शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

पक्ष स्थापन केला म्हणून मालकी होत नाही; अजित पवार गटानं शरद पवार गटाला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 09:58 IST

लोकशाहीत खासगी संपत्तीची तुलना राजकीय पक्षाशी करू शकत नाहीत. राजकीय पक्ष हा लोकशाही घटकाचा एक भाग आहे असं अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटलं.

मुंबई – राष्ट्रवादीतील ९० टक्के लोकप्रतिनिधी अजित पवारांच्या नेतृत्वात आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी अजितदादांसोबत आहेत. गुणांकनाच्या आधारे निवडणूक आयोग निकाल देते, त्यामुळे आमच्या बाजूने निकाल येईल हा आत्मविश्वास आहे. परंतु जर आम्हाला आधीच निकाल माहिती आहे असं कुणी म्हणत असेल तर ते दुधखुळे असून वस्तूस्थिती नाकारण्यासारखे आहे. पक्ष स्थापन केला म्हणून कायमस्वरुपी मालकी होत नाही. ही खासगी प्रॉपर्टी नव्हे अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार गटाला फटकारले आहे.

उमेश पाटील म्हणाले की, आम्ही शरद पवारांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला नाही. शरद पवारांचे योगदान कुणीही नाकारत नाही. पक्षाचे नेतृत्व पवारांकडे असताना विचारधारेच्या मुद्द्यावर जे आज प्रश्न उपस्थित केले जातात. भाजपाची विचारधारा आम्हाला मान्य नाही म्हणून त्यांच्यासोबत आम्ही जात नाही असा आक्षेप आज घेतला जातो. त्यात एक गोष्ट लक्षात घ्या, २०१४ मध्ये ईडी, सीबीआय नव्हती तेव्हा भाजपाला विनाशर्त पाठिंबा देण्यात आला. पुरोगामी विचारधारेशी तडजोड करणार नाही असं म्हटलं जाते मग २०१४ ला भाजपाला पाठिंबा देण्याची घोषणा का करण्यात आली? हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना पडला आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पवारांना मैद्याचे पोते म्हटलं, खायला नाही पीठ त्यांना कशाला पाहिजे विद्यापीठ असं विधान केले, तशीच भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. शरद पवारांवर सगळ्यात घाणेरड्या शब्दात टीका बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंनी केली. मग त्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावता मग कार्यकर्त्यांना प्रश्न पडणार नाही का? याची उत्तरे न देता अजित पवार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी भाजपासोबत जाऊन विचारधारेशी प्रतारणा केली असं म्हणण्याचा नैतिक अधिकार कुणालाही नाही असंही उमेश पाटील यांनी ठणकावले आहे.

दरम्यान, जयंत पाटील खूप अभ्यासू नेते, पक्षाच्या संघटनेची समज आहे. परंतु लोकशाहीत खासगी संपत्तीची तुलना राजकीय पक्षाशी करू शकत नाहीत. राजकीय पक्ष हा लोकशाही घटकाचा एक भाग आहे. त्यामुळे अशी तुलना करणे अत्यंत चुकीचे आहे. कौटुंबिक विचारही केला तर समजा, माझे वडील ७०-७२ वर्षाचे होतात तेव्हा मला असं वाटते, मी आता कतृत्वाला आलो आहे, वडिलांनी कष्ट केले, इतके मोठे साम्राज्य उभे केले आता वडिलांनी आराम केला पाहिजे. ही वडिलांच्या प्रेमापोटी केलेली भावना असते, वडिलांना घरात बसवण्यासाठी केलेली वक्तव्ये नसतात. तुम्ही कुठल्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कलुषित भावनेने बघितले तर तुम्हाला वडिलांना घरातून बाहेर काढणे, घरातच बसवणे असं बोलू शकतो. वडिलांनी उतारपणात, आजारपणात स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्यावे हे कौटुंबिक सुदृढपणाचे लक्षण आहे असंही उमेश पाटील यांनी म्हटलं.

अजित पवारांवर पक्षांतर्गत अन्याय

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे न देता सहानुभूतीची लाट कशी निर्माण होईल? २०१४ ला भाजपाला पाठिंबा का दिला? ज्या बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरेंनी कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत सरकार बनवले त्याचे उत्तर नाही. काँग्रेसने कायम शरद पवारांना डावलले, जर सहानुभूती निर्माण व्हायची असेल तर ती अजित पवारांच्या बाबतीत होईल. देशपातळीवर पक्ष वाढवण्याची क्षमता असणारे अनेक नेते असताना ते केवळ महाराष्ट्रात लक्ष देत राहिले, एकटे अजित पवार पक्ष सांभाळण्यास सक्षम होते. अजित पवारांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी कसलीही कसूर केली नसती. परंतु सगळेच लोकं याठिकाणी एकत्र येत त्यांनी जास्त वेळ दिल्याने नुकसान झालंय, अजित पवारांवर पक्षांतर्गत अन्याय झाला असा आरोप उमेश पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस