शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जुलै कोरडा; आता मदार पुढच्या दोन महिन्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 06:21 IST

राज्यातल्या सहा जिल्ह्यांत उणे पावसाची नोंद; मुंबईकरांवर ओढवलेले पाणीकपातीचे संकट गहिरे होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर भारत, महाराष्ट्रातील काही भाग वगळता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी पावसाचा जुलै महिना तसा कोरडाच गेला. परिणामी आता आॅगस्ट आणि सप्टेंबर असे पावसाचे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे असून, या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र मुंबईकरांवर ओढावलेले पाणी कपातीचे संकट आणखी गहिरे होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, मुंबईत जुलै महिन्यात मान्सून फार सक्रिय नव्हता. देशभरात मात्र तो बऱ्यापैकी सक्रिय होता. बिहारसह आसाममध्ये पूरसदृश स्थितीदेखील निर्माण झाली होती. महाराष्ट्राचा विचार करता मराठवाड्यात आणि विदर्भ येथे चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांसाठी हे सुचिन्ह आहे. कोकणात पन्नास टक्के पावसाची नोंद झाली असली तरी राज्यासाठी एवढा पाऊस पुरेसा नाही.

आॅगस्टच्या सुरुवातीपासून हवामानात बदल होतील आणि उत्तर कोकणासह दक्षिण कोकणात पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तो खरा ठरला तरच मुंबईकरांना दिलासा मिळेल. दरम्यान, येत्या सहा ते सात दिवसांत राज्याच्या पश्चिम किनारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली.१ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस :च्पालघरमध्ये उणे २७ टक्के पावसाची नोंद झाली. सर्वसाधारण येथे १ हजार २६२.३ मिमी. पावसाची नोंद होते. मात्र सद्य:स्थितीमध्ये ९२० मिमी. पाऊस नोंदविण्यात आला.च्याखालोखाल सातारा, नंदुरबार, अकोला, गोंदिया आणि गडचिरोली येथेही उणे पाऊस नोंदविण्यात आला.अशी झाली नोंद : सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद या चार जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि वाशिम जिल्ह्यात ५९ टक्क्यांपर्यंत, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा येथे १९ टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली.उणे पावसाची नोंदपालघर-२७, सातारा-२६, नंदुरबार-३३, अकोला-२१, गोंदिया-४३, गडचिरोली-२२ (उणे म्हणजे कमी पाऊस.) आकडे नोंद टक्केवारीत.

टॅग्स :Rainपाऊस