडुन घेतलेल पिक कर्ज फेडायचे कसे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी चक्क आपले अवयव विक्रीला काढले असल्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

यामध्ये शेतकऱ्यांनी आपले अवयवांची दर निश्चित केले आहेत. यामध्ये किडनी 75 हजार रुपये, लिव्हर 90 हजार रुपये, डोळे 25 हजार रुपये असा दर शेतकऱ्यांनी ठरवून दिला आहे. शेतकऱ्यांच्या अशा मागणीमुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरीdroughtदुष्काळEknath Shindeएकनाथ शिंदे