शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरची स्थिती वर्षभरात सुधारणार

By admin | Updated: April 13, 2017 02:18 IST

काश्मीरमधील आजच्या परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सांगत, येत्या वर्षभरात काश्मीरची परिस्थितीत निश्चितपणे सुधारून दाखवू, असा विश्वास

राजनाथसिंह यांचा विश्वास । पाकला परिणाम भोगावेच लागतीलमुंबई : काश्मीरमधील आजच्या परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सांगत, येत्या वर्षभरात काश्मीरची परिस्थितीत निश्चितपणे सुधारून दाखवू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केला. ‘लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर’ कार्यक्रमात ‘आज तक’च्या न्यूज अँकर व पत्रकार अंजना कश्यप यांनी ही मुलाखत घेतली. प्रश्न : काश्मीरमध्ये ७० टक्के मतदान व्हायचे, तिथे पोटनिवडणुकीत ७ टक्के मतदान होते, याचा अर्थ मेहबुबा मुफ्ती सरकारमुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, असे आपल्याला वाटते काय? राजनाथसिंह : मेहबुबा सरकारमुळे जनतेचा भ्रमनिरास झालेला नाही. मात्र, तेथील परिस्थिती चिघळत ठेवण्याचे काम पाकिस्तान करीत आहे. थोडी प्रतीक्षा करा. वर्षभरात तेथील परिस्थितीत मोठे परिवर्तन झाल्याचे दिसेल. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी दगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांचे समर्थन केले आहे...? त्यांनी तसे करायला नको होते. फारुख अब्दुल्ला हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून अशा विधानांची मला अपेक्षा नव्हती. काश्मीरला पुराने वेढले, तेव्हा आपले जीव धोक्यात घालून तेथील लोकांना वाचविण्याचे काम लष्करानेच केले. त्यांच्यावर दगडफेक करण्याचे समर्थन कसे होऊ शकेल? दगडफेक करणाऱ्यांना कसे निपटणार? कोणतेच सरकार आपली रणनीती सांगत नसते. परिस्थती नक्कीच बदलेल, हे मी आज विश्वासाने सांगू शकतो. पेलेट गन्स वा पावा शेल्सचा वापर करताना महत्त्वाच्या अवयवांना इजा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश लष्कराला दिलेले आहेत. देशहिताच्या आड कोणीही आले, तरी त्यांचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, अशी भूमिका लष्करप्रमुखांनी घेतली आहे. आपले मत काय? मी त्यांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे. जे दहशतवादी वा कोणीही देश अस्थिर करू इच्छितात, त्यांना त्याचे परिणाम हे भोगावेच लागतील. कोणाचीही गय केलीच जाणार नाही. ट्रिपल तलाक, राममंदिर आणि गोहत्या बंदी याबद्दल स्पष्ट भूमिका काय? राजनाथसिंह : ट्रिपल तलाकबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही ती सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. ट्रिपल तलाक हा पुरुष-महिला समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे. कोणत्याही जात, धर्म, पंथातील महिलेवर ती केवळ महिला आहे, म्हणून अन्याय होता कामा नये. शिवाय, कुराणमध्ये ट्रिपल तलाकचा उल्लेख नाही, अशी माझी माहिती आहे. राम जन्मभूमीचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. त्यात मध्यस्थी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविलेली आहे. दोन्ही बाजू एकत्र बसून समस्येचे समाधान करणार असतील, तर केंद्र सरकार त्याचे स्वागतच करेल. तसे होऊ शकले नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. गोहत्याबंदीबाबत सर्वांचे एकमत व्हावे आणि तसे झाले तर कायदा बनण्यात अडचण येणार नाही. भाजपाचे सरकार आले की हिंदू राष्ट्राची चर्चा सुरू होते. आता योगी आदित्यनाथ यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना चुकीची नाही, असे विधान केले आहे. आपले मत काय?त्या विधानावर मी बोलणार नाही. मात्र, हिंदू हा जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जगातील अनेक विकसित देशदेखील धर्मनिष्ठ आहेत, पण भारत सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष आहे. धर्म, जातीच्या नावावर इथे भेदभाव केला जात नाही. दाऊदला भारतात आणणार असे आपण म्हटले होते. त्याचे काय झाले?तो कराचीतच आहे हे नक्की. भारतातील त्याच्या संपत्तीवर जप्ती आणून तिचा लिलाव केला जातोय. निश्चित रणनीतीनुसार आम्ही पाकिस्तानवर दबाव वाढवत आहोत.