शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 18:24 IST

शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

मुंबई - बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणब्यांविषयी वाईट लिहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या त्या लिखाणावर मी विरोध केला. परंतु त्यावेळी तुम्ही मला पक्षात असं अजिबात चालणार नाही, असा विरोध करून माझं वक्तव्य मागे घेण्यासाठी दम दिला होता. मीदेखील शुद्र आहे. हे नेहमी बोलतो कारण मला माझ्या शुद्र असण्याचा अभिमान आहे. पण आपण पाहिलं तर शुद्र म्हणजे काय ते आधी समजून घेतलं पाहिजे. जातीनिहाय जनगणनेसाठी शुद्र यांच्यासाठी आपल्याला उभे राहावे लागेल तुम्ही कधी न वापरलेले शस्त्र आता वापरायला नको होतं अशा शब्दात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला.

सुनील तटकरेंनीसुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर देताना मी शुद्र असल्याचं म्हटलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनील तटकरे यांनी वक्तव्य करताना त्यांच्या आयुष्यात मागे वळून बघितलं असतं तर बरं झालं असतं कारण तुमच्या जीवनात तुम्हाला आत्तापर्यंत जी पद मिळाली आहे. ती चांगल्या घराण्यांना देखील मिळालेली नाहीत. शेकापचा विरोध असतानाही आदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दामुळेच बनवलं गेलं अशी आठवण त्यांनी करून दिली.

त्याचसोबत तुम्हाला मंत्री पद, पुतण्या, मुलगा, भाऊ या सगळ्यांना आमदारकी आणि त्यानंतर तुम्हाला खासदारकी दिली. मला न देता तुमच्या मुलीला रायगडचं पालकमंत्री पद देखील दिलं. इतकं होऊनही तुमचं हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाण्यासाठी सुनील तटकरे यांनी नेहमीच आग्रही भूमिका मांडली. शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं असा दावाही आव्हाडांनी केला आहे.

दरम्यान, खरा अर्थाने कोणाला आरक्षणाची गरज आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. वंचित समाजाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षण म्हणजे तुमच्या आर्थिक उन्नतीचे साधन नाही. हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. गावच्या सीमे बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण होतं. कारण आरक्षणाच्या माध्यमातून त्या लोकांना बाबासाहेबांनी माणसात आणलं. आज जगातील प्रत्येक राष्ट्रात आरक्षण आहे. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालंच पाहिजे. जाती जातीत भांडणं लावणं योग्य नाही. आपल्या महाराष्ट्रात ३२९ जाती आहेत. सर्व जाती आपल्याला माहिती नाही. भामटा राजपूत नावाची जात देखील महाराष्ट्रात आहे आणि ती किती जणांना माहिती असेल? खरंच कुणबी नोंद असेल तर ते त्यांना मिळालंच पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आहे असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSupriya Suleसुप्रिया सुळे