शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पक्ष स्थापन केला म्हणून मालकी होत नाही; अजित पवार गटानं शरद पवार गटाला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 09:58 IST

लोकशाहीत खासगी संपत्तीची तुलना राजकीय पक्षाशी करू शकत नाहीत. राजकीय पक्ष हा लोकशाही घटकाचा एक भाग आहे असं अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटलं.

मुंबई – राष्ट्रवादीतील ९० टक्के लोकप्रतिनिधी अजित पवारांच्या नेतृत्वात आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी अजितदादांसोबत आहेत. गुणांकनाच्या आधारे निवडणूक आयोग निकाल देते, त्यामुळे आमच्या बाजूने निकाल येईल हा आत्मविश्वास आहे. परंतु जर आम्हाला आधीच निकाल माहिती आहे असं कुणी म्हणत असेल तर ते दुधखुळे असून वस्तूस्थिती नाकारण्यासारखे आहे. पक्ष स्थापन केला म्हणून कायमस्वरुपी मालकी होत नाही. ही खासगी प्रॉपर्टी नव्हे अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार गटाला फटकारले आहे.

उमेश पाटील म्हणाले की, आम्ही शरद पवारांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला नाही. शरद पवारांचे योगदान कुणीही नाकारत नाही. पक्षाचे नेतृत्व पवारांकडे असताना विचारधारेच्या मुद्द्यावर जे आज प्रश्न उपस्थित केले जातात. भाजपाची विचारधारा आम्हाला मान्य नाही म्हणून त्यांच्यासोबत आम्ही जात नाही असा आक्षेप आज घेतला जातो. त्यात एक गोष्ट लक्षात घ्या, २०१४ मध्ये ईडी, सीबीआय नव्हती तेव्हा भाजपाला विनाशर्त पाठिंबा देण्यात आला. पुरोगामी विचारधारेशी तडजोड करणार नाही असं म्हटलं जाते मग २०१४ ला भाजपाला पाठिंबा देण्याची घोषणा का करण्यात आली? हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना पडला आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पवारांना मैद्याचे पोते म्हटलं, खायला नाही पीठ त्यांना कशाला पाहिजे विद्यापीठ असं विधान केले, तशीच भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. शरद पवारांवर सगळ्यात घाणेरड्या शब्दात टीका बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंनी केली. मग त्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावता मग कार्यकर्त्यांना प्रश्न पडणार नाही का? याची उत्तरे न देता अजित पवार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी भाजपासोबत जाऊन विचारधारेशी प्रतारणा केली असं म्हणण्याचा नैतिक अधिकार कुणालाही नाही असंही उमेश पाटील यांनी ठणकावले आहे.

दरम्यान, जयंत पाटील खूप अभ्यासू नेते, पक्षाच्या संघटनेची समज आहे. परंतु लोकशाहीत खासगी संपत्तीची तुलना राजकीय पक्षाशी करू शकत नाहीत. राजकीय पक्ष हा लोकशाही घटकाचा एक भाग आहे. त्यामुळे अशी तुलना करणे अत्यंत चुकीचे आहे. कौटुंबिक विचारही केला तर समजा, माझे वडील ७०-७२ वर्षाचे होतात तेव्हा मला असं वाटते, मी आता कतृत्वाला आलो आहे, वडिलांनी कष्ट केले, इतके मोठे साम्राज्य उभे केले आता वडिलांनी आराम केला पाहिजे. ही वडिलांच्या प्रेमापोटी केलेली भावना असते, वडिलांना घरात बसवण्यासाठी केलेली वक्तव्ये नसतात. तुम्ही कुठल्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कलुषित भावनेने बघितले तर तुम्हाला वडिलांना घरातून बाहेर काढणे, घरातच बसवणे असं बोलू शकतो. वडिलांनी उतारपणात, आजारपणात स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्यावे हे कौटुंबिक सुदृढपणाचे लक्षण आहे असंही उमेश पाटील यांनी म्हटलं.

अजित पवारांवर पक्षांतर्गत अन्याय

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे न देता सहानुभूतीची लाट कशी निर्माण होईल? २०१४ ला भाजपाला पाठिंबा का दिला? ज्या बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरेंनी कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत सरकार बनवले त्याचे उत्तर नाही. काँग्रेसने कायम शरद पवारांना डावलले, जर सहानुभूती निर्माण व्हायची असेल तर ती अजित पवारांच्या बाबतीत होईल. देशपातळीवर पक्ष वाढवण्याची क्षमता असणारे अनेक नेते असताना ते केवळ महाराष्ट्रात लक्ष देत राहिले, एकटे अजित पवार पक्ष सांभाळण्यास सक्षम होते. अजित पवारांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी कसलीही कसूर केली नसती. परंतु सगळेच लोकं याठिकाणी एकत्र येत त्यांनी जास्त वेळ दिल्याने नुकसान झालंय, अजित पवारांवर पक्षांतर्गत अन्याय झाला असा आरोप उमेश पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस