शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

जुलै कोरडा; आता मदार पुढच्या दोन महिन्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 06:21 IST

राज्यातल्या सहा जिल्ह्यांत उणे पावसाची नोंद; मुंबईकरांवर ओढवलेले पाणीकपातीचे संकट गहिरे होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर भारत, महाराष्ट्रातील काही भाग वगळता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी पावसाचा जुलै महिना तसा कोरडाच गेला. परिणामी आता आॅगस्ट आणि सप्टेंबर असे पावसाचे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे असून, या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र मुंबईकरांवर ओढावलेले पाणी कपातीचे संकट आणखी गहिरे होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, मुंबईत जुलै महिन्यात मान्सून फार सक्रिय नव्हता. देशभरात मात्र तो बऱ्यापैकी सक्रिय होता. बिहारसह आसाममध्ये पूरसदृश स्थितीदेखील निर्माण झाली होती. महाराष्ट्राचा विचार करता मराठवाड्यात आणि विदर्भ येथे चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांसाठी हे सुचिन्ह आहे. कोकणात पन्नास टक्के पावसाची नोंद झाली असली तरी राज्यासाठी एवढा पाऊस पुरेसा नाही.

आॅगस्टच्या सुरुवातीपासून हवामानात बदल होतील आणि उत्तर कोकणासह दक्षिण कोकणात पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तो खरा ठरला तरच मुंबईकरांना दिलासा मिळेल. दरम्यान, येत्या सहा ते सात दिवसांत राज्याच्या पश्चिम किनारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली.१ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस :च्पालघरमध्ये उणे २७ टक्के पावसाची नोंद झाली. सर्वसाधारण येथे १ हजार २६२.३ मिमी. पावसाची नोंद होते. मात्र सद्य:स्थितीमध्ये ९२० मिमी. पाऊस नोंदविण्यात आला.च्याखालोखाल सातारा, नंदुरबार, अकोला, गोंदिया आणि गडचिरोली येथेही उणे पाऊस नोंदविण्यात आला.अशी झाली नोंद : सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद या चार जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि वाशिम जिल्ह्यात ५९ टक्क्यांपर्यंत, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा येथे १९ टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली.उणे पावसाची नोंदपालघर-२७, सातारा-२६, नंदुरबार-३३, अकोला-२१, गोंदिया-४३, गडचिरोली-२२ (उणे म्हणजे कमी पाऊस.) आकडे नोंद टक्केवारीत.

टॅग्स :Rainपाऊस