शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

"आंदोलन केलं तर आम्ही गप्प बसणार का?"; आदित्य ठाकरेंच्या मागणीवरुन भडकले CM सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 10:35 IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर आदित्य ठाकरेंनी केलेल्या मागणीला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बालिश म्हटलं आहे.

CM Siddaramaiah on Aaditya Thackeray : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध करत परवानगी नाकारली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या एकीकरण समितीच्या नेत्यांकडून बेळगावात आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कर्नाटक पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा संघर्ष पेटला आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आदित्य ठाकरे यांच्या बेळगावला केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या मागणीला बालिश म्हटलं आहे.

बेळगावमध्ये होणाऱ्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध केला होता. तसेच या मेळाव्याला परवानगी नाकारत मराठी भाषिक आंदोलकांची कर्नाटक पोलिसांनी धरपकड केली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनातदेखील उमटले. ठाकरे गटाने राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच आदित्य ठाकरे यांनी दोन्ही राज्यांमधील सर्व विवादित भाग तातडीने केंद्रशासित करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. मुख्यमंत्री फडणवीस सरकारने यावर प्रस्ताव आणल्यास तो एकमताने मंजूर केला जाईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.  आदित्य ठाकरे यांच्या मागणीवरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"हे बालिश विधान आहे. आमच्यासाठी महाजन अहवाल अंतिम आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा काही मागू नये आणि त्यांनीही मागू नये. बेळगावला केंद्रशासित प्रदेश कसा घोषित करता येईल? आणि, महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन केल्यास आम्ही गप्प बसणार का?," असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

"बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या ह्या अन्यायाचा तीव्र निषेध! बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच! माझं कर्नाटकातल्या सरकारला आवाहन आहे की त्यांनी मराठी माणसांवरचा हा अन्याय तातडीने थांबवावा! महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठं काहीही नाही! आणि केंद्र सरकारकडे देखील मागणी आहे की हा सर्व विवादित भाग तातडीने केंद्रशासित करावा, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान, कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी त्यास विरोध केला. समितीच्या लोकांनी बेळगावात मेळावा आयोजित केली होता. परंतु कर्नाटक सरकारने या कार्यक्रमावर बंदी घातली. यासोबतच महाराष्ट्रातील नेत्यांच्या कर्नाटकात प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेsiddaramaiahसिद्धरामय्याmaharashtra ekikaran samiteeमहाराष्ट्र एकीकरण समिती