शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कपिलदेवने खेळाडूंना विश्वास दिला, राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रॉसी ईलेव्हन’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 5:53 AM

मुंबई : क्रिकेट केवळ मोठ्या शहरांतील खेळाडूंसाठी मर्यादित नसल्याची मानसिकता सर्वप्रथम बदलली ती कपिलदेवने. कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना मोठा विश्वास दिला की भारतासाठी क्रिकेट कोणीही खेळू शकतं.

मुंबई : क्रिकेट केवळ मोठ्या शहरांतील खेळाडूंसाठी मर्यादित नसल्याची मानसिकता सर्वप्रथम बदलली ती कपिलदेवने. कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना मोठा विश्वास दिला की भारतासाठी क्रिकेट कोणीही खेळू शकतं. पूर्वी देशातील छोट्या शहरांतून अनेक खेळाडू आले, पण त्यांना आपली छाप पाडता आली नाही. कपिलने मात्र सर्व चित्रच बदलून टाकत भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवली, असे मत लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी मांडले.ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी क्रिकेटवर लिहिलेल्या ‘डेमोक्रॉसी ईलेव्हन’ पुस्तकाचे भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांच्या हस्ते सोमवारी मुंबईत प्रकाशन करण्यात आले.या वेळी माधव आपटे, नरी कॉन्टेÑक्टर, अजित वाडेकर, सुनील गावसकर, मोहम्मद अझरुद्दिन, सचिन तेंडुलकर आणि दिवंगत क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या पत्नी नंदिनी आणि क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा पार पाडला.या वेळी हर्षा भोगले, गावसकर, तेंडुलकर आणि राजदीप सरदेसाई यांनी जुन्या आठवणी, आधुनिक क्रिकेट आणि खेळाडूंची बदललेली मानसिकता यावर चर्चा करत कार्यक्रमात रंग भरले.गावसकर म्हणाले की, ‘कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना उच्च दर्जाचे क्रिकेट खेळण्याचा विश्वास दिला. त्याआधी मेट्रो शहरातील खेळाडू आपले वर्चस्व गाजवत होते. पण कपिलने हे चित्र बदलले. आज भारताची वेगवान गोलंदाजी उच्च दर्जाची झाली आहे आणि माझ्या मते याचे सर्व श्रेय कपिलला जाते. कपिलचे भारतीय क्रिकेटमधील योगदान अतुलनीय आहे.’त्याचप्रमाणे आज क्रिकेटमध्ये तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिले जात आहे. याविषयी सचिन म्हणाला की, ‘नक्कीच आज तंदुरुस्तीला अधिक महत्त्व आले आहे आणि हे सर्व आयपीएलमुळे झाले आहे.आज भारतीय संघ समतोल दिसत आहे. गोलंदाजदेखील चांगली फलंदाजी करताना दिसतात,जे भारतासाठी खूप चांगले आहे. हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंमुळे भारतीय संघाला अधिक बळकटी येत आहे.’>भारतीय संघात आल्यापासून विराट कोहलीच्या स्वभावामध्ये बदल झालेला नाही. मी त्याच्यातील जोश बघितला असून अनेकांना त्याचा जोश पसंत नव्हता. तसेच, अनेक जण त्याच्यावर टीकाही करत होते. मात्र, आज हाच जोश भारतीय संघाची मजबूत बाजू बनला आहे. कोहलीमध्ये फारसा बदल झाला नाही, मात्र त्याच्या आजूबाजूचे लोक नक्कीच बदलले. माझ्या मते एक खेळाडू म्हणून स्वत:ला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळायलाच हवे.- सचिन तेंडुलकर

टॅग्स :Cricketक्रिकेटSachin Tendulkarसचिन तेंडूलकर