शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

JNU Attack: हल्लेखोर बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:09 IST

हल्लेखोरांना तोंड लपवण्याची गरज का भासली; मुख्यमंत्र्यांचा सवाल

मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हिंसाचार घडवणाऱ्या बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. चेहरे लपवून हल्ले घडवणारे भेकड आहेत. त्यांच्यात इतकी हिंमत आहे तर मग ते तोंडावर मुखवटे लावून का फिरतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई होऊन हल्लेखोरांचे चेहरे देशासमोर यायला हवेत. हा संपूर्ण प्रकार कोणाच्या पाठिंब्यानं झाला ते पुढे कळेलच. त्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.जेएनयूमध्ये काल हिंसाचार झाला. काही बुरखाधाऱ्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांवर हल्ले केले. हे बुरखाधारी अतिशय भित्रे आहेत. त्यांच्यात इतकी हिंमत होती, तर त्यांना तोंड लपवायची गरज का भासली, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिका निष्पक्ष वाटत नाही. मला यामध्ये राजकारण आणायचं नाही. पण बुरख्यामागचे चेहरे समोर यायला हवेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.जेएनयूसारखी परिस्थिती राज्यात निर्माण होऊ देणार नाही. राज्यातील एकाही विद्यार्थ्याच्या केसाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातल्या परिस्थितीबद्दल तरुणांच्या मनात भीती आणि राग आहे. देशातला तरुण कोणालाही घाबरत नाही. तरुणांच्या मनात असलेला उद्रेक माझ्याही मनात आहे. मी देशातल्या तरुणाईसोबत आहे. केंद्र सरकारनं तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा परिस्थिती बिकट होईल, असा इशारादेखील मुख्यमंत्र्यांनी दिला.  

टॅग्स :jnu attackजेएनयूUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना