शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

दोन पोटनिवडणुका दोन पॅटर्न, कुठला वाढवणार कुणाचं टेन्शन? असं दिसतंय पुढचं समिकरण  

By बाळकृष्ण परब | Updated: March 2, 2023 17:54 IST

Assembly by Election Results: कसबा आणि् चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांमधून दोन पॅटर्न स्पष्टपणे दिसून आले आहेत. त्या पॅटर्नचा महाष्ट्रातील राजकारणावर आणि पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांवरही ठळक परिणाम होताना दिसणार आहे. 

- बाळकृष्ण परब सध्याच्या राजकीय उलथापालथीमध्ये राज्यातील राजकारणासाठी महत्त्वाच्या असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं. या पोटनिवडणुकीतील निकालामध्ये भाजपाला पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव पत्करावा लागला आहे. इथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली आहे. तर तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचा लाभ झाल्याने भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप ह्या विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. दरम्यान, या दोन मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांमधून दोन पॅटर्न स्पष्टपणे दिसून आले आहेत. त्या पॅटर्नचा भाजपा व शिंदेंची शिवसेना आणि दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्यात विभागलेल्या महाष्ट्रातील राजकारणावर आणि पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांवरही ठळक परिणाम होताना दिसणार आहे. 

यातील पहिला पॅटर्न दिसून आला तो पुण्यातील कसबा मतदारसंघात. हा मतदारसंघ भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला. एक दोन अपवाद वगळता गेल्या ४०-४५ वर्षांत येथे भाजपाचा पराभव झाला नव्हता. मात्र ही पोटनिवडणूक त्याला अपवाद ठरली. येथे सहानुभूतीची लाट असण्याची शक्यता विचारात न घेता भाजपाने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देता ती हेमंत रासनेंना दिली. तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या रूपात तगडा जनसंपर्क असलेला उमेदवार दिला. एवढंच नाही तर संपूर्ण प्रचारामध्ये महाविकास आघाडीमध्ये कमालीचं ऐक्य दिसून आलं. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडूनही शिस्तबद्ध प्रचार झाला. तसेच विविध माध्यमातून भाजपाविरोधात वातावरणनिर्मिती करण्यातही महाविकास आघाडी आणि काँग्रेसला यश आलं. त्यामुळे ही निवडणूक भाजपाला जड जाणार असं सुरुवातीपासूनच दिसत होतं. अखेर तसंच घडलं.

दुसरीकडे भाजपाच्या गोटात मात्र सुरुवातीपासूनच गोंधळ दिसून आला. अगदी उमेदवार निवडीपासून या गोंधळाला सुरुवात झाली होती. सहानुभूतीचा लाभ घेण्यासाठी टिळक कुटुंबात उमेदवारी द्यायची का, याचाही विचार झाला. मात्र अखेरीस रासनेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र त्यामुळे सहानुभूतीचा मुद्दा या निवडणुकीतून निघून गेला. तसेच भाजपाच्या पारंपरिक मतदारांत नाराजीचं वातावरण निर्माण झालं. ते दूर करण्याचे सकारात्मक प्रयत्न झाले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून भाजपाच्या मतदारांचं मतदान कमी झाल्याचंही दिसून आलं. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि इतर नेत्यांनी केलेल्या आक्रमक प्रचारामुळे भाजपा बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते. त्यात गिरीश बापट यांना आजारी असताना प्रचारासाठी आणल्याचा मुद्दा विरोधकांनी आक्रमकपणे भाजपाविरोधात वापरला. तसेच मतदानादिवशी झालेले गैरप्रकारांचे आरोप आणि धंगेकरांचे उपोषण यामुळेही भाजपाच्या विरोधात वातावरणनिर्मिती झाली. अखेरीस या सर्वाचा फायदा घेत धंगेकर विजयी झाले. त्यांच्या विजयामुळे भाजपाविरोधात प्रबळ उमेदवार देऊन, शिस्तबद्ध प्रचार करत परस्परात ऐक्य राखले तर भाजपाला पराभूत करता येते, हे या पॅटर्नमधून दिसून आले. 

या पोटनिवडणुकीतील दुसरा पॅटर्न दिसून आला तो पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये. पिंपरी-चिंडवडणमधील पोटनिवडणुकीसाठी भाजपाने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात सहानुभूतीच्या लाटेचा विचार केला गेला. तसेच अपेक्षेप्रमाणे अश्विनी जगताप यांनी येथे ३० हजारांहून अधिक मताधिक्यासह विजयी आघाडी घेतली आहे. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्याविरोधात राहुल कलाटे यांनी केलेली बंडखोरीही निर्णायक ठकताना दिसत आहे. तसेच कलाटे यांच्या बंडखोरीमुळे मतविभाजन होऊन निकालाला कलाटणी मिळाल्याचे आकडे समोर येत आहेत. ३३ व्या फेरीच्या आकडेवारीपर्यंत पाहिल्यास अश्विनी जगताप यांना १ लाख २५ हजार १३० मते मिळाली आहेत. तर नाना काटे यांना ९१ हजार २१६ आणि राहुल कलाटे यांना ४० हजार ५०७ मते मिळाली आहेत. या आकडेवारीचा विचार केल्यास कलाटेंनी बंडखोरी केली नसती तर या मतदारसंघातही कसब्याप्रमाणेच निकाल लागला असता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कदाचित अश्विनी जगताप जिंकल्या असत्या तरी त्यांना मोठं मताधिक्य मिळालं नसतं.

त्यामुळे चिंचवडमधील हा पॅटर्न पुढच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीसाठी अडचणीचा ठरू शकतो. त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या तीन पक्षांसोबत इतक काही छोटे मोठे पक्ष असल्याने या सार्वत्रिक निवड़णुकांच्या वेळी अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारली जाणे अपरिहार्य ठरणार आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीला उत येण्याची दाट शक्यता आहे. त्यातच मतविभाजन घडवून निकालावर प्रभाव पाडू शकतील अशा बंडखोरांना भाजपाकडून पाठबळ मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत पुढील निवडणुका एकत्र ल़ढण्याची रणनीती आखणाऱ्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे आजच्या निकालांमुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर फार मोठा परिणाम होणार नाही. मात्र हे दोन पॅटर्न पुढच्या काही काळासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे ठरतील, एवढं नक्की!

टॅग्स :kasba-peth-acकसबा पेठchinchwad-acचिंचवडBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस