कसाराही ‘माळीण’च्या वाटेवर !
By Admin | Updated: September 3, 2014 23:08 IST2014-09-03T23:08:54+5:302014-09-03T23:08:54+5:30
पुणो जिल्ह्यातील ‘माळीण’ गावाची पुनरावृत्ती शहापूर तालुक्यातील कसारा येथे होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कसाराही ‘माळीण’च्या वाटेवर !
कसारा : पुणो जिल्ह्यातील ‘माळीण’ गावाची पुनरावृत्ती शहापूर तालुक्यातील कसारा येथे होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहापूर तालुक्यातील संमिo्र लोकवस्ती असलेल्या कसारा गावाची लोकसंख्या कागदोपत्री 35 हजारावर असून तर विना कागदोपत्री गावाची लोकसंख्या सरासरी 55 हजारावर पोहचली आहे. मुंबई, ठाणो, कल्याण या ठिकाणी नोकरीधंद्यासाठी जाण्यासाठी अग्रभागी असलेल्या कसारा गावात नगर, पुणो,
नाशिक, जळगांव, भुसावळ, मनमाड, मालेगांव, धुळे, जालना यासह र}ागिरी, चिपळून या भागातील अनेकजण कसा:यात वर्षानुवर्षापासून वास्तव करीत आहेत.
सूपंर्ण परिसर वनविभाग व महसूलच्या ताब्यात असला तरी 75 टक्के वनविभाग तर 25 टक्के महसुली जमीन असलेल्या कसा:यात लोकांनी डोंगर टेकडय़ा पोखरून घरे बांधली. मराठा, आगरी, कोळी, ठाकूर, आदिवासी, दलित समाजाचे लोक या गावात वास्तव्यास आहेत. गावाच्या चारही बाजूस डोंगर टेकडय़ा असल्याने आपल्या सोनीनुसार लोकांनी घरे बांधलीत परिसरातील महात्मा फुलेनगर, तानाजी नगर, कोळीवाडा, आनंदनगर, मिलिंदनगर, देऊळवाडी, ठाकूरवाडी येथील डोंगर टेकडय़ांवर डोंगर पोखरून घरे बांधली. या घरांना वीज, पाणी, यासह सुविधा ग्रामपंचायत प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. माळीण दुर्घटनेनंतर मात्र यामध्ये भितीचे सावट आहे.
घरे बांधलीत त्याला काही धोका तर नाही ना? माळीण सदृश्य स्थिती आपणाकडे तर होणार नाही ना अशी भिती वाटणा:या ग्रामस्थांची झोप मात्र सध्या उडाली आहे. कसारा परिसरात सतत कोसळणा:या पाऊसामुळे शासकीय यंत्रणोने ही कसा:याकडे मोर्चा वळविला असून तहसील, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने गावाचा सव्र्हे करित धोकादायक ठिकाणी असलेल्या घरांना नोटीसा देत सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कसा:यातील कोळीवाडा -तानाजी नगर येथे 2क्क्8 साली डोंगरकडा कोसळून मोठय़ा प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु त्यावेळी वस्ती कमी असल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र आजमितीस या कोसळलेल्या डोंगर कडय़ावर शेकडो घरे उभी राहिली आहेत. या वस्ती लगतच
मोठमोठे डोंगर आहेत. पाऊसामुळे अनेक डोंगरांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात डोंगर कोसळण्याची भीती आहे. डोंगर टेकडय़ांवर वसलेल्या गोर गरीब जनतेच्या घ्ज्ञरांची व संबंधित डोंगर टेकडय़ांची भूगर्भतज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी होत असून माळीणच्या पाश्र्वभूमीवर कसा:यातील डोंगर टेकडय़ांवर राहणा:या ग्रामस्थांना आपत्कालीन प्रसंगी काय करावे काय नाही याचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी शिवसेनेचे शहरसचिव र}ाकर लहाणो यांनी प्रशासनाकडे केली आहे. वनविभागाच्या जागेत 7क् टक्के लोकवस्ती आहे. शासनाने वर्षानुवष्रे वास्तव्यास असलेल्या या रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आताच पाऊले उचलावीत अशी मागणी रहिवाशांकडून केली आहे.
धोकादायक ठिकाणी वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतमार्फत नोटीस स्वरुपात सूचना देण्यात आल्या आहेत. रहिवाशींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज आहे.
- सुमन घारे, सरपंच कसारा, मोरपावणो ग्रा.प.
2क्क्8 मध्ये या ठिकाणी डोंगर कडा कोसळून जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक गाडय़ा अडकल्या होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. परंतु यावेळी त्या ठिकाणी (डोंगरावर) वस्ती वाढल्याने सदर भाग संवेदनशील आहे.
- राजू आयरे, ग्रामस्थ, कोळीवाडा