शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

'त्यांचं' भूत सरकारच्या मानेवर बसल्याशिवाय शांत बसणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 19:45 IST

या घटनेने महाराष्ट्र बदनाम होतोय. दिल्लीच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर या बातम्या आहेत हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही असं आव्हाडांनी म्हटलं.

मुंबई - बीड प्रकरणात नेमलेल्या एसआयटीत वाल्मिकी कराडचे काही मित्र आहेत. ते तपास यंत्रणेत हस्तक्षेप करू शकतात असा आरोप आम्ही केल्यानंतर एसआयटीमधून तिघांना बाहेर काढण्यात आले. वाल्मिकी कराड हा माझा जवळचा मित्र आहे असं बोललेल्या धनंजय मुंडेंचं काय करायचे? जर एखादा अधिकारी, शिपाई चौकशीत हस्तक्षेप करू शकतात म्हणून सरकारने त्यांना तपास समितीतून बाहेर काढले मग हे मंत्रिमहोदय काहीच करू शकत नाही असं सरकारला वाटतंय का असा सवाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जितेंद्र आव्हाड यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, ज्या वाहनातून वाल्मिकी कराड पुण्याच्या सीआयडी ऑफिसला गेला त्या गाडीचा मालक अजित पवारांच्या सभेत उपस्थित होता. सरकारला दुर्लक्ष करायचे असेल तर करा, पण राज्यातील जनतेला मूर्ख समजू नका. ९ तारखेला हत्या होऊन एक महिना झाला. आतापर्यंतच्या चौकशीत काय निष्पन्न झालंय? आतापर्यंत जितक्या चौकशी समिती नेमल्या त्यात तपासाआधी मंत्र्‍यांचे राजीनामे घेतले आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी राजकारण बंद करावे. योग्य ती कारवाई करावी असं त्यांनी मागणी केली.

तसेच या घटनेने महाराष्ट्र बदनाम होतोय. दिल्लीच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर या बातम्या आहेत हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही. ज्यांनी खून करण्यास मदत केलीय त्यांचा राजीनामा मागतोय. वाल्मिकी कराडला सरकार वाचवणार, त्याच्याकडे कुठलं घबाड आहे ज्याला सरकारही घाबरतंय. विष्णू चाटेला मुख्य आरोपी करून हे प्रकरण मिटवून टाकायचे इथपर्यंत हे प्रकरण आणतील. कोण सुदर्शन घुले, बीडच्या गुन्हेगारीचा अभ्यास कराल तर त्यातील सर्व गुन्हेगार २२-२३ वयोगटातील आहेत. त्यांची घरे जाऊन तपासा. कुणीही कौलारू घरात राहत नाही. गेल्या १० वर्षापासून हेच सुरू आहे. त्याचा कर्ता करविता धनंजय मुंडेच आहेत असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.

दरम्यान, ही माणुसकीची लढाई आहे मराठा-वंजारी नाही. संतोष देशमुख आठवतोय पण सोमनाथ सूर्यवंशी आठवत नाही. तो गंभीररित्या मारला गेला. न्यायालयीन कोठडीत त्याला मारले, ही हत्या आहे. सोमनाथला मारला कुणी, आरोपी कोण..हा माझा साधा प्रश्न आहे. सरकार यावर बोलायला तयार नाही. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा खंदा कार्यकर्ता होता. आम्ही मुद्दा सोडणार नाही. सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख यांचं भूत सरकारच्या मानेवर बसवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडे