शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

काश्मीरची स्थिती वर्षभरात सुधारणार

By admin | Updated: April 13, 2017 02:18 IST

काश्मीरमधील आजच्या परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सांगत, येत्या वर्षभरात काश्मीरची परिस्थितीत निश्चितपणे सुधारून दाखवू, असा विश्वास

राजनाथसिंह यांचा विश्वास । पाकला परिणाम भोगावेच लागतीलमुंबई : काश्मीरमधील आजच्या परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सांगत, येत्या वर्षभरात काश्मीरची परिस्थितीत निश्चितपणे सुधारून दाखवू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केला. ‘लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर’ कार्यक्रमात ‘आज तक’च्या न्यूज अँकर व पत्रकार अंजना कश्यप यांनी ही मुलाखत घेतली. प्रश्न : काश्मीरमध्ये ७० टक्के मतदान व्हायचे, तिथे पोटनिवडणुकीत ७ टक्के मतदान होते, याचा अर्थ मेहबुबा मुफ्ती सरकारमुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, असे आपल्याला वाटते काय? राजनाथसिंह : मेहबुबा सरकारमुळे जनतेचा भ्रमनिरास झालेला नाही. मात्र, तेथील परिस्थिती चिघळत ठेवण्याचे काम पाकिस्तान करीत आहे. थोडी प्रतीक्षा करा. वर्षभरात तेथील परिस्थितीत मोठे परिवर्तन झाल्याचे दिसेल. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी दगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांचे समर्थन केले आहे...? त्यांनी तसे करायला नको होते. फारुख अब्दुल्ला हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून अशा विधानांची मला अपेक्षा नव्हती. काश्मीरला पुराने वेढले, तेव्हा आपले जीव धोक्यात घालून तेथील लोकांना वाचविण्याचे काम लष्करानेच केले. त्यांच्यावर दगडफेक करण्याचे समर्थन कसे होऊ शकेल? दगडफेक करणाऱ्यांना कसे निपटणार? कोणतेच सरकार आपली रणनीती सांगत नसते. परिस्थती नक्कीच बदलेल, हे मी आज विश्वासाने सांगू शकतो. पेलेट गन्स वा पावा शेल्सचा वापर करताना महत्त्वाच्या अवयवांना इजा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश लष्कराला दिलेले आहेत. देशहिताच्या आड कोणीही आले, तरी त्यांचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, अशी भूमिका लष्करप्रमुखांनी घेतली आहे. आपले मत काय? मी त्यांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे. जे दहशतवादी वा कोणीही देश अस्थिर करू इच्छितात, त्यांना त्याचे परिणाम हे भोगावेच लागतील. कोणाचीही गय केलीच जाणार नाही. ट्रिपल तलाक, राममंदिर आणि गोहत्या बंदी याबद्दल स्पष्ट भूमिका काय? राजनाथसिंह : ट्रिपल तलाकबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही ती सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. ट्रिपल तलाक हा पुरुष-महिला समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे. कोणत्याही जात, धर्म, पंथातील महिलेवर ती केवळ महिला आहे, म्हणून अन्याय होता कामा नये. शिवाय, कुराणमध्ये ट्रिपल तलाकचा उल्लेख नाही, अशी माझी माहिती आहे. राम जन्मभूमीचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. त्यात मध्यस्थी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविलेली आहे. दोन्ही बाजू एकत्र बसून समस्येचे समाधान करणार असतील, तर केंद्र सरकार त्याचे स्वागतच करेल. तसे होऊ शकले नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. गोहत्याबंदीबाबत सर्वांचे एकमत व्हावे आणि तसे झाले तर कायदा बनण्यात अडचण येणार नाही. भाजपाचे सरकार आले की हिंदू राष्ट्राची चर्चा सुरू होते. आता योगी आदित्यनाथ यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना चुकीची नाही, असे विधान केले आहे. आपले मत काय?त्या विधानावर मी बोलणार नाही. मात्र, हिंदू हा जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जगातील अनेक विकसित देशदेखील धर्मनिष्ठ आहेत, पण भारत सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष आहे. धर्म, जातीच्या नावावर इथे भेदभाव केला जात नाही. दाऊदला भारतात आणणार असे आपण म्हटले होते. त्याचे काय झाले?तो कराचीतच आहे हे नक्की. भारतातील त्याच्या संपत्तीवर जप्ती आणून तिचा लिलाव केला जातोय. निश्चित रणनीतीनुसार आम्ही पाकिस्तानवर दबाव वाढवत आहोत.