शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
3
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
4
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
5
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
6
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
7
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
8
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
9
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
10
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
11
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
12
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
13
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
14
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
15
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
16
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
18
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
19
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
20
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब, राज्यभरात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 06:43 IST

मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.

मुंबई - मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. मात्र, १६ टक्के कोटा रद्द केला. हा कोटा गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार शिक्षण क्षेत्रात १३ व सरकारी नोकऱ्यांत १२ टक्के इतका असण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा आरक्षणावर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब होताच राज्यभर मराठा समाजाकडून जल्लोष साजरा करण्यात आला.‘सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग कायदा २०१८’ हा कायदा मंजूर करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. राज्यघटनेच्या १०२ व्या दुरुस्तीचा परिणाम सरकारच्या अधिकारांवर होत नाही, असे न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांनी राज्यात मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करताना स्पष्ट केले. कोणत्याही राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण न देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आम्हाला जाणीव आहे, असेही खंडपीठाने म्हटले. राज्य मागास प्रवर्गाचा अहवाल प्रमाणित माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे आणि मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, हा आयोगाने काढलेला निष्कर्ष योग्य आहे, असे आम्हाला वाटते, असेही न्यायालयाने म्हटले.मराठा आरक्षणाला विरोध करणाºया याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या निर्णयावर स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करण्यास नकार दिला.मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकºयांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तसेच पाठिंबा देणाºया काही याचिका दाखल झाल्या होत्या. तसेच एकूण२२ हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आले. त्यापैकी १६ सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ तर ६ विरोधात होते.मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागास आहे,असे जाहीर करून राज्य सरकारने३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रातआणि सरकारी नोकºयांत १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात कायदा मंजूर केला होता. तो न्यायालयाने वैध ठरविला.आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्यआरक्षणासंदर्भात सरकारने केलेला कायदा वैध असल्याचे व त्याअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या ‘सामाजिक, आर्थिक मागास प्रवर्गा’अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.५०%ची मर्यादा वाढविली जाऊ शकते‘अपवादात्मक स्थितीत, प्रमाणित संकलित माहितीच्या आधारे आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढविली जाऊ शकते. न्या. गायकवाड समितीने अशी अपवादात्मक स्थिती निदर्शनास आणली आहे,’ असे खंडपीठाने ५०० पानी निकालात म्हटले आहे.घटनेची १०२ वी दुरुस्ती करताना अनुच्छेद ३४२ (अ) मध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार,राष्ट्रपतींकडे आरक्षणासंदर्भात उपलब्ध असलेल्या यादीतील समाजालाच आरक्षण दिले जाऊ शकते. मात्र या दुरुस्तीचा परिणाम राज्य सरकारच्या अधिकारांवर होत नाही, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबई