शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

'त्यांचं' भूत सरकारच्या मानेवर बसल्याशिवाय शांत बसणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 19:45 IST

या घटनेने महाराष्ट्र बदनाम होतोय. दिल्लीच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर या बातम्या आहेत हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही असं आव्हाडांनी म्हटलं.

मुंबई - बीड प्रकरणात नेमलेल्या एसआयटीत वाल्मिकी कराडचे काही मित्र आहेत. ते तपास यंत्रणेत हस्तक्षेप करू शकतात असा आरोप आम्ही केल्यानंतर एसआयटीमधून तिघांना बाहेर काढण्यात आले. वाल्मिकी कराड हा माझा जवळचा मित्र आहे असं बोललेल्या धनंजय मुंडेंचं काय करायचे? जर एखादा अधिकारी, शिपाई चौकशीत हस्तक्षेप करू शकतात म्हणून सरकारने त्यांना तपास समितीतून बाहेर काढले मग हे मंत्रिमहोदय काहीच करू शकत नाही असं सरकारला वाटतंय का असा सवाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जितेंद्र आव्हाड यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, ज्या वाहनातून वाल्मिकी कराड पुण्याच्या सीआयडी ऑफिसला गेला त्या गाडीचा मालक अजित पवारांच्या सभेत उपस्थित होता. सरकारला दुर्लक्ष करायचे असेल तर करा, पण राज्यातील जनतेला मूर्ख समजू नका. ९ तारखेला हत्या होऊन एक महिना झाला. आतापर्यंतच्या चौकशीत काय निष्पन्न झालंय? आतापर्यंत जितक्या चौकशी समिती नेमल्या त्यात तपासाआधी मंत्र्‍यांचे राजीनामे घेतले आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी राजकारण बंद करावे. योग्य ती कारवाई करावी असं त्यांनी मागणी केली.

तसेच या घटनेने महाराष्ट्र बदनाम होतोय. दिल्लीच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर या बातम्या आहेत हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही. ज्यांनी खून करण्यास मदत केलीय त्यांचा राजीनामा मागतोय. वाल्मिकी कराडला सरकार वाचवणार, त्याच्याकडे कुठलं घबाड आहे ज्याला सरकारही घाबरतंय. विष्णू चाटेला मुख्य आरोपी करून हे प्रकरण मिटवून टाकायचे इथपर्यंत हे प्रकरण आणतील. कोण सुदर्शन घुले, बीडच्या गुन्हेगारीचा अभ्यास कराल तर त्यातील सर्व गुन्हेगार २२-२३ वयोगटातील आहेत. त्यांची घरे जाऊन तपासा. कुणीही कौलारू घरात राहत नाही. गेल्या १० वर्षापासून हेच सुरू आहे. त्याचा कर्ता करविता धनंजय मुंडेच आहेत असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.

दरम्यान, ही माणुसकीची लढाई आहे मराठा-वंजारी नाही. संतोष देशमुख आठवतोय पण सोमनाथ सूर्यवंशी आठवत नाही. तो गंभीररित्या मारला गेला. न्यायालयीन कोठडीत त्याला मारले, ही हत्या आहे. सोमनाथला मारला कुणी, आरोपी कोण..हा माझा साधा प्रश्न आहे. सरकार यावर बोलायला तयार नाही. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा खंदा कार्यकर्ता होता. आम्ही मुद्दा सोडणार नाही. सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख यांचं भूत सरकारच्या मानेवर बसवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडे