शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा राज ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 13:43 IST

मनसे-संभाजी ब्रिगेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी मनसेविरुद्ध आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केले. 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाजारांची राजमुद्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्यावर घेतल्यानंतरचा वादा वाढला आहे. मनसेच्या या कृतीचा विरोध राज ठाकरेंना रस्त्यावर दिसत नसला तरी अनेकांच्या मनात राग धुमसत आहे. त्यामुळे भविष्यात मनसे आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यास नवल वाटू नये, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडकर यांनी दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुरुवारी अधिवेशन पार पडले. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भगव्या रंगाचा झेंडा आणि त्या झेंड्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेतली आहे. त्यामुळे अनेक मराठा संघटनांकडून राजमुद्रा झेंड्यावर घेण्यास विरोध करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावर आता खेडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

मराठा सेवा संघ आणि मराठा संघटनांच्या वतीने राज ठाकरेंच्या या कृतीला कायदेशीररित्या विरोध करण्याचे आम्ही ठरवलं आहे.  भविष्यात मनसे आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यास नवल वाटू नये, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडकर यांनी दिला आहे. त्याचवेळी मनसे-संभाजी ब्रिगेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी मनसेविरुद्ध आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केले. 

सावरकरांच्या फोटोवरून प्रश्न उपस्थित

मनसेच्या कार्यक्रमात सावरकरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. फोटो कोणते ठेवायचे हा प्रश्न त्या-त्या पक्षाचा आहे. सावकरांचे हिंदुत्व मनसेला मान्य आहे, असं वृत्त आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे होते हे खरं असले तरी ते समतावादी, मानवतावादी आणि धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी विषमता असलेल्या समाजात एकता निर्माण केली होती. याउलट राज ठाकरेंना कोणते सावरकर अपेक्षीत आहेत, असा प्रश्न खेडेकर यांनी उपस्थित केला.

1924 पूर्वीचे सावकर हे हिंदु-मुस्लीम एकतेचे पुरस्कर्ते होते. गायीचे पुजन करण्याची गरज नाही म्हणणारे होते. मात्र 1924 नंतर हिंदुत्व लिहून समाजा-समाजामध्ये वितुष्ठ निर्माण करणारे सावकर होते. मनसेला कोणते सावकर हवेत. त्याच सावकरांनी छत्रपती शिवाजी महाजारांना कातकालीय योगाने राजे झाले असं म्हटले आहे. याचा अर्थ कावळा उडायला आणि फांदी तुटायला अशा योगाने शिवाजी महाराज राजे झाले असं लिहून ठेवले आहे. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या पत्नीला मानाने परत पाठवले, याला सावरकरांनी सज्जन विकृती म्हटले होते. असे सावरकर, राज ठाकरेंचे आदर्श असतील तर त्यांना शिवाजी महाराजांविषयी किती आदर आहे हे दिसून येते, अशी टीका खेडेकर यांनी केली.