शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मराठा आरक्षणावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब, राज्यभरात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 06:43 IST

मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.

मुंबई - मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. मात्र, १६ टक्के कोटा रद्द केला. हा कोटा गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार शिक्षण क्षेत्रात १३ व सरकारी नोकऱ्यांत १२ टक्के इतका असण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा आरक्षणावर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब होताच राज्यभर मराठा समाजाकडून जल्लोष साजरा करण्यात आला.‘सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग कायदा २०१८’ हा कायदा मंजूर करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. राज्यघटनेच्या १०२ व्या दुरुस्तीचा परिणाम सरकारच्या अधिकारांवर होत नाही, असे न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांनी राज्यात मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करताना स्पष्ट केले. कोणत्याही राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण न देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आम्हाला जाणीव आहे, असेही खंडपीठाने म्हटले. राज्य मागास प्रवर्गाचा अहवाल प्रमाणित माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे आणि मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, हा आयोगाने काढलेला निष्कर्ष योग्य आहे, असे आम्हाला वाटते, असेही न्यायालयाने म्हटले.मराठा आरक्षणाला विरोध करणाºया याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या निर्णयावर स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करण्यास नकार दिला.मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकºयांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तसेच पाठिंबा देणाºया काही याचिका दाखल झाल्या होत्या. तसेच एकूण२२ हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आले. त्यापैकी १६ सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ तर ६ विरोधात होते.मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागास आहे,असे जाहीर करून राज्य सरकारने३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रातआणि सरकारी नोकºयांत १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात कायदा मंजूर केला होता. तो न्यायालयाने वैध ठरविला.आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्यआरक्षणासंदर्भात सरकारने केलेला कायदा वैध असल्याचे व त्याअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या ‘सामाजिक, आर्थिक मागास प्रवर्गा’अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.५०%ची मर्यादा वाढविली जाऊ शकते‘अपवादात्मक स्थितीत, प्रमाणित संकलित माहितीच्या आधारे आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढविली जाऊ शकते. न्या. गायकवाड समितीने अशी अपवादात्मक स्थिती निदर्शनास आणली आहे,’ असे खंडपीठाने ५०० पानी निकालात म्हटले आहे.घटनेची १०२ वी दुरुस्ती करताना अनुच्छेद ३४२ (अ) मध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार,राष्ट्रपतींकडे आरक्षणासंदर्भात उपलब्ध असलेल्या यादीतील समाजालाच आरक्षण दिले जाऊ शकते. मात्र या दुरुस्तीचा परिणाम राज्य सरकारच्या अधिकारांवर होत नाही, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबई