शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

महाराष्ट्रासाठी ११ आणि १२ जुलै खूप महत्वाचे; दोन महत्वाचे प्रश्न सुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 21:43 IST

दोन्ही गट आपणच अधिकृत असल्याचे सांगत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील दोन राजकीय प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रासाठी ११ आणि १२ जुलै असे दोन दिवस खूप महत्वाचे आहेत. कारण या दोन दिवशी राज्यातील दोन महत्वाचे राजकीय प्रश्न सुटणार आहेत. ११ जुलैला शिंदे गटाच्या अपात्रतेवर निर्णय येणार आहे, तसेच १२ जुलै रोजी ओबीसी आरक्षणावर देखील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. यानंतर मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षण ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर येत्या १२ जुलैला निकाल येण्याची शक्यता आहे.

शिंदे सरकार आल्यावर राज्य सरकारकडे इम्पेरिकल डेटा सुपूर्द करण्यात आला आहे. मुख्य सचिवांकडे हा डेटा देण्यात आला आहे. यातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांची भेट घेतली. त्यावेळीच इकडे राज्यात मध्ये प्रदेश सरकारच्या धर्तीवर मागासवर्गीय आयोगाने तयार केलेला इम्पेरिकल डेटा मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे देण्यात आला. यावर १२ जुलैला सुनावणी होणार आहे.

याचबरोबर शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांविरोधात अपात्रता कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विधानसभा उपाअध्यक्षांनी ठाकरेंनी नेमलेला गटनेता अधिकृत ठरवला होता. त्याने बंडखोरांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र दिल्याने शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तसेच शिंदे सरकारविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. या दोन्ही प्रकरणांवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. दोन्ही गट आपणच अधिकृत असल्याचे सांगत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील दोन राजकीय प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेOBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना