शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

जुलै कोरडा; आता मदार पुढच्या दोन महिन्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 06:21 IST

राज्यातल्या सहा जिल्ह्यांत उणे पावसाची नोंद; मुंबईकरांवर ओढवलेले पाणीकपातीचे संकट गहिरे होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर भारत, महाराष्ट्रातील काही भाग वगळता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी पावसाचा जुलै महिना तसा कोरडाच गेला. परिणामी आता आॅगस्ट आणि सप्टेंबर असे पावसाचे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे असून, या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र मुंबईकरांवर ओढावलेले पाणी कपातीचे संकट आणखी गहिरे होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, मुंबईत जुलै महिन्यात मान्सून फार सक्रिय नव्हता. देशभरात मात्र तो बऱ्यापैकी सक्रिय होता. बिहारसह आसाममध्ये पूरसदृश स्थितीदेखील निर्माण झाली होती. महाराष्ट्राचा विचार करता मराठवाड्यात आणि विदर्भ येथे चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांसाठी हे सुचिन्ह आहे. कोकणात पन्नास टक्के पावसाची नोंद झाली असली तरी राज्यासाठी एवढा पाऊस पुरेसा नाही.

आॅगस्टच्या सुरुवातीपासून हवामानात बदल होतील आणि उत्तर कोकणासह दक्षिण कोकणात पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तो खरा ठरला तरच मुंबईकरांना दिलासा मिळेल. दरम्यान, येत्या सहा ते सात दिवसांत राज्याच्या पश्चिम किनारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली.१ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस :च्पालघरमध्ये उणे २७ टक्के पावसाची नोंद झाली. सर्वसाधारण येथे १ हजार २६२.३ मिमी. पावसाची नोंद होते. मात्र सद्य:स्थितीमध्ये ९२० मिमी. पाऊस नोंदविण्यात आला.च्याखालोखाल सातारा, नंदुरबार, अकोला, गोंदिया आणि गडचिरोली येथेही उणे पाऊस नोंदविण्यात आला.अशी झाली नोंद : सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद या चार जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि वाशिम जिल्ह्यात ५९ टक्क्यांपर्यंत, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा येथे १९ टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली.उणे पावसाची नोंदपालघर-२७, सातारा-२६, नंदुरबार-३३, अकोला-२१, गोंदिया-४३, गडचिरोली-२२ (उणे म्हणजे कमी पाऊस.) आकडे नोंद टक्केवारीत.

टॅग्स :Rainपाऊस