शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करणार - डी. के. शिवकुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:03 IST

कृष्णा नदीकाठावरील प्रदेशात दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्यासाठी महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करण्यास कर्नाटक सरकार कटिबध्द असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बेळगाव : कृष्णा नदीकाठावरील प्रदेशात दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्यासाठी महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करण्यास कर्नाटक सरकार कटिबध्द असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.महाराष्ट्र शासनाने कृष्णा नदीत कोयना धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात कर्नाटक पाणी महामंडळांच्या मुख्य अभियंता कार्यालयात सोमवारी बैठक झाली. यावेळी बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील आमदार व खासदार उपस्थित होते.या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, दरवर्षी चार टीएमसी पाण्याच्या वापरासंदर्भात महाराष्ट्र सरकारने आपल्या कराराचा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला आहे. उभय राज्यांच्या कृष्णाकाठ भागातील लोकांची पाण्याची समस्या कायमची संपुष्टात यावी, यासाठी कर्नाटक करार करण्यास सहमत आहे.हिवाळा व पावसाळ्यात प्रत्येकी दोन टीएमसी पाणी आम्हाला मिळवून दिल्यास उन्हाळ्यात पेयजल समस्याचे निवारण करण्यास कृष्णा नदीमध्ये चार टीएमसी पाणी सोडण्याबाबत प्रस्तावात म्हटले आहे. आतापर्यंत महाराष्ट्र सरकार पैसे घेऊन पाणी पुरवत होते. २००४ ते २०१७ पर्यंत अनेकवेळा अशाप्रमाणे पाणी मिळवले आहे. यावेळी मात्र पाणी वापर प्रस्ताव आम्ही सादर केला आहे. कर्नाटक सरकारसुध्दा सकारात्मक निर्णय घेईल, असे शिवकुमार म्हणाले.कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणीकृष्णा नदी काठावरील बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्याच्या विविध भागात पाणी समस्या बिकट आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राने ताबडतोब कोयना धरणातून चार टीएमसी पाणी कृष्णेत सोडावे, अशी विनंती शिवकुमार यांनी केली आहे. तरीही महाराष्ट्राने पाणी सोडलेले नाही.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणWaterपाणी