शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

न्यायाधीशांची समिती ठेवणार राज्यातील रस्ते दुरुस्तीवर लक्ष, दोन न्यायाधीशांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 04:14 IST

राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, जिल्हापरिषद व ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील रस्ते व खड्डे दुरुस्त करण्याचा वारंवार आदेश देऊनही ही स्थिती सुधारत नसल्याने

मुंबई : राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, जिल्हापरिषद व ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील रस्ते व खड्डे दुरुस्त करण्याचा वारंवार आदेश देऊनही ही स्थिती सुधारत नसल्याने, अखेर उच्च न्यायालयानेच या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भातील तक्रारी व न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले जाते की नाही, हे सर्व पाहण्यासाठी उच्च न्यायालयाने न्या. के. आर. श्रीराम व न्या. जी. एस. कुलकर्णी या दोन विद्यमान न्यायाधीशांची विशेष समिती बुधवारी नेमली.रस्त्यांची स्थिती सुधारण्याबाबत व पावसाळ्यापूर्वी तातडीने खड्डे बुजविण्यासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या खंडपीठांनी अनेक आदेश दिल आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्याची अंशत:च अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्या आहेत. या प्रकरणी आम्हाला हस्तक्षेप करण्यासाठी त्यांनी भाग पाडले आहे. राज्य सरकारसाठी प्रशासन चालविण्याची आमची इच्छा नाही. मात्र, आता आमचा नाईलाज झाला आहे, असे खंडपीठानेम्हटले आहे.प्रत्येक पावसाळ्यात सामान्य माणसाचे हाल होतात आणि या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चव्हाट्यावर येतो,असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. या वेळी न्यायालयाने बॉम्बे हॉस्पिटलचे ज्येष्ठ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूचाही उल्लेख केला. २९ आॅगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उघडलेल्या मॅनहोलमध्ये पडूनडॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला आहे. खड्ड्यांचा प्रश्न आणि रस्त्यांची झालेली खराब अवस्था, ही केवळ मुंबईचीच समस्या नसून, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची समस्या असल्याचे निरीक्षणही यावेळी न्यायालयाने नोंदविले.‘तुम्ही (पक्षकार आणि वकील) चांगले आदेश देण्यास सांगता, पण त्या आदेशाची अंमलबजावणी होणार नसेल तर असे आदेशकाय कामाचे? आतापर्यंत याप्रकरणी देण्यात आलेल्या एकाही आदेशाची नीट अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तपशिलात आदेश (शहरातील रस्ते दुरुस्त करणे व खड्डे तत्काळ बुजविण्याचा आदेश) देऊनही डॉक्टरांचा मृत्यू झालाच. हे नाकारता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.घरी निघालेल्या सामान्य व्यक्तीच्या किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात असलेल्या सामान्य माणसाच्या डोक्यात काय विचार सुरू असेल? याची कल्पना करा. अशी कल्पना करणे गरजेचे आहे. कारण अशा स्थितीतही त्याने रस्त्यावर खड्डेपडले आहेत म्हणून काळजी घ्यावी, अशी अपेक्षा करणे पूर्णत: चुकीचे ठरणरे आहे. हे सोपे नाही. त्यामुळे तुम्हीच रस्ते चांगल्या स्थितीत ठेवा,’ असे मतही उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.कुठले रस्ते दुरुस्त करणे आवश्यक आहेत, याची पाहणी प्रत्येक जिल्ह्यातील प्रभाग अधिकाºयांनी करावी आणि ही माहिती महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाच्या (एमएलएसए) सचिवांना द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानंतर, प्राधिकरणाचे सचिव रस्त्यांच्या अवस्थेबद्दल, रस्ते दुरुस्त करण्याची आवश्यकता, त्यासाठी स्थानिक संस्थेने उचलेली पावले आदी मुद्द्यांचा समावेश करून, एक अहवाल बनवतील आणि हा अहवाल विशेष समितीपुढे सादर करण्यात येईल, असे न्यायालयाने नमूद केले.आतापर्यंत फक्त १८० तक्रारीगेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने प्राधिकरणाच्या सचिवांकडे रस्त्यांच्या दुर्दशेबाबत तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यानुसार, आतापर्यंत १८० तक्रारीच सचिवांकडे करण्यात आल्या आहेत. त्यावर न्यायालयाने याबाबत नागरिकांना जागरूक करण्याचे आवाहन केले. ‘मी स्वत: खड्डे असलेल्या किंवा खराब रस्त्यावरून जात नाही. मात्र, सामान्य माणसाठी मला हे निर्देश देणे भाग आहे. रस्ते नीट ठेवणे, हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्तव्य आहे,’ असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :Potholeखड्डेCourtन्यायालय