शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दोन पोटनिवडणुका दोन पॅटर्न, कुठला वाढवणार कुणाचं टेन्शन? असं दिसतंय पुढचं समिकरण  

By बाळकृष्ण परब | Updated: March 2, 2023 17:54 IST

Assembly by Election Results: कसबा आणि् चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांमधून दोन पॅटर्न स्पष्टपणे दिसून आले आहेत. त्या पॅटर्नचा महाष्ट्रातील राजकारणावर आणि पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांवरही ठळक परिणाम होताना दिसणार आहे. 

- बाळकृष्ण परब सध्याच्या राजकीय उलथापालथीमध्ये राज्यातील राजकारणासाठी महत्त्वाच्या असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं. या पोटनिवडणुकीतील निकालामध्ये भाजपाला पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव पत्करावा लागला आहे. इथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली आहे. तर तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचा लाभ झाल्याने भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप ह्या विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. दरम्यान, या दोन मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांमधून दोन पॅटर्न स्पष्टपणे दिसून आले आहेत. त्या पॅटर्नचा भाजपा व शिंदेंची शिवसेना आणि दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्यात विभागलेल्या महाष्ट्रातील राजकारणावर आणि पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांवरही ठळक परिणाम होताना दिसणार आहे. 

यातील पहिला पॅटर्न दिसून आला तो पुण्यातील कसबा मतदारसंघात. हा मतदारसंघ भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला. एक दोन अपवाद वगळता गेल्या ४०-४५ वर्षांत येथे भाजपाचा पराभव झाला नव्हता. मात्र ही पोटनिवडणूक त्याला अपवाद ठरली. येथे सहानुभूतीची लाट असण्याची शक्यता विचारात न घेता भाजपाने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देता ती हेमंत रासनेंना दिली. तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या रूपात तगडा जनसंपर्क असलेला उमेदवार दिला. एवढंच नाही तर संपूर्ण प्रचारामध्ये महाविकास आघाडीमध्ये कमालीचं ऐक्य दिसून आलं. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडूनही शिस्तबद्ध प्रचार झाला. तसेच विविध माध्यमातून भाजपाविरोधात वातावरणनिर्मिती करण्यातही महाविकास आघाडी आणि काँग्रेसला यश आलं. त्यामुळे ही निवडणूक भाजपाला जड जाणार असं सुरुवातीपासूनच दिसत होतं. अखेर तसंच घडलं.

दुसरीकडे भाजपाच्या गोटात मात्र सुरुवातीपासूनच गोंधळ दिसून आला. अगदी उमेदवार निवडीपासून या गोंधळाला सुरुवात झाली होती. सहानुभूतीचा लाभ घेण्यासाठी टिळक कुटुंबात उमेदवारी द्यायची का, याचाही विचार झाला. मात्र अखेरीस रासनेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र त्यामुळे सहानुभूतीचा मुद्दा या निवडणुकीतून निघून गेला. तसेच भाजपाच्या पारंपरिक मतदारांत नाराजीचं वातावरण निर्माण झालं. ते दूर करण्याचे सकारात्मक प्रयत्न झाले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून भाजपाच्या मतदारांचं मतदान कमी झाल्याचंही दिसून आलं. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि इतर नेत्यांनी केलेल्या आक्रमक प्रचारामुळे भाजपा बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते. त्यात गिरीश बापट यांना आजारी असताना प्रचारासाठी आणल्याचा मुद्दा विरोधकांनी आक्रमकपणे भाजपाविरोधात वापरला. तसेच मतदानादिवशी झालेले गैरप्रकारांचे आरोप आणि धंगेकरांचे उपोषण यामुळेही भाजपाच्या विरोधात वातावरणनिर्मिती झाली. अखेरीस या सर्वाचा फायदा घेत धंगेकर विजयी झाले. त्यांच्या विजयामुळे भाजपाविरोधात प्रबळ उमेदवार देऊन, शिस्तबद्ध प्रचार करत परस्परात ऐक्य राखले तर भाजपाला पराभूत करता येते, हे या पॅटर्नमधून दिसून आले. 

या पोटनिवडणुकीतील दुसरा पॅटर्न दिसून आला तो पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये. पिंपरी-चिंडवडणमधील पोटनिवडणुकीसाठी भाजपाने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात सहानुभूतीच्या लाटेचा विचार केला गेला. तसेच अपेक्षेप्रमाणे अश्विनी जगताप यांनी येथे ३० हजारांहून अधिक मताधिक्यासह विजयी आघाडी घेतली आहे. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्याविरोधात राहुल कलाटे यांनी केलेली बंडखोरीही निर्णायक ठकताना दिसत आहे. तसेच कलाटे यांच्या बंडखोरीमुळे मतविभाजन होऊन निकालाला कलाटणी मिळाल्याचे आकडे समोर येत आहेत. ३३ व्या फेरीच्या आकडेवारीपर्यंत पाहिल्यास अश्विनी जगताप यांना १ लाख २५ हजार १३० मते मिळाली आहेत. तर नाना काटे यांना ९१ हजार २१६ आणि राहुल कलाटे यांना ४० हजार ५०७ मते मिळाली आहेत. या आकडेवारीचा विचार केल्यास कलाटेंनी बंडखोरी केली नसती तर या मतदारसंघातही कसब्याप्रमाणेच निकाल लागला असता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कदाचित अश्विनी जगताप जिंकल्या असत्या तरी त्यांना मोठं मताधिक्य मिळालं नसतं.

त्यामुळे चिंचवडमधील हा पॅटर्न पुढच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीसाठी अडचणीचा ठरू शकतो. त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या तीन पक्षांसोबत इतक काही छोटे मोठे पक्ष असल्याने या सार्वत्रिक निवड़णुकांच्या वेळी अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारली जाणे अपरिहार्य ठरणार आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीला उत येण्याची दाट शक्यता आहे. त्यातच मतविभाजन घडवून निकालावर प्रभाव पाडू शकतील अशा बंडखोरांना भाजपाकडून पाठबळ मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत पुढील निवडणुका एकत्र ल़ढण्याची रणनीती आखणाऱ्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे आजच्या निकालांमुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर फार मोठा परिणाम होणार नाही. मात्र हे दोन पॅटर्न पुढच्या काही काळासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे ठरतील, एवढं नक्की!

टॅग्स :kasba-peth-acकसबा पेठchinchwad-acचिंचवडBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस