शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 18:24 IST

शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

मुंबई - बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणब्यांविषयी वाईट लिहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या त्या लिखाणावर मी विरोध केला. परंतु त्यावेळी तुम्ही मला पक्षात असं अजिबात चालणार नाही, असा विरोध करून माझं वक्तव्य मागे घेण्यासाठी दम दिला होता. मीदेखील शुद्र आहे. हे नेहमी बोलतो कारण मला माझ्या शुद्र असण्याचा अभिमान आहे. पण आपण पाहिलं तर शुद्र म्हणजे काय ते आधी समजून घेतलं पाहिजे. जातीनिहाय जनगणनेसाठी शुद्र यांच्यासाठी आपल्याला उभे राहावे लागेल तुम्ही कधी न वापरलेले शस्त्र आता वापरायला नको होतं अशा शब्दात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला.

सुनील तटकरेंनीसुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर देताना मी शुद्र असल्याचं म्हटलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनील तटकरे यांनी वक्तव्य करताना त्यांच्या आयुष्यात मागे वळून बघितलं असतं तर बरं झालं असतं कारण तुमच्या जीवनात तुम्हाला आत्तापर्यंत जी पद मिळाली आहे. ती चांगल्या घराण्यांना देखील मिळालेली नाहीत. शेकापचा विरोध असतानाही आदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दामुळेच बनवलं गेलं अशी आठवण त्यांनी करून दिली.

त्याचसोबत तुम्हाला मंत्री पद, पुतण्या, मुलगा, भाऊ या सगळ्यांना आमदारकी आणि त्यानंतर तुम्हाला खासदारकी दिली. मला न देता तुमच्या मुलीला रायगडचं पालकमंत्री पद देखील दिलं. इतकं होऊनही तुमचं हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाण्यासाठी सुनील तटकरे यांनी नेहमीच आग्रही भूमिका मांडली. शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं असा दावाही आव्हाडांनी केला आहे.

दरम्यान, खरा अर्थाने कोणाला आरक्षणाची गरज आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. वंचित समाजाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षण म्हणजे तुमच्या आर्थिक उन्नतीचे साधन नाही. हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. गावच्या सीमे बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण होतं. कारण आरक्षणाच्या माध्यमातून त्या लोकांना बाबासाहेबांनी माणसात आणलं. आज जगातील प्रत्येक राष्ट्रात आरक्षण आहे. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालंच पाहिजे. जाती जातीत भांडणं लावणं योग्य नाही. आपल्या महाराष्ट्रात ३२९ जाती आहेत. सर्व जाती आपल्याला माहिती नाही. भामटा राजपूत नावाची जात देखील महाराष्ट्रात आहे आणि ती किती जणांना माहिती असेल? खरंच कुणबी नोंद असेल तर ते त्यांना मिळालंच पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आहे असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSupriya Suleसुप्रिया सुळे