शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 18:24 IST

शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

मुंबई - बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणब्यांविषयी वाईट लिहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या त्या लिखाणावर मी विरोध केला. परंतु त्यावेळी तुम्ही मला पक्षात असं अजिबात चालणार नाही, असा विरोध करून माझं वक्तव्य मागे घेण्यासाठी दम दिला होता. मीदेखील शुद्र आहे. हे नेहमी बोलतो कारण मला माझ्या शुद्र असण्याचा अभिमान आहे. पण आपण पाहिलं तर शुद्र म्हणजे काय ते आधी समजून घेतलं पाहिजे. जातीनिहाय जनगणनेसाठी शुद्र यांच्यासाठी आपल्याला उभे राहावे लागेल तुम्ही कधी न वापरलेले शस्त्र आता वापरायला नको होतं अशा शब्दात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला.

सुनील तटकरेंनीसुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर देताना मी शुद्र असल्याचं म्हटलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनील तटकरे यांनी वक्तव्य करताना त्यांच्या आयुष्यात मागे वळून बघितलं असतं तर बरं झालं असतं कारण तुमच्या जीवनात तुम्हाला आत्तापर्यंत जी पद मिळाली आहे. ती चांगल्या घराण्यांना देखील मिळालेली नाहीत. शेकापचा विरोध असतानाही आदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दामुळेच बनवलं गेलं अशी आठवण त्यांनी करून दिली.

त्याचसोबत तुम्हाला मंत्री पद, पुतण्या, मुलगा, भाऊ या सगळ्यांना आमदारकी आणि त्यानंतर तुम्हाला खासदारकी दिली. मला न देता तुमच्या मुलीला रायगडचं पालकमंत्री पद देखील दिलं. इतकं होऊनही तुमचं हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाण्यासाठी सुनील तटकरे यांनी नेहमीच आग्रही भूमिका मांडली. शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं असा दावाही आव्हाडांनी केला आहे.

दरम्यान, खरा अर्थाने कोणाला आरक्षणाची गरज आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. वंचित समाजाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षण म्हणजे तुमच्या आर्थिक उन्नतीचे साधन नाही. हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. गावच्या सीमे बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण होतं. कारण आरक्षणाच्या माध्यमातून त्या लोकांना बाबासाहेबांनी माणसात आणलं. आज जगातील प्रत्येक राष्ट्रात आरक्षण आहे. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालंच पाहिजे. जाती जातीत भांडणं लावणं योग्य नाही. आपल्या महाराष्ट्रात ३२९ जाती आहेत. सर्व जाती आपल्याला माहिती नाही. भामटा राजपूत नावाची जात देखील महाराष्ट्रात आहे आणि ती किती जणांना माहिती असेल? खरंच कुणबी नोंद असेल तर ते त्यांना मिळालंच पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आहे असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSupriya Suleसुप्रिया सुळे