शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा राज ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 13:43 IST

मनसे-संभाजी ब्रिगेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी मनसेविरुद्ध आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केले. 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाजारांची राजमुद्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्यावर घेतल्यानंतरचा वादा वाढला आहे. मनसेच्या या कृतीचा विरोध राज ठाकरेंना रस्त्यावर दिसत नसला तरी अनेकांच्या मनात राग धुमसत आहे. त्यामुळे भविष्यात मनसे आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यास नवल वाटू नये, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडकर यांनी दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुरुवारी अधिवेशन पार पडले. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भगव्या रंगाचा झेंडा आणि त्या झेंड्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेतली आहे. त्यामुळे अनेक मराठा संघटनांकडून राजमुद्रा झेंड्यावर घेण्यास विरोध करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावर आता खेडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

मराठा सेवा संघ आणि मराठा संघटनांच्या वतीने राज ठाकरेंच्या या कृतीला कायदेशीररित्या विरोध करण्याचे आम्ही ठरवलं आहे.  भविष्यात मनसे आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यास नवल वाटू नये, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडकर यांनी दिला आहे. त्याचवेळी मनसे-संभाजी ब्रिगेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी मनसेविरुद्ध आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केले. 

सावरकरांच्या फोटोवरून प्रश्न उपस्थित

मनसेच्या कार्यक्रमात सावरकरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. फोटो कोणते ठेवायचे हा प्रश्न त्या-त्या पक्षाचा आहे. सावकरांचे हिंदुत्व मनसेला मान्य आहे, असं वृत्त आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे होते हे खरं असले तरी ते समतावादी, मानवतावादी आणि धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी विषमता असलेल्या समाजात एकता निर्माण केली होती. याउलट राज ठाकरेंना कोणते सावरकर अपेक्षीत आहेत, असा प्रश्न खेडेकर यांनी उपस्थित केला.

1924 पूर्वीचे सावकर हे हिंदु-मुस्लीम एकतेचे पुरस्कर्ते होते. गायीचे पुजन करण्याची गरज नाही म्हणणारे होते. मात्र 1924 नंतर हिंदुत्व लिहून समाजा-समाजामध्ये वितुष्ठ निर्माण करणारे सावकर होते. मनसेला कोणते सावकर हवेत. त्याच सावकरांनी छत्रपती शिवाजी महाजारांना कातकालीय योगाने राजे झाले असं म्हटले आहे. याचा अर्थ कावळा उडायला आणि फांदी तुटायला अशा योगाने शिवाजी महाराज राजे झाले असं लिहून ठेवले आहे. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या पत्नीला मानाने परत पाठवले, याला सावरकरांनी सज्जन विकृती म्हटले होते. असे सावरकर, राज ठाकरेंचे आदर्श असतील तर त्यांना शिवाजी महाराजांविषयी किती आदर आहे हे दिसून येते, अशी टीका खेडेकर यांनी केली.