शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

ध्येयावर लक्ष ठेवून कष्टाची तयारी ठेवा - ललिता बाबर-भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 01:30 IST

कठोर परिश्रम व शिस्तीचे पालन केल्यास यशापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन रिओ आॅलिंपिक खेळाडू ललिता बाबर- भोसले यांनी केले.

काटेवाडी - ध्येयावर लक्ष ठेवून कष्टांची तयारी ठेवा. क्षेत्र कोणतेही असो मेहनती शिवाय फळ नाही. कोणतेही गोष्ट आत्मसात करण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. कठोर परिश्रम व शिस्तीचे पालन केल्यास यशापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन रिओ आॅलिंपिक खेळाडू ललिता बाबर- भोसले यांनी केले.काटेवाडी (ता. बारामती ) येथे शरयू फाऊंडेशन आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातून अनेक क्षेत्रात मुले पुढे येतात. यशस्वी होतात. मी सुध्दा खेडेगावातून आली आहे. मला शिक्षणाची आवड नव्हती. मात्र, मी खेळावर लक्ष केंद्रित केले. गावाकडेच धावण्याचा सराव केला. दररोज घर ते शाळा धावत सराव केला. आई-वडिलांसह काकांनी पाठिंबा दिल्यानेच आॅलिंपिक पर्यंतचे ध्येय गाठता आले. दोन वर्ष कठोर परिश्रम घ्यावे लागले. कुटुंबापासून दूर, रहावे लागले. आवडते पदार्थ खाण्यावर बंधन घातले. टीव्ही पाहता आला नाही. तरीही धेयापासून लक्ष विचलित झाले नाही. धेय गाठण्याची मनात जिद्द होती. अडचणीवर मात करत यश मिळवले.तत्पुर्वी बाबर यांचे वाद्यांचा गजरात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वक्तृत्व स्पर्धातील यशस्वी विद्यार्थिनींना त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले. यावेळी राजवर्धन शिंदे, माळेगावचे संचालक दिपक तावरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत ताबिले, संजय काटे, राजेंद्र निंबाळकर, अनिल काटे, महादेव कचरे, अविनाश भिसे, बापू गायकवाड, आबा टकले, अश्विनी खर्चे, मुख्याध्यापक अनिल खैरे, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक सानिका ब्रह्मदेव कोकरे, द्वितीय क्रमांक शर्वरी प्रवीण शेटे, तृतीय क्रमांक अनिकेत अविनाश नरुटे यांनी पटकविला. समृद्धी नंदकिशोर चव्हाण व ऋतुराज तुषार राऊत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. मध्यम गटात प्रथम क्रमांक श्रेणीका संतोष जांबले द्वितीय क्रमांक नंदीनी जयवंत निंबाळकर तृतीय क्रमांक श्रावणी सचिन उगले उत्तेजनार्थ पारितोषिके सिद्धी अनिल पांढरे व अथर्व सुबोध अवचट यांनी पटकावली.मला घडवण्याचे श्रेय आजोबांना जाते. मुलगी असूनही मला त्यांनी खेळासाठी स्वातंत्र्य दिले. माझ्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे खेळाची एकनिष्ठ मैत्री झाली. खेळ हा सर्वत्र उंचावलेला आहे. जगात नाव कमावण्याची संधी मिळते, या साठी खेळ महत्त्वाचा आहे. खेळ कोणताही असो, यासाठी मेहनत व कष्टांतून आवडत्या खेळाची एकनिष्ठ मैत्री करावी विनाकारण आईवडिलासह कुटूंबाचा अपेक्षा भंग होऊ देवू नका.- ललिता बाबर- भोसले,रिओ आॅलिंपिक खेळाडू

टॅग्स :Sportsक्रीडाStudentविद्यार्थी