शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

केवळ सात दिवसांत सायकलने गाठले रामेश्वरम, प्रदूषणमुक्तीबाबत जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 07:12 IST

awareness about pollution : दैनंदिन तब्बल २३० किलोमीटरच्या प्रवासात नारायणने प्रदूषणमुक्तीबाबत जनजागृती केली.

- सुनील काकडे 

वाशिम : शांती व एकात्मतेचा संदेश घेऊन यापूर्वी वाशिम ते वाघा बॉर्डर (पंजाब) सायकलवारी पूर्ण करणाऱ्या वाशिम येथील नारायण व्यास या ध्येयवेड्या सायकलपटूने आता १,७०० किलोमीटरचे अंतर कापून अवघ्या ७ दिवसांत रामेश्वरम (तामिळनाडू) गाठले आहे. तेथून १४ फेब्रुवारी रोजी रामसेतू आणि कन्याकुमारीच्या दिशेने तो आगेकूच करणार आहे. दैनंदिन तब्बल २३० किलोमीटरच्या प्रवासात नारायणने प्रदूषणमुक्तीबाबत जनजागृती केली.दूरवरचा प्रवास सायकलने सहज पूर्ण करण्याच्या गुणामुळे नारायण व्यास हे नाव एव्हाना परराज्यातही परिचयाचे झाले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये नारायणने वाशिम ते लालबाग (मुंबई) हे ६०० किलोमीटरचे अंतर सायकलने पार केले होते. त्यानंतर, ब्रेवेट सायकल स्पर्धांमध्ये सहभागी होऊन २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरचे अंतर वेळेत पूर्ण करून ‘सुपर राँदिनिअर’ हा सायकलस्वारांसाठी असलेला बहुमान प्राप्त केला. मार्च, २०२० मध्ये लॉकडाऊनपूर्वी त्याने वाशिम ते वाघा बॉर्डर (पंजाब) हे १,८०० किलोमीटरचे अंतर सायकलने अवघ्या १० दिवसांत पूर्ण करण्याचा विक्रम करून दाखविला होता. लॉकडाऊन काळातील अभिनेता सोनू सूद याच्या कार्याने प्रेरित होऊन वाशिम ते कन्याकुमारी हे २,००० किलोमीटरचे अंतर ७ दिवसांत पूर्ण करण्याचा ध्यास नारायणने बाळगला होता. ७ फेब्रुवारीपासून प्रवासाला सुरुवात करण्यात आली.

सायकल प्रवासात ‘बॅकअप व्हॅन’ या प्रवासात नारायणसोबत ‘बॅकअप व्हॅन’ आहे. सौरभ व्यास आणि राजू होळपादे हे सवंगडी नारायणला साथ देत आहेत. यादरम्यान स्वयंपाक करून तिघेही रस्त्यात कुठेही भोजन करतात. झोपण्याचे साहित्य व कपड्यांची सुविधाही आहे. 

वाहनांच्या दिवसागणिक वाढत चाललेल्या संख्येमुळे प्रदूषणवाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकाने सायकल चालविण्यावर आता विशेष भर देणे आवश्यक आहे. त्याचसाठी मी सायकल चालवून प्रदूषणमुक्तीचा संदेश देत आहे. - नारायण व्यास, सायकलपटू, वाशिम

टॅग्स :washimवाशिमenvironmentपर्यावरण