शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

महाराष्ट्रासाठी ११ आणि १२ जुलै खूप महत्वाचे; दोन महत्वाचे प्रश्न सुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 21:43 IST

दोन्ही गट आपणच अधिकृत असल्याचे सांगत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील दोन राजकीय प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रासाठी ११ आणि १२ जुलै असे दोन दिवस खूप महत्वाचे आहेत. कारण या दोन दिवशी राज्यातील दोन महत्वाचे राजकीय प्रश्न सुटणार आहेत. ११ जुलैला शिंदे गटाच्या अपात्रतेवर निर्णय येणार आहे, तसेच १२ जुलै रोजी ओबीसी आरक्षणावर देखील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. यानंतर मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षण ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर येत्या १२ जुलैला निकाल येण्याची शक्यता आहे.

शिंदे सरकार आल्यावर राज्य सरकारकडे इम्पेरिकल डेटा सुपूर्द करण्यात आला आहे. मुख्य सचिवांकडे हा डेटा देण्यात आला आहे. यातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांची भेट घेतली. त्यावेळीच इकडे राज्यात मध्ये प्रदेश सरकारच्या धर्तीवर मागासवर्गीय आयोगाने तयार केलेला इम्पेरिकल डेटा मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे देण्यात आला. यावर १२ जुलैला सुनावणी होणार आहे.

याचबरोबर शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांविरोधात अपात्रता कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विधानसभा उपाअध्यक्षांनी ठाकरेंनी नेमलेला गटनेता अधिकृत ठरवला होता. त्याने बंडखोरांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र दिल्याने शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तसेच शिंदे सरकारविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. या दोन्ही प्रकरणांवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. दोन्ही गट आपणच अधिकृत असल्याचे सांगत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील दोन राजकीय प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेOBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना