शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

मदरशात दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडेन, जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 18:03 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मदरश्यांबाबत केलेल्या विधानाचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

मुंबई-

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मदरश्यांबाबत केलेल्या विधानाचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'पंतप्रधानांना माझी विनंती आहे की त्यांनी मदरश्यांमध्ये धाडी टाकाव्यात. या मदरश्यांमध्ये काय काय सापडेल ना ते पाहून धडकी भरेल', असं विधान राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात केलं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत मदरश्यात दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडेन, असं खुलं आव्हान राज ठाकरे यांना दिलं आहे. 

आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा फॉर्म्युला आहे असं सांगून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची भाषा करणारे राज ठाकरे मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का अधोगती आहे कळत नाही, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. "राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केलं. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईल. मुंब्र्यात काही शतक हिंदू मुसलमान प्रेमाने राहतात", असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 

"कळवा-मुंब्रा या मतदार संघात ६७ टक्के हिंदू आहेत आणि ३३ टक्के मुसलमान त्यात मी ७५ हजार मतांनी विजयी झालो. कळव्यातून ३० हजार मतांची आघाडी आणि मुंब्र्यातून ४५ हजार मतांची आघाडी. लोक कामावर मत देतात जाती पातीवर नाही. १८ तास राबावे लागते. शेवटच्या माणसापर्यंत पोहचावे लागते", असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

लाखांच्या सभेसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणं फार सोपं असतं. पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील, महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील याचा जरा तरी विचार करा. ज्या घरात जन्माला आला तुम्ही. त्या घरात महाराष्ट्राची संयुक्त चळवळ उभी राहिली आहे, त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRaj Thackerayराज ठाकरेMNS Gudi Padwa Rallyमनसे गुढीपाडवा मेळावा