शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण विजय दिवस व मराठा आरमाराची मुहूर्तमेढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 08:35 IST

मराठ्यांच्या इतिहासात २४ ऑक्टोबर १६५७ या तारखेस अनन्यसाधारण महत्व आहे. अश्विन कृष्ण द्वादशी – म्हणजेच वसुबारस. ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले.

ठळक मुद्दे मराठ्यांच्या इतिहासात २४ ऑक्टोबर १६५७ या तारखेस अनन्यसाधारण महत्व आहे.अश्विन कृष्ण द्वादशी – म्हणजेच वसुबारस. ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले.महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडीशेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला. याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले.

-प्रतिश खेडेकर

मुंबई- मराठ्यांच्या इतिहासात २४ ऑक्टोबर १६५७ या तारखेस अनन्यसाधारण महत्व आहे. अश्विन कृष्ण द्वादशी – म्हणजेच वसुबारस. ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले. महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडीशेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला. याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले. दुर्गाडीचा पहिला दगड कधी रचला गेला, अथवा आरमाराचा पहिला पाया रचला, याबाबत इतिहास मौन बाळगून आहे. कसेही असले तरी, कल्याणचे स्वातंत्र्य दिन हेच खऱ्या अर्थाने मराठा आरमार दिन आहे. कारण इथेच मराठेशाहीचा पहिला आरमारी दुर्ग बांधला गेला – दुर्गाडी.

दीड शतकाहून जास्त काळ आपले सागरी स्वातंत्र्य हरपून बसलेल्या भारतात, स्वतःचे आरमार उभारणारे, व सागरावर पाश्चात्यांशी दोन हात करू पाहणारे फक्त मराठेच.

कोळी, भंडारी, आगरी, दाल्दी, सारख्या दर्यावर्दी जमातींनी या नूतन आरमाराची धुरा सांभाळली. पुढे कान्होजी आंग्रे, आनंदराव धुळप, बाजीराव बेळोसे सारखे जातिवंत सरदार नावारूपाला आले.

“ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र” या तंत्राप्रमाणे विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी व कुलाबा सारखे जलदुर्ग बांधले. गुराब, गलबत, पाल, शिबाड, मछवे, सारखी जहाजे बांधून समुद्रास आपले मांडलिक केले. 

या आरमारामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारास नवीन चेतना मिळाली. मराठी जहाजे पश्चिमेस येमेनपासून पूर्वेस इंडोनेशिया पर्यंत गेल्याची नोंद सापडते. पोर्तुगीजांवर अंकुश राहावा म्हणून मस्कत(ओमान) च्या इमामाशी व्यापारी व राजकीय संबंध स्थापित केले. 

सुरुवातीस आरमाराचे प्रत्येकी दोनशे जहाजे असे करून दोन सुभे होते व प्रत्येकावर एक सुभेदार. संभाजी महाराजांनी आरमाराची पुर्नरचना केली. आरमारात पाच सुभे, व प्रत्येक सुभ्यात ५ मोठी गुराबे व १५ गलबते. सरसुभेदार, हे नवीन पद  निर्माण केले. गोविंदजी जाधव, सिदोजी गुजर, व कान्होजी आंग्रे हे क्रमाने संभाजी, राजाराम, व महाराणी ताराबाई यांचे सरसुभेदार होते. शाहूकाळात सरकारचे व सरदारांचे असे एकूण पाच मराठा आरमारे अस्तित्वात होती - आंग्रे, पेशवे, कोल्हापूर, गायकवाड, व सावंतवाडीकर.

मराठ्यांना समकालीन युरोपियन हेतुपुरस्सरपणे “लुटारू” म्हणून संबोधित. मुळात मराठे फक्त जहाजाकडे परवाना आहे किंवा नाही हे तपासत. परवाना नसणाऱ्या जहाजाला अटक होत असे.  या हेतुपुरस्सर बदनामी मागे पाश्चात्यांची मराठ्यांबद्दल असलेली भीतीच अभिप्रेत आहे.

१८व्या शतकातील भारताचा इतिहास हा मराठ्यांचाच इतिहास आहे. आणि आरमारा शिवाय मराठ्यांचा इतिहास अपूर्ण आहे.  महाराष्ट्रीयांच्या शौर्याची ही आरमार रुपी पताका प्रत्येकाच्या विचारजहाजावर अभिमानाने फडकत राहिली पाहिजे.

(लेखक इतिहासप्रेमी आणि अभ्यासक आहेत.)