शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

२२ तारखेचा आणि रामाचा काय संबंध?; जितेंद्र आव्हाडांनी साधला भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 15:05 IST

मंदिर कुणाच्या बापाचे नाही. मंदिरावर कुणाची मालकी नाही. राम हा सगळ्यांचा आहे असंही आव्हाडांनी म्हटलं.

नागपूर - निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने वातावरण तयार करून त्याचा फायदा घेणे याच ध्येयातून भाजपाने ही तारीख निवडली. २२ तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का? रामनवमी आहे का? रामाचा काय वेगळा दिवस आहे का? असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ही मंदिराची वास्तू अपूर्ण आहे. त्यात प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकत नाही असं शंकराचार्यांनी सांगितलं आहे. तुमच्या घराचं बांधकाम सुरू आहे, पूर्ण प्लास्टर झाले नाही तर तुम्ही तरी राहायला जाल का?. भाजपानं ४ शंकराचार्यांनाच वेड्यात काढले. त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले हे विचारले. हिंदू धर्मीयांना मार्ग शंकराचार्यांनी दाखवला. त्यांनी ४ पीठ निर्माण केलीत. तुम्ही त्यांना मानणारच नसाल तर ठीक आहे तुम्हीच शंकराचार्य आहात एवढेच म्हणता येईल. त्यांचे कॅलेंडर, पचांग वेगळे आहे. त्यामुळे त्यांना काहीही बोलू शकत नाही अशी टीका त्यांनी केली. 

तसेच राम मंदिर होतंय त्याने सगळेच आनंदी आहेत. मीदेखील आनंदी आहे. मंदिर कुणाच्या बापाचे नाही. मंदिरावर कुणाची मालकी नाही. राम हा सगळ्यांचा आहे. राम बहुजन आहे. क्षत्रीय आहे. जर क्षत्रीय नसेल तर भाजपाने पुढे येऊन सांगावे. राम क्षत्रीय म्हणजे बहुजन झाला. या देशात बहुजनांची संख्या सर्वात जास्त आहे. निवडणुकीसाठी भाजपाला रामाची आठवण होते. जनता जर्नादनच आमचा राम आहे. राम तोंडी अन् रावण मनी अशी यांची प्रवृत्ती आहे असंही आव्हाडांनी सांगितले. 

दरम्यान, आम्ही बहुजन आहोत. आम्ही मटण खातो. मी रामाच्या विधानावर खेद व्यक्त केला. जर मटण खाणाऱ्या माणसांना तुम्ही शेण खाता असं म्हणत असाल तर या देशातील ८० टक्के लोक शेण खातात. शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल तर ते तुम्हीही खाता असा टोला टीका करणाऱ्यांना जितेंद्र आव्हाडांनी लगावला. 

'तो' निकाल दिल्लीतून आला होता विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हा दिल्लीतून टाईप करून आलेला आहे. त्यामुळे या निकालपत्रात इतक्या उणीवा आहेत जिथे सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंचा व्हिप मान्य केला. गोगावलेंना रद्दबातल ठरवले. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांची सभागृह नेता म्हणून झालेली नेमणूकही कोर्टाने रद्द केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी अशाप्रकारे निर्णय देणे अपेक्षित नव्हते. आता पुढे काय होतंय बघू असं आव्हाड म्हणाले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड